शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आग लागल्यावर उडी मारण्याचीच येईल वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 23:34 IST

सुरतप्रमाणे एखाद्या वेळी अचानक आग लागली, तर जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून उडी मारण्याचीच वेळ विद्यार्थ्यांवर ओढावू शकते, इतकी धोकादायक अवस्था शहरातील अनेक खासगी शिकवणी वर्गांची आहे. दुसऱ्या, तिसºया मजल्यावर वर्ग, त्यासाठी ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आणि अग्निशमन यंत्रणेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव टांगणीला : खासगी शिकवण्यांची धोकादायक अवस्था, अग्निशमन यंत्रणेचा अभाव, ‘नाहरकतही नाही

संतोष हिरेमठऔरंगाबाद : सुरतप्रमाणे एखाद्या वेळी अचानक आग लागली, तर जीव वाचविण्यासाठी इमारतीवरून उडी मारण्याचीच वेळ विद्यार्थ्यांवर ओढावू शकते, इतकी धोकादायक अवस्था शहरातील अनेक खासगी शिकवणी वर्गांची आहे. दुसऱ्या, तिसºया मजल्यावर वर्ग, त्यासाठी ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आणि अग्निशमन यंत्रणेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतमध्ये शुक्रवारी खासगी शिकवणी वर्गामध्ये झालेल्या अग्निकांडात २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. चार मजली इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तळमजल्यावर लागलेली आग पाहून विद्यार्थ्यांनी वरच्या मजल्याकडे धाव घेतली. आग नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्यावरून उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील खासगी शिकवणी वर्गांच्या इमारतींची पाहणी करण्यात आली. तेव्हा अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याची धक्कादायक बाब आढळून आली.शहरात पाहणी केलेल्या बहुतांश शिकवण्या दुसºया आणि तिसºया मजल्यावर होत्या. विशेष म्हणजे प्रत्येक इमारतींना ये-जा करण्यासाठी एकच जिना आहे. त्यामुळे खालच्या मजल्यावर आग लागल्यानंतर वरच्या मजल्यावरील वर्गामधील विद्यार्थी अडकून पडण्याचीच भीती आहे. त्यातून जीव वाचविण्यासाठी उडी मारण्याचा एकमेव पर्याय आहे. याबरोबर खासगी शिकवण्यांमध्ये दर्शनी भागात अग्निशमन सिलिंडर दिसून आले नाहीत. त्यामुळे आगीच्या लहानही घटनेवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी मोठी धावपळ उडू शकते.ये-जा करण्यासाठी एकच मार्गशहरातील उस्मानपुरा भागात संत एकनाथ रंगमंदिराच्या परिसरात एकाच इमारतीत दुसºया मजल्यावर समोरासमोर दोन वर्ग आहेत. खालच्या इमारतीला जर आग लागली तर विद्यार्थ्यांना खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवावा लागेल. कारण याठिकाणी ये-जा करण्यासाठी एकच मार्ग आहे. महेशनगर, औरंगपुरा व अन्य भागातील खासगी शिकवणी वर्गांची अवस्थाही अशीच काहीशी पाहायला मिळाली. मराठवाडा साहित्य परिषदेच्या परिसरातील एका इमारतीत दुसºया मजल्यावरील शिकवणीमध्ये तर विद्युत वाहिन्या धोकादायकरीत्या उघड्या दिसून आल्या.इमारतीची वाईट अवस्थाअग्रसेन चौक रस्त्यावर दोन खासगी शिकवणी वर्ग आहेत. यापैकी दुसºया मजल्यावरील शिकवणी वर्गांच्या इमारतीची अतिशय वाईट अवस्था दिसून आली. शिकवणीच्या खालच्या मजल्यावर जुन्या खुर्च्या, खोकी असे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. जिन्यावरूनच विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. काही कारणांमुळे खालच्या मजल्यास आग लागली तर येथील विद्यार्थ्यांना गॅलरीतून जीव वाचविण्याचा एकच मार्ग राहील.४० पेक्षा अधिक शिकवण्या, नोंद फक्त दोनचीशहरात ४० पेक्षा अधिक खासगी शिकवणी वर्ग आहेत. परंतु त्यांनी मनपाच्या अग्निशमन विभागाकडून आगीसंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. केवळ नियोजित असलेल्या दोन शिकवण्याच्या इमारतीच्या नाहरकतसाठी नोंद झालेली आहे. खासगी शिकवणी वर्गाला परवानगी देण्याची जबाबदारी ही कामगार उपायुक्त कार्यालय आणि शिक्षणाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे खासगी शिकवणी वर्गाच्या नावाने नाहरकत दिलेली नसल्याचे म्हणत अग्निशमन विभागाच्या अधिकाºयांनी हात वर केले. शहरात शाळा, महाविद्यालय अशा सुमारे १४८ शैक्षणिक संस्था आहेत. त्यांना नाहरकत देण्यात आली आहे. परंतु त्यातही ८० पेक्षा अधिक संस्थांनी त्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे.सोमवारपासून नोटीस बजावणारखासगी शिकवणीला शिक्षणाधिकारी, कामगार उपायुक्त कार्यालयाकडून परवानगी देण्यात येते. शिवाय इमारत बांधताना तेथे खासगी शिकवणी वर्ग चालतील, असे सांगितले जात नाही. त्यामुळे शिकवणीच्या नावाने नाहरकत नाही. फक्त नियोजित दोन खासगी शिकवणीची नोंद झालेली आहे. सोमवारपासून शहरातील खासगी शिकवणीला नोटीस बजावल्या जातील.- आर. के. सुरे, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थीfireआग