शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवर जलजीवन मिशनचा उतारा चालेना; सध्या ३० लिटरच पाणी घ्या, ५५ लिटरचे पुढे बघू!

By विजय सरवदे | Updated: September 6, 2023 13:58 IST

मागील दोन दशकांमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतत दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे घटती भूजल पातळी हा या भागातील सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे.

छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२४१ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. यापैकी ६८२ गावांत नळाद्वारे पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला; पण निकषानुसार दरडोई ५५ लिटर पाणी देण्याऐवजी टंचाईचे कारण पुढे करत सध्या दरडोई ३० लिटर एवढाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करण्याचा जलजीवन मिशनचा भ्रमाचा भोपळा सलामीलाच फुटला आहे. दरम्यान, मिशनची तसेच वॉटर ग्रिडची सर्व कामे पूर्ण झाल्यास तसेच चांगला पाऊस झाल्यास जलजीवन मिशनअंतर्गत नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, असे अधिकारी सांगतात.

मागील दोन दशकांमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतत दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे घटती भूजल पातळी हा या भागातील सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे ‘विहिरीतच नाही, तर पोहोऱ्यात कुठून येईल,’ अशी परिस्थिती या जिल्ह्याची झाली आहे. तरीही जलजीवन मिशनने ग्रामीण भागातील बाराही महिने टंचाईग्रस्त गाव, वाड्या, तांड्यांना मुबलक शुद्ध पाणीपुरवठ्याचा दावा करत तब्बल ६७७ कोटींच्या ११६१ योजना सुरू केल्या आहेत. यापैकी काही तालुक्यांत योजना पूर्णत्वाकडे आल्या असून, जिल्ह्यातील ६८२ गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पण, नदी, नाले, तलाव कोरडी पडल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या मिशन अंतर्गत दरडोई ५५ लिटर शुद्ध पाणीपुरवठ्याचा हेतू साध्य होताना तूर्तास तरी दिसत नाही.

पावणेपाच घरांना नळाचे पाणीया मिशनचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेरपासून जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ७६ टक्के घरापर्यंत नळजोडणी झालेली असली तरी उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्यामुळे अनेक घरांना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही.

७ कोटी गेले; १९ कोटी आलेमार्चअखेरपर्यंत प्राप्त ७ कोटी अखर्चित निधी राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाने गेल्या आठवड्यात परत घेतला. असे असले तरी नुकताच १९ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी