शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

लहानशी टपरी ते हायफाय आऊटलेट; घोटभर घेताच तरतरी देणाऱ्या कपभर चहाचा देखणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:54 IST

International Tea Day : युनायटेड नेशन्सतर्फे २१ मे हा दिवस चहा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे

ठळक मुद्देभारतासह काही देशांमध्ये २००५ पासून १५ डिसेंबर हा दिवस चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. वाळूज, चिकलठाणा, औरंगाबाद शहर या भागात एकत्रितपणे महिन्याला तब्बल ३० टन चहाची विक्री होते.

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : कामानिमित्त बाहेर पडल्यावर चहाची तलफ लागली की, हमखास चहाची टपरी आठवायची. आता मात्र गरिबांच्या या अमृतामध्येही आमूलाग्र बदल झाला असून, लहानशी टपरी ते हायफाय आऊटलेट, असा देखणा प्रवास कपभर चहाने केला आहे.  युनायटेड नेशन्सतर्फे २१ मे हा दिवस चहा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे; परंतु चहाचे उत्पादन आणि खप सर्वाधिक असणाऱ्या भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनशिया,  बांगलादेश, केनिया,  मलेशिया, युगांडा, टान्झानिया, मालवी या देशांमध्ये, तसेच नेदरलँड, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि जर्मनी या देशांमध्ये २००५ पासून १५ डिसेंबर हा दिवस चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. चहा उत्पादक आणि व्यापारी यांच्याकडे जगाचे लक्ष वेधले जावे आणि चहाला योग्य भाव मिळून त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा, या उद्देशाने चहा दिवस साजरा केला जातो.

औरंगाबाद शहरात आजघडीला २५० च्या आसपास चहाच्या टपऱ्या असून, जवळपास प्रत्येक हॉटेलमध्येच चहा मिळतो. फक्त चहाच्या टपऱ्यांमध्ये होणारी मासिक आर्थिक उलाढाल ही काही लाखांच्या घरात आहे. मागील ५ वर्षांत चहा विक्रीचा ट्रेण्डही बदलला असून, आता चहाची चकाचक आऊटलेट ग्राहकांना आकर्षित  करीत आहेत. सद्य:स्थितीत औरंगाबादमध्ये विविध ब्रँडच्या कंपन्यांची १० पेक्षाही अधिक आऊटलेट आहेत. पूर्वी अत्यंत कमी पैसा गुंतवून चहाची टपरी सुरू केली  जायची. आता मात्र चहाच्या आऊटलेटला मोठे ग्लॅमर मिळाले असून, एक आऊटलेट सुरू करण्यासाठी  लाखो रुपये गुंतवावे लागतात. 

औरंगाबादकर पितात महिन्याला ३० टन चहावाळूज, चिकलठाणा, औरंगाबाद शहर या भागात एकत्रितपणे महिन्याला तब्बल ३० टन चहाची विक्री होते. कोरोना काळात एकीकडे अद्रक, सुंठ, दालचिनी टाकून चहा पिण्याला महत्त्व आले होते, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे चहाचे उत्पादन थांबले होते. त्यामुळे मे नंतर चहाचे भाव १०० ते १५० रुपये वाढले. चहामध्ये एवढी विक्रमी वाढ होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे व्यापारी अशोक रुणवाल यांनी सांगितले. मार्चपासून चहाची मागणी जवळपास ३० टक्क्यांनी वाढली आहे. चहाच्या विविध प्रकारांमध्ये चॉकलेट फ्लेव्हरच्या चहाला सर्वाधिक मागणी असून, त्याखालोखाल इलायची फ्लेव्हर विकला जातो. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न