शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पाणीटंचाईवर जलजीवन मिशनचा उतारा चालेना; सध्या ३० लिटरच पाणी घ्या, ५५ लिटरचे पुढे बघू!

By विजय सरवदे | Updated: September 6, 2023 13:58 IST

मागील दोन दशकांमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतत दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे घटती भूजल पातळी हा या भागातील सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे.

छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२४१ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. यापैकी ६८२ गावांत नळाद्वारे पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला; पण निकषानुसार दरडोई ५५ लिटर पाणी देण्याऐवजी टंचाईचे कारण पुढे करत सध्या दरडोई ३० लिटर एवढाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करण्याचा जलजीवन मिशनचा भ्रमाचा भोपळा सलामीलाच फुटला आहे. दरम्यान, मिशनची तसेच वॉटर ग्रिडची सर्व कामे पूर्ण झाल्यास तसेच चांगला पाऊस झाल्यास जलजीवन मिशनअंतर्गत नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, असे अधिकारी सांगतात.

मागील दोन दशकांमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतत दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे घटती भूजल पातळी हा या भागातील सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे ‘विहिरीतच नाही, तर पोहोऱ्यात कुठून येईल,’ अशी परिस्थिती या जिल्ह्याची झाली आहे. तरीही जलजीवन मिशनने ग्रामीण भागातील बाराही महिने टंचाईग्रस्त गाव, वाड्या, तांड्यांना मुबलक शुद्ध पाणीपुरवठ्याचा दावा करत तब्बल ६७७ कोटींच्या ११६१ योजना सुरू केल्या आहेत. यापैकी काही तालुक्यांत योजना पूर्णत्वाकडे आल्या असून, जिल्ह्यातील ६८२ गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पण, नदी, नाले, तलाव कोरडी पडल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या मिशन अंतर्गत दरडोई ५५ लिटर शुद्ध पाणीपुरवठ्याचा हेतू साध्य होताना तूर्तास तरी दिसत नाही.

पावणेपाच घरांना नळाचे पाणीया मिशनचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेरपासून जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ७६ टक्के घरापर्यंत नळजोडणी झालेली असली तरी उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्यामुळे अनेक घरांना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही.

७ कोटी गेले; १९ कोटी आलेमार्चअखेरपर्यंत प्राप्त ७ कोटी अखर्चित निधी राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाने गेल्या आठवड्यात परत घेतला. असे असले तरी नुकताच १९ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी