शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लहानशी टपरी ते हायफाय आऊटलेट; घोटभर घेताच तरतरी देणाऱ्या कपभर चहाचा देखणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:54 IST

International Tea Day : युनायटेड नेशन्सतर्फे २१ मे हा दिवस चहा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे

ठळक मुद्देभारतासह काही देशांमध्ये २००५ पासून १५ डिसेंबर हा दिवस चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. वाळूज, चिकलठाणा, औरंगाबाद शहर या भागात एकत्रितपणे महिन्याला तब्बल ३० टन चहाची विक्री होते.

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : कामानिमित्त बाहेर पडल्यावर चहाची तलफ लागली की, हमखास चहाची टपरी आठवायची. आता मात्र गरिबांच्या या अमृतामध्येही आमूलाग्र बदल झाला असून, लहानशी टपरी ते हायफाय आऊटलेट, असा देखणा प्रवास कपभर चहाने केला आहे.  युनायटेड नेशन्सतर्फे २१ मे हा दिवस चहा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे; परंतु चहाचे उत्पादन आणि खप सर्वाधिक असणाऱ्या भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनशिया,  बांगलादेश, केनिया,  मलेशिया, युगांडा, टान्झानिया, मालवी या देशांमध्ये, तसेच नेदरलँड, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि जर्मनी या देशांमध्ये २००५ पासून १५ डिसेंबर हा दिवस चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. चहा उत्पादक आणि व्यापारी यांच्याकडे जगाचे लक्ष वेधले जावे आणि चहाला योग्य भाव मिळून त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, या उद्देशाने चहा दिवस साजरा केला जातो.

औरंगाबाद शहरात आजघडीला २५० च्या आसपास चहाच्या टपऱ्या असून, जवळपास प्रत्येक हॉटेलमध्येच चहा मिळतो. फक्त चहाच्या टपऱ्यांमध्ये होणारी मासिक आर्थिक उलाढाल ही काही लाखांच्या घरात आहे. मागील ५ वर्षांत चहा विक्रीचा ट्रेण्डही बदलला असून, आता चहाची चकाचक आऊटलेट ग्राहकांना आकर्षित  करीत आहेत. सद्य:स्थितीत औरंगाबादमध्ये विविध ब्रँडच्या कंपन्यांची १० पेक्षाही अधिक आऊटलेट आहेत. पूर्वी अत्यंत कमी पैसा गुंतवून चहाची टपरी सुरू केली  जायची. आता मात्र चहाच्या आऊटलेटला मोठे ग्लॅमर मिळाले असून, एक आऊटलेट सुरू करण्यासाठी  लाखो रुपये गुंतवावे लागतात. 

औरंगाबादकर पितात महिन्याला ३० टन चहावाळूज, चिकलठाणा, औरंगाबाद शहर या भागात एकत्रितपणे महिन्याला तब्बल ३० टन चहाची विक्री होते. कोरोना काळात एकीकडे अद्रक, सुंठ, दालचिनी टाकून चहा पिण्याला महत्त्व आले होते, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे चहाचे उत्पादन थांबले होते. त्यामुळे मे नंतर चहाचे भाव १०० ते १५० रुपये वाढले. चहामध्ये एवढी विक्रमी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे व्यापारी अशोक रुणवाल यांनी सांगितले. मार्चपासून चहाची मागणी जवळपास ३० टक्क्यांनी वाढली आहे. चहाच्या विविध प्रकारांमध्ये चॉकलेट फ्लेव्हरच्या चहाला सर्वाधिक मागणी असून, त्याखालोखाल इलायची फ्लेव्हर विकला जातो. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न