शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

'जीव गेला तरी चालेल; परंतु नियम मोडणारच'; वाहनधारकांचे पोलिसांशी भांडणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 19:24 IST

ई- चलन आले तरीही वाहन धारक सुसाट

ठळक मुद्देनागरिकांनी मानसिकता बदलावी कायदा तोडला तर गुन्हे दाखल होणारच

औरंगाबाद :  वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून हुज्जत घालून कामात अडथळा निर्माण केला जातो. अनेकदा धक्काबुक्कीचे प्रसंग ओढावल्याच्या प्रकारात घट होण्याऐवजी त्यात वाढच होत आहे. 

मोबाईल किंवा व्हॉटस्अ‍ॅपवर दुचाकीस्वाराचा फोटो काढून तो आॅनलाईन पावतीसाठी टाकणे हा योग्य पर्याय आहे. रोख व्यवहारात पोलीस कर्मचारी अपहार करतात, असा नागरिकांतही गैरसमज झाला आहे. त्यामुळे ई-चालान दंड भरणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास तुम्हाला पोलीस हटकणार नाही, असे वाहतूक शाखेच्या पोलिसांचे म्हणणे आहे. नियम मोडणार आणि पोलिसांना पाहून न पाहिल्यागत करीत सुसाट वाहनावरून पळून जाणे हे नियमाविरुद्ध आहे. जीवन मौल्यवान आहे, धावत्या वाहनावर फोन वापरू नका, वाहतूक नियमांचे पालन करा, रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून द्या, असे समुपदेशन अनेकदा केले आहे. नियम मोडणाऱ्यांना पोलीस चौकीत किंवा ठाण्यात दिवसभर बसवून त्यांना किरकोळ दंड लावून सोडून दिल्याचे प्रकारही घडले आहेत; परंतु वाहतुकीचे नियम मोडण्यात अद्याप कुणी माघार घेतलेली नाही, तर फ्री स्टाईल हाणामारीपर्यंत अनेकदा प्रकरणे गेली आहेत. 

५ मे रोजी जळगाव रोडवर दुचाकीस्वार युवकाने नियम मोडला. त्याने आॅनलाईन चालान पाठविण्याची मागणी केली. चावी काढू नका मला अर्जंट काम आहे, असा आग्रह धरला, त्यासही पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली. वाहन चालविताना फोनवर बोलणाऱ्याला हटकले म्हणून वाहन चालविणाऱ्या दोघांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून ई-चालान मशीन हिसकावण्याचा प्रकार घडला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास गुलमंडीत घडली. वाहन पार्किंगच्या विषयावरून मारहाणीचा प्रकार गत दोन महिन्यांपूर्वी आमदार कार्यालयासमोर पुंडलिकनगर परिसरात घडला होता. सिल्लेखाना येथेही मारहाणीचा प्रकार घडला होता. ई-चालान द्या भांडणे होणार नाहीत, असा आग्रह जनसामान्यातून होत असून, वाहन अडवून त्याची चावी काढून घेणे, हा प्रकार वाहतूक कर्मचाऱ्यांनी टाळायला हवा. आॅनलाईन दंड, ई-चालानचा वापर करा,असे  त्रस्त वाहनचालकांचे म्हणणे आहे. 

कायदा तोडला तर गुन्हे दाखल होणारचवाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे म्हणाले की, कुणीही कायदा हातात घेऊ नये. चूक केल्यास गुन्हे दाखल होणारच. अपघात होऊ नये म्हणून नागरिकांनीच मानसिकता बदलावी. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद