शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

जालना रोड, बीड बायपासचे काम ५०० कोटींत बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:14 IST

जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देडागडुजीसाठी १० कोटींची बोळवण : अनेक कामे वगळण्यासाठी केली सूचना; जयभवानीनगरातील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्तावात समावेश

- विकास राऊत औरंगाबाद : जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत. या सूचनांमुळे ७८९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प होण्याबाबत साशंकता असून, औरंगाबादकरांनी या प्रकल्पाची आशा सोडून दिलेलीच बरी, असे बोलण्याची वेळ आली आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये ७८९ कोटी रुपयांचा डीपीआर दळणवळण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. अजून त्या डीपीआरला मंजुरी देऊन निविदा काढल्या जात नाहीत. यासाठी स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीदेखील केंद्रात पाठपुरावा करीत नाहीत, असा आरोप विरोधक करीत आहेत. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) अंतर्गत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केलेले हे दोन्ही प्रकल्प कागदावर येऊन अडीच वर्षे झाले आहेत. केम्ब्रिज शाळेजवळील उड्डाणपूल तसेच नगरनाका येथील उड्डाणपूल या प्रकल्पातून कमी करण्यात यावा. ड्रायपोर्टच्या प्रकल्पात या दोन्ही कामांचा समावेश केला तर १०० कोटी रुपये वाचतील. जयभवानीनगरच्या रुंदीकरणाचा प्रस्तावदेखील याच कामात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तीन वर्षांपासून ते काम रखडले आहे. जालना रोडच्या कामाला जोपर्यंत मुहूर्त लागत नाही, तोपर्यंत त्या रस्त्याचे कामदेखील होणे आता शक्य नाही. बीड बायपासची ओळख अपघात रस्ता म्हणून होत आहे. गेल्या वर्षी त्या रस्त्याच्या कामासाठी आंदोलने झाली, पण त्याचा काहीही फरक पडला नाही.

डागडुजीच्या निधीतही मारली दांडीडागडुजीच्या निधीतही एनएचएआयने दांडी मारली आहे. ७६ कोटी रुपयांची घोषणा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या सूचनेवरून केली; परंतु आता ३५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये १३ कोटी रुपये जालना रोडच्या सरफे सिंगसाठी ठेवण्यात आले होते. त्यातही एनएचएआयने दांडी मारून १० कोटींच्या निविदा काढण्याचा विचार सुरू केला आहे.

पाच वर्षे जालना रोडवर खड्डा पडणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. या सगळ्या कामांत बीड बायपासवर एक छदामही खर्च करण्यात येणार नाही. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते वसंतराव नाईक चौक, सिडको या रस्त्याचा समावेश नाही. त्यामुळे ७८९ कोटींचा प्रकल्प ५०० कोटींवर आणला तरी त्याला गती मिळण्याबाबत साशंकता आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाhighwayमहामार्ग