शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

साताऱ्यात जलकुंभाचे काम संथ गतीने, ‘पाणी मिळणार कधी’? 

By साहेबराव हिवराळे | Updated: September 8, 2023 16:54 IST

एक दिवस एक वसाहत: साताऱ्यात रस्त्याचे नो टेन्शन, इतर समस्यांचे कसे होणार सोल्युशन!

छत्रपती संभाजीनगर : सातारा जलकुंभाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यामुळे सातारावासियांना पाणी कधीपासून मिळणार, हा प्रश्न आहे. याशिवाय परिसरातील रस्त्यांचे बारा वाजले असून, खड्डेमय रस्ते आहेत. इतर समस्याही आवासून उभ्या असून, त्यावर तोडगा कधी काढला जाणार, याकडे सातारावासीय डोळे लावून आहेत.

समस्या कोणत्या ?जलवाहिनीच नाही यामुळे नळ उपलब्ध नाहीरस्ते खड्डेमय; साफसफाई नाहीड्रेनेज लाइनचे काम अपूृर्ण; काही ठिकाणी फुटलेलेनालेसफाईदेखील नाहीकचरा व्यवस्थापन नाहीच; यामुळे दुर्गंधी

कोण आहेत वास्तव्यास?.सातारा परिसरात वस्ती प्रचंड वाढली असून, या भागात शिक्षकवृंद, पोलिस अधिकारी, कर्मचारी, आयटीआय तसेच बडे व्यावसायिकही वास्तव्यास आहेत

निवडणुकीपूर्वी तरी नळाला पाणी येईल का?जलकुंभाच्या बांधकामाची गती मंदावलेली असल्याने किमान लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तरी नळाला पाणी येईल की नाही, या विवंचनेत नागरिक आहेत.- भारती भांडेकर

उद्यान विकसित करा...या परिसरात २२ वर्षांपासून आम्ही राहतो. टॅक्सही देतो. मात्र, कोणतेच प्रश्न प्रामुख्याने सोडविले जात नाहीत. बालउद्यान विकसित करण्यासाठी मनपाने आश्वासन दिले; परंतु ते अद्याप विकसित केलेले नाही.- योगिता बेंडसुरे

एकही माणूस कामावर दिसत नाही३० ऑक्टोबर २०२१ला जलकुंभाच्या कामाचे उद्घाटन झाले, हळूहळू जलकुंभाचे काम सुरू आहे. त्याच्या चढणाऱ्या कॉलमला पाहून चला बुवा, आता परिसरात मुबलक पाणी मिळेल, असे वाटले होते. परंतु, या टाकीच्या कामाला गती मिळाली नाही, नेमकं कुठे काम अडत आहे हेच कळत नाही. - दीपक सूर्यवंशी

बोअरवेलशिवाय कोणतीच सुविधा नाही...सूर्यदीपनगरात बोअरवेलशिवाय कोणतीच सुविधा नाही. बोरवेलचे पाणी दरवर्षी जानेवारीमध्ये आटते. यंदा तर पावसाळ्यातच सप्टेंबरमध्ये तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न आहे तर झाडे, प्राणी कसे जगतील, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. बोअरवेलला पाण्याच्या फिल्टरचा खर्च करावा लागतो. अन्यथा जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते.- निर्मला म्हस्के पाटील

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी