जाळीचादेव यात्रेस आजपासून होणार प्रारंभ
By Admin | Updated: February 1, 2015 00:43 IST2015-02-01T00:43:57+5:302015-02-01T00:43:57+5:30
धावडा : जालना जिल्ह्याच्या उत्तरेस मराठवाडा, विदर्भ व खानदेशच्या सीमेवर असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचादेव (ता. भोकरदन) यात्रेस १ फेबु्रवारी पासून प्रारंभ होणार

जाळीचादेव यात्रेस आजपासून होणार प्रारंभ
धावडा : जालना जिल्ह्याच्या उत्तरेस मराठवाडा, विदर्भ व खानदेशच्या सीमेवर असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचादेव (ता. भोकरदन) यात्रेस १ फेबु्रवारी पासून प्रारंभ होणार आहे.
महानुभव पंथाचे देशभरातील भाविका यात्रेला हजेरी लावतात. १२ व्या शतकात चक्रधर स्वामी यांनी गुजरातहून भ्रमन करताना सह्याद्रीचा डोंगर चढून येथे एका जाळीत विसावा घेतला होता. तेव्हापासून या ठिकाणास जाळीचा देव असे म्हणतात, अशी अख्यायिका आहे. १९४२ साली या ठिकाणी मंदिर जीर्णोद्धार करण्यात आला. तेव्हापासून ही यात्रा भरते. यात्रेस महाराष्ट्रसह पंजाब, दिल्ली, हरीयाणा, गुजरातचे भाविक हजेरी लावतात. ३ फेबु्रवारी रोजी रथ यात्रा काढण्यात येणार आहे.