शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोड, बीड बायपासचे काम ५०० कोटींत बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:14 IST

जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देडागडुजीसाठी १० कोटींची बोळवण : अनेक कामे वगळण्यासाठी केली सूचना; जयभवानीनगरातील रस्ता रुंदीकरणाचा प्रस्तावात समावेश

- विकास राऊत औरंगाबाद : जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प आता ७८९ कोटी रुपयांवरून ५०० कोटींच्या आसपास अंदाजपत्रकात बसवून त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दळणवळण मंत्रालयाकडून नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मराठवाडा विभागाला देण्यात आल्या आहेत. या सूचनांमुळे ७८९ कोटी रुपयांचा हा प्रकल्प होण्याबाबत साशंकता असून, औरंगाबादकरांनी या प्रकल्पाची आशा सोडून दिलेलीच बरी, असे बोलण्याची वेळ आली आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये ७८९ कोटी रुपयांचा डीपीआर दळणवळण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. अजून त्या डीपीआरला मंजुरी देऊन निविदा काढल्या जात नाहीत. यासाठी स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीदेखील केंद्रात पाठपुरावा करीत नाहीत, असा आरोप विरोधक करीत आहेत. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) अंतर्गत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केलेले हे दोन्ही प्रकल्प कागदावर येऊन अडीच वर्षे झाले आहेत. केम्ब्रिज शाळेजवळील उड्डाणपूल तसेच नगरनाका येथील उड्डाणपूल या प्रकल्पातून कमी करण्यात यावा. ड्रायपोर्टच्या प्रकल्पात या दोन्ही कामांचा समावेश केला तर १०० कोटी रुपये वाचतील. जयभवानीनगरच्या रुंदीकरणाचा प्रस्तावदेखील याच कामात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तीन वर्षांपासून ते काम रखडले आहे. जालना रोडच्या कामाला जोपर्यंत मुहूर्त लागत नाही, तोपर्यंत त्या रस्त्याचे कामदेखील होणे आता शक्य नाही. बीड बायपासची ओळख अपघात रस्ता म्हणून होत आहे. गेल्या वर्षी त्या रस्त्याच्या कामासाठी आंदोलने झाली, पण त्याचा काहीही फरक पडला नाही.

डागडुजीच्या निधीतही मारली दांडीडागडुजीच्या निधीतही एनएचएआयने दांडी मारली आहे. ७६ कोटी रुपयांची घोषणा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्रालयाच्या सूचनेवरून केली; परंतु आता ३५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये १३ कोटी रुपये जालना रोडच्या सरफे सिंगसाठी ठेवण्यात आले होते. त्यातही एनएचएआयने दांडी मारून १० कोटींच्या निविदा काढण्याचा विचार सुरू केला आहे.

पाच वर्षे जालना रोडवर खड्डा पडणार नाही, असा दावा करण्यात येत आहे. या सगळ्या कामांत बीड बायपासवर एक छदामही खर्च करण्यात येणार नाही. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते वसंतराव नाईक चौक, सिडको या रस्त्याचा समावेश नाही. त्यामुळे ७८९ कोटींचा प्रकल्प ५०० कोटींवर आणला तरी त्याला गती मिळण्याबाबत साशंकता आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाhighwayमहामार्ग