शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

जिल्हानिहाय एसटी प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन शक्य आहे का? अहवाल दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:49 IST

समित्यांवरील कामाचा भार आणि न्यायालयातील हजारो याचिका कमी करण्यासाठी मुख्य सचिवांना आदेश

छत्रपती संभाजीनगर : राज्यात जिल्हानिहाय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करता येतील काय ? याचा अहवाल ४ आठवड्यात दाखल करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मनीष पितळे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी ११ जुलै रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले.

प्रमाणपत्र पडताळणी समित्यांपुढे दरवर्षी हजारो प्रकरणे दाखल होतात. त्याच्या कामाचा भार समित्यांवर पडतो. त्याचप्रमाणे प्रलंबित दाव्यांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयातही हजारो याचिका दाखल होतात. परिणामी न्यायालयावर सुद्धा कामाचा मोठा भार पडतो. हे लक्षात घेता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. त्याचप्रमाणे औरंगाबाद खंडपीठांतर्गतच्या समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांची माहितीही खंडपीठाने मागविली आहे.

काय आहे पार्श्वभूमी ?सध्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि किनवट येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या समितीकडे संभाजीनगर, जालना आणि परभणी व किनवट येथे दोन्ही समित्यांचे मुख्यालय असून मराठवाड्यातील उर्वरित जिल्हेही किनवटकडे येतात. किनवट समितीकडे एप्रिल २०२५ पर्यंत ५,९३४ प्रकरणे प्रलंबित आहेत.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षणाची तरतूद आहे. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातही आरक्षणाची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधीत विद्यार्थ्याने ‘वैधता प्रमाणपत्र’ दाखल करणे अनिवार्य आहे. ११ वी आणि १२ वीला शिकत असताना शेकडो विद्यार्थी वैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडे प्रस्ताव दाखल करतात. परंतु शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे प्रस्ताव निकाली निघत नाहीत. परिणामी त्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. ११ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार ६ महिन्यात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याच्या अटीवर आदिवासी उमेदवाराला शासकीय सेवेत नियुक्ती दिली जाते. मात्र, ६ महिन्यात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही तर सेवेतून कमी होण्याच्या भीतीपोटी त्यांनाही उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. या बाबींचा विचार करून खंडपीठाने २३ जून आणि ११ जुलै २०२५ ला वरीलप्रमाणे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. चंद्रकांत थोरात यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. ओमप्रकाश तोटावाड यांनी सहकार्य केले. शासनातर्फे ॲड. व्ही. एम. कागणे व ॲड. नेहा कांबळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठState Governmentराज्य सरकारEducation Sectorशिक्षण क्षेत्र