शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

पाणीटंचाईवर जलजीवन मिशनचा उतारा चालेना; सध्या ३० लिटरच पाणी घ्या, ५५ लिटरचे पुढे बघू!

By विजय सरवदे | Updated: September 6, 2023 13:58 IST

मागील दोन दशकांमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतत दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे घटती भूजल पातळी हा या भागातील सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे.

छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२४१ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. यापैकी ६८२ गावांत नळाद्वारे पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला; पण निकषानुसार दरडोई ५५ लिटर पाणी देण्याऐवजी टंचाईचे कारण पुढे करत सध्या दरडोई ३० लिटर एवढाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करण्याचा जलजीवन मिशनचा भ्रमाचा भोपळा सलामीलाच फुटला आहे. दरम्यान, मिशनची तसेच वॉटर ग्रिडची सर्व कामे पूर्ण झाल्यास तसेच चांगला पाऊस झाल्यास जलजीवन मिशनअंतर्गत नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, असे अधिकारी सांगतात.

मागील दोन दशकांमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतत दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे घटती भूजल पातळी हा या भागातील सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे ‘विहिरीतच नाही, तर पोहोऱ्यात कुठून येईल,’ अशी परिस्थिती या जिल्ह्याची झाली आहे. तरीही जलजीवन मिशनने ग्रामीण भागातील बाराही महिने टंचाईग्रस्त गाव, वाड्या, तांड्यांना मुबलक शुद्ध पाणीपुरवठ्याचा दावा करत तब्बल ६७७ कोटींच्या ११६१ योजना सुरू केल्या आहेत. यापैकी काही तालुक्यांत योजना पूर्णत्वाकडे आल्या असून, जिल्ह्यातील ६८२ गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पण, नदी, नाले, तलाव कोरडी पडल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या मिशन अंतर्गत दरडोई ५५ लिटर शुद्ध पाणीपुरवठ्याचा हेतू साध्य होताना तूर्तास तरी दिसत नाही.

पावणेपाच घरांना नळाचे पाणीया मिशनचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेरपासून जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ७६ टक्के घरापर्यंत नळजोडणी झालेली असली तरी उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्यामुळे अनेक घरांना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही.

७ कोटी गेले; १९ कोटी आलेमार्चअखेरपर्यंत प्राप्त ७ कोटी अखर्चित निधी राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाने गेल्या आठवड्यात परत घेतला. असे असले तरी नुकताच १९ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणी