शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जालना रोड, बीड बायपासचे काम ५०० कोटींत बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:14 IST

जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देडागडुजीसाठी १० कोटींची बोळवण : अनेक कामे वगळण्यासाठी केली सूचना; जयभवानीनगरातील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्तावात समावेश

- विकास राऊत औरंगाबाद : जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत. या सूचनांमुळे ७८९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प होण्याबाबत साशंकता असून, औरंगाबादकरांनी या प्रकल्पाची आशा सोडून दिलेलीच बरी, असे बोलण्याची वेळ आली आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये ७८९ कोटी रुपयांचा डीपीआर दळणवळण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. अजून त्या डीपीआरला मंजुरी देऊन निविदा काढल्या जात नाहीत. यासाठी स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीदेखील केंद्रात पाठपुरावा करीत नाहीत, असा आरोप विरोधक करीत आहेत. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) अंतर्गत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केलेले हे दोन्ही प्रकल्प कागदावर येऊन अडीच वर्षे झाले आहेत. केम्ब्रिज शाळेजवळील उड्डाणपूल तसेच नगरनाका येथील उड्डाणपूल या प्रकल्पातून कमी करण्यात यावा. ड्रायपोर्टच्या प्रकल्पात या दोन्ही कामांचा समावेश केला तर १०० कोटी रुपये वाचतील. जयभवानीनगरच्या रुंदीकरणाचा प्रस्तावदेखील याच कामात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तीन वर्षांपासून ते काम रखडले आहे. जालना रोडच्या कामाला जोपर्यंत मुहूर्त लागत नाही, तोपर्यंत त्या रस्त्याचे कामदेखील होणे आता शक्य नाही. बीड बायपासची ओळख अपघात रस्ता म्हणून होत आहे. गेल्या वर्षी त्या रस्त्याच्या कामासाठी आंदोलने झाली, पण त्याचा काहीही फरक पडला नाही.

डागडुजीच्या निधीतही मारली दांडीडागडुजीच्या निधीतही एनएचएआयने दांडी मारली आहे. ७६ कोटी रुपयांची घोषणा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या सूचनेवरून केली; परंतु आता ३५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये १३ कोटी रुपये जालना रोडच्या सरफे सिंगसाठी ठेवण्यात आले होते. त्यातही एनएचएआयने दांडी मारून १० कोटींच्या निविदा काढण्याचा विचार सुरू केला आहे.

पाच वर्षे जालना रोडवर खड्डा पडणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. या सगळ्या कामांत बीड बायपासवर एक छदामही खर्च करण्यात येणार नाही. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते वसंतराव नाईक चौक, सिडको या रस्त्याचा समावेश नाही. त्यामुळे ७८९ कोटींचा प्रकल्प ५०० कोटींवर आणला तरी त्याला गती मिळण्याबाबत साशंकता आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाhighwayमहामार्ग