शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

शहरातील सर्व उड्डाणपुलांची तपासणी करुन अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 1:19 PM

शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेसंदर्भात ॲड. रुपेश जैस्वाल यांनी व्यक्तीश: दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले.

ठळक मुद्देमहापालिका आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला खंडपीठाचे निर्देश

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सर्व उड्डाणपुलांची तपासणी करुन १८ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे ( Aurangabad High Court) न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी ११ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद महापालिका ( Aurangabad Municipal Corporation ) आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ( Goverment Engineering College ) यांना दिले आहेत. शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेसंदर्भात ॲड. रुपेश जैस्वाल यांनी व्यक्तीश: दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले. शिवाजीनगरचा भुयारी मार्ग आणि शहरातील १२ रस्त्यांसंदर्भात २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

खंडपीठाच्या पूर्वीच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकालगतच्या उड्डाणपुलाचा तपासणी अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. गणेश केशवराव पाटील यांनी खंडपीठात सादर केला. या उड्डाणपुलावर नुकताच महापालिकेने डांबराचा थर टाकला आहे. रस्त्यावरील डांबरीकरणाची जाडी ८० मि. मी. असायला हवी, परंतु येथे ती ५० मि. मी.च आहे. ९० टक्केच काम झाले आहे. या रस्त्यावर गंभीर त्रुटी आहेत. रस्त्यावर थर्मोप्लास्टिक पेन्ट, कॅट आईज आणि रम्बल स्ट्रीप (स्पीड ब्रेकरवरील रबरी पट्ट्या) लावलेल्या नाहीत, असे ॲड. एस. एस. गंगाखेडकर यांनी शपथपत्राआधारे खंडपीठाच्या निदर्शनाला आणून दिले असता, खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.

शिवाजीनगरचा भुयारी मार्ग- सद्य:स्थितीशिवाजीनगरच्या भुयारी मार्गाच्या खर्चाला आर्थिक संमती द्या, असे निर्देश खंडपीठाने राज्य शासन आणि रेल्वे बोर्डाला १७ जुलै रोजी दिले आहेत. या दुहेरी भुयारी मार्गामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे. शिवाजीनगर येथील दुहेरी भुयारी मार्गाच्या कामाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. या मार्गास प्रत्येकी अडीच कोटी असे एकूण ५ कोटी रुपये खर्च रेल्वेला येणार असल्याचे आणि संपूर्ण कामाला ३६.६० कोटी खर्च येणार असल्याचे ॲड. मनीष नावंदर यांनी रेल्वे बोर्डातर्फे खंडपीठाला सांगितले होते. येथील एका बाजूचा भुयारी मार्ग रेल्वे आणि दुसरा महापालिका तयार करणार आहे. यासाठी भूसंपादनाची कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली असून शासनाकडून आर्थिक मंजुरी मिळताच काम सुरु होईल, असे महापालिकेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी सांगितले होते. शासनाच्यावतीने राज्य रस्ते महामंडळ निम्मे काम करणार असल्याचे जागतिक बँकेचे कार्यकारी अभियंता नरसिंग भांडे यांनी शपथपत्रात म्हटले होते.

शहरातील या १२ रस्त्यांसंदर्भात होणार सुनावणीमहापालिकेतर्फे विविध योजनांतर्गत तयार केलेल्या शहरातील १२ रस्त्यांची ‘त्रयस्थ पाहणी’ (थर्ड पार्टी इन्स्पेक्शन) करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला दिले होते. त्यात १. दीपाली हॉटेल ते जयभवानी चौक रस्ता २. जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्थानकापर्यंतचा रस्ता ३. जालाननगर रेल्वे उड्डाण पुलावरील रस्ता ४. व्होक्हार्ट ते नारेगाव रस्ता ५. रेल्वेस्थानक ते तिरुपती एन्क्लेव्ह पर्यंतचा रस्ता ६. पुंडलिकनगर ते कामगार चौक रस्ता ७. एन-२ भवानी पेट्रोलपंप ते ठाकरेनगर रस्ता ८. महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी ९. जालना रोड ते ॲपेक्स हॉस्पिटल १०. अग्रसेन चौक ते सेंट्रल एक्साईज रस्ता ११.जळगाव रोड ते अजंटा ॲम्बेसडर पर्यंतचा रस्ता १२. अमरप्रीत हॉटेल ते एकता चौक पर्यंतचा रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद