शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

'जीव गेला तरी चालेल; परंतु नियम मोडणारच'; वाहनधारकांचे पोलिसांशी भांडणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 19:24 IST

ई- चलन आले तरीही वाहन धारक सुसाट

ठळक मुद्देनागरिकांनी मानसिकता बदलावी कायदा तोडला तर गुन्हे दाखल होणारच

औरंगाबाद :  वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून हुज्जत घालून कामात अडथळा निर्माण केला जातो. अनेकदा धक्काबुक्कीचे प्रसंग ओढावल्याच्या प्रकारात घट होण्याऐवजी त्यात वाढच होत आहे. 

मोबाईल किंवा व्हॉटस्अ‍ॅपवर दुचाकीस्वाराचा फोटो काढून तो आॅनलाईन पावतीसाठी टाकणे हा योग्य पर्याय आहे. रोख व्यवहारात पोलीस कर्मचारी अपहार करतात, असा नागरिकांतही गैरसमज झाला आहे. त्यामुळे ई-चालान दंड भरणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास तुम्हाला पोलीस हटकणार नाही, असे वाहतूक शाखेच्या पोलिसांचे म्हणणे आहे. नियम मोडणार आणि पोलिसांना पाहून न पाहिल्यागत करीत सुसाट वाहनावरून पळून जाणे हे नियमाविरुद्ध आहे. जीवन मौल्यवान आहे, धावत्या वाहनावर फोन वापरू नका, वाहतूक नियमांचे पालन करा, रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून द्या, असे समुपदेशन अनेकदा केले आहे. नियम मोडणाऱ्यांना पोलीस चौकीत किंवा ठाण्यात दिवसभर बसवून त्यांना किरकोळ दंड लावून सोडून दिल्याचे प्रकारही घडले आहेत; परंतु वाहतुकीचे नियम मोडण्यात अद्याप कुणी माघार घेतलेली नाही, तर फ्री स्टाईल हाणामारीपर्यंत अनेकदा प्रकरणे गेली आहेत. 

५ मे रोजी जळगाव रोडवर दुचाकीस्वार युवकाने नियम मोडला. त्याने आॅनलाईन चालान पाठविण्याची मागणी केली. चावी काढू नका मला अर्जंट काम आहे, असा आग्रह धरला, त्यासही पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली. वाहन चालविताना फोनवर बोलणाऱ्याला हटकले म्हणून वाहन चालविणाऱ्या दोघांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून ई-चालान मशीन हिसकावण्याचा प्रकार घडला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास गुलमंडीत घडली. वाहन पार्किंगच्या विषयावरून मारहाणीचा प्रकार गत दोन महिन्यांपूर्वी आमदार कार्यालयासमोर पुंडलिकनगर परिसरात घडला होता. सिल्लेखाना येथेही मारहाणीचा प्रकार घडला होता. ई-चालान द्या भांडणे होणार नाहीत, असा आग्रह जनसामान्यातून होत असून, वाहन अडवून त्याची चावी काढून घेणे, हा प्रकार वाहतूक कर्मचाऱ्यांनी टाळायला हवा. आॅनलाईन दंड, ई-चालानचा वापर करा,असे  त्रस्त वाहनचालकांचे म्हणणे आहे. 

कायदा तोडला तर गुन्हे दाखल होणारचवाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे म्हणाले की, कुणीही कायदा हातात घेऊ नये. चूक केल्यास गुन्हे दाखल होणारच. अपघात होऊ नये म्हणून नागरिकांनीच मानसिकता बदलावी. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद