शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

जिल्हानिहाय एसटी प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन शक्य आहे का? अहवाल दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:49 IST

समित्यांवरील कामाचा भार आणि न्यायालयातील हजारो याचिका कमी करण्यासाठी मुख्य सचिवांना आदेश

छत्रपती संभाजीनगर : राज्यात जिल्हानिहाय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करता येतील काय ? याचा अहवाल ४ आठवड्यात दाखल करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मनीष पितळे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी ११ जुलै रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले.

प्रमाणपत्र पडताळणी समित्यांपुढे दरवर्षी हजारो प्रकरणे दाखल होतात. त्याच्या कामाचा भार समित्यांवर पडतो. त्याचप्रमाणे प्रलंबित दाव्यांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयातही हजारो याचिका दाखल होतात. परिणामी न्यायालयावर सुद्धा कामाचा मोठा भार पडतो. हे लक्षात घेता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. त्याचप्रमाणे औरंगाबाद खंडपीठांतर्गतच्या समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांची माहितीही खंडपीठाने मागविली आहे.

काय आहे पार्श्वभूमी ?सध्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि किनवट येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या समितीकडे संभाजीनगर, जालना आणि परभणी व किनवट येथे दोन्ही समित्यांचे मुख्यालय असून मराठवाड्यातील उर्वरित जिल्हेही किनवटकडे येतात. किनवट समितीकडे एप्रिल २०२५ पर्यंत ५,९३४ प्रकरणे प्रलंबित आहेत.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षणाची तरतूद आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातही आरक्षणाची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधीत विद्यार्थ्याने ‘वैधता प्रमाणपत्र’ दाखल करणे अनिवार्य आहे. ११ वी आणि १२ वीला शिकत असताना शेकडो विद्यार्थी वैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडे प्रस्ताव दाखल करतात. परंतु शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे प्रस्ताव निकाली निघत नाहीत. परिणामी त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. ११ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार ६ महिन्यात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याच्या अटीवर आदिवासी उमेदवाराला शासकीय सेवेत नियुक्ती दिली जाते. मात्र, ६ महिन्यात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही तर सेवेतून कमी होण्याच्या भीतीपोटी त्यांनाही उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. या बाबींचा विचार करून खंडपीठाने २३ जून आणि ११ जुलै २०२५ ला वरीलप्रमाणे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. चंद्रकांत थोरात यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. ओमप्रकाश तोटावाड यांनी सहकार्य केले. शासनातर्फे ॲड. व्ही. एम. कागणे व ॲड. नेहा कांबळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठState Governmentराज्य सरकारEducation Sectorशिक्षण क्षेत्र