शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

जिल्हानिहाय एसटी प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन शक्य आहे का? अहवाल दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:49 IST

समित्यांवरील कामाचा भार आणि न्यायालयातील हजारो याचिका कमी करण्यासाठी मुख्य सचिवांना आदेश

छत्रपती संभाजीनगर : राज्यात जिल्हानिहाय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करता येतील काय ? याचा अहवाल ४ आठवड्यात दाखल करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मनीष पितळे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी ११ जुलै रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले.

प्रमाणपत्र पडताळणी समित्यांपुढे दरवर्षी हजारो प्रकरणे दाखल होतात. त्याच्या कामाचा भार समित्यांवर पडतो. त्याचप्रमाणे प्रलंबित दाव्यांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयातही हजारो याचिका दाखल होतात. परिणामी न्यायालयावर सुद्धा कामाचा मोठा भार पडतो. हे लक्षात घेता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. त्याचप्रमाणे औरंगाबाद खंडपीठांतर्गतच्या समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांची माहितीही खंडपीठाने मागविली आहे.

काय आहे पार्श्वभूमी ?सध्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि किनवट येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या समितीकडे संभाजीनगर, जालना आणि परभणी व किनवट येथे दोन्ही समित्यांचे मुख्यालय असून मराठवाड्यातील उर्वरित जिल्हेही किनवटकडे येतात. किनवट समितीकडे एप्रिल २०२५ पर्यंत ५,९३४ प्रकरणे प्रलंबित आहेत.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षणाची तरतूद आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातही आरक्षणाची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधीत विद्यार्थ्याने ‘वैधता प्रमाणपत्र’ दाखल करणे अनिवार्य आहे. ११ वी आणि १२ वीला शिकत असताना शेकडो विद्यार्थी वैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडे प्रस्ताव दाखल करतात. परंतु शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे प्रस्ताव निकाली निघत नाहीत. परिणामी त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. ११ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार ६ महिन्यात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याच्या अटीवर आदिवासी उमेदवाराला शासकीय सेवेत नियुक्ती दिली जाते. मात्र, ६ महिन्यात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही तर सेवेतून कमी होण्याच्या भीतीपोटी त्यांनाही उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. या बाबींचा विचार करून खंडपीठाने २३ जून आणि ११ जुलै २०२५ ला वरीलप्रमाणे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. चंद्रकांत थोरात यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. ओमप्रकाश तोटावाड यांनी सहकार्य केले. शासनातर्फे ॲड. व्ही. एम. कागणे व ॲड. नेहा कांबळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठState Governmentराज्य सरकारEducation Sectorशिक्षण क्षेत्र