शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

जालना पालिकेला मिळणार अटल अमृत योजना

By admin | Updated: August 20, 2015 00:29 IST

जालना : जालना पालिकेला सर्वाधिक लाभदायक ठरलेल्या नगरोत्थान योजना रद्द करून त्या ऐवजी अटल अमृत ही योजना देण्याचा निर्णय अंदाज समितीचे प्रमुख

जालना : जालना पालिकेला सर्वाधिक लाभदायक ठरलेल्या नगरोत्थान योजना रद्द करून त्या ऐवजी अटल अमृत ही योजना देण्याचा निर्णय अंदाज समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांनी घेतला आहे. त्याबाबत तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या आहेत.बुधवारी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह येथून समितीच्या दौऱ्यास सुरूवात झाली. आ. अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील या पथकात आ. डॉ. मिलिंद माने, आ. चरण वाघमारे, आ. शशीकांत खेडकर, आ. अमरसिंह पंडित यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी या पथकाचे स्वागत केले.सर्वप्रथम औद्योगिक वसाहती मधील नागेवाडी जवळील टप्पा तीन मध्ये उभारण्यात आलेल्या एलजीबी या कंपनीत भेट देवून पाहणी केली. तेथील कामगारांचे प्रश्न समजावून घेतले. तसेच या कंपनीत किती कामगार आहे. त्यात जालन्यातील स्थानिक कामगारांची संख्या किती?, जमीनी दिलेल्या किती शेतकऱ्यांच्या पाल्यांना नौकरीस ठेवले. आदी बाबतची माहिती घेण्याचे आदेश संबधीत कामगार अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच सर्व अहवाल गुरूवारी होणाऱ्या बेठकीत सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानंतर हे पथक औद्योगीक वसाहत टप्पा २ मधील पोलाद व भाग्यलक्ष्मी स्टील कंपनीस भेट देवून पाहणी केली. तसेच पोलाद कंपनीतील एका कॅबीनमध्ये पथकाने सुमारे अर्धातास उद्योजक व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर हे पथक पोलिस वससाहतीत गेले. तेथे १५० कॉर्टरमधील रूम न १४४ व १४५ ची पाहणी केली. यावेळी वसाहतीमधील पोलिस कुटुंबियानी आपल्या व्यथा मांडल्या. या ठिकाणी कुठलीही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. निवास स्थानाची डागडजी होत नाही. ती आम्हालााच स्वखर्चाने करावी लागतात. पावसाळ्यात घरांना गळतीलागते अशा अनेक तक्रारीचा पाढा महिलांनी समितींसमोर मांडल्या. तेव्हा समिती प्रमुख खोतकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या संबधी विचारले असता सार्वजनीक बांधकाम विभागाकडून दर तीन वर्षांनी दुरूस्ती केली जाते. मात्र अपुरा निधी मिळतो. ६ कोटीचा निधी गरजेचा असताना दीडच कोटी रूपय मिळाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान कार्टरची दुरूस्तीच केली जात नसल्याचे सांगण्यात आल्याने संबधीत अधिकाऱ्यांना समितीतील सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. एसआरपीएफ मधील निजाम कालिन घरांच्या पाहणी दरम्यान समितीमधील सदस्य ही आवक झाले. या वेळी महिलांनी आम्हाला पाणीही अशुद्ध मिळत असल्याच्या तक्रारी केल्या. जलवाहिनीला जागो जागी गळती लागल्याने पालिकेकडून अशुद्ध पाणी येते तेव्हा आ. खोतकर यांनी जर जलवाहिनी दुरूस्तीसाठी आमदार फंडातून पाच लाख रूपये देतो. पाण्याचा प्रश्न सोडवा असे सांगितले. तसेच आज पर्यंत आमच्या वसाहतीची कोणत्याही राजकीय नेत्यांनी पाहणी केली नाही. तुम्ही पहिल्यादांज आलात आता आमच्या निवास स्थानाचा प्रश्न सोडवा असे काही महिलांनी यावेळी सांगितले. तसेच पोलिस प्रशिक्षण विद्यालयासही भेट देवून तेथील समस्या जाणुन घेतल्या. या दौऱ्यात जिल्हाधिकारी ए.एस. आर नायक, निवासी जिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपविभागीय अधिकारी श्रीकु मार चिंचकर, तहसीलदार रेवननाथ लबडे, जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आरपीटीएसचे प्राचार्य संभाजी कदम, उपअधीक्षक गौर, गुन्हे शाखेचे अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जालना नगर पालिकेच्या आवारात समितीमधील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. अर्जुन खोतकर म्हणाले या समितीला विधी मंडळाचे अधिकार दिलेले आहे. सत्कारही आम्ही घेवू शकत नाही. मात्र आग्रहा खातर सत्कार घेतला. जालना पालिकेकडे यापूर्वी असलेली नगरोथ्थान योजना रद्द करण्यात आलेली आहे. त्या एवजी अटल अमृत योजनेत पालिकेचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा. या योजनेतून पाणी, भूमीगत गटार, गार्डन, रस्ते आदीं विकास कामे करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.