शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

केंद्रीय पथक पाहणी करून गेल्यानंतर पुन्हा मागविली दुष्काळाची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:32 IST

शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार असा प्रश्न आहे. 

ठळक मुद्देअहवालांच्या चक्रात दुष्काळ  केंद्रीय पथकाचे वरातीमागून घोडे 

औरंगाबाद : राज्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागाला दुष्काळाचा फटका बसला आहे. त्या अनुषंगाने शासकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मदत कोणत्या आधारावर द्यावी, यासाठी केंद्रीय पथकाने गेल्या आठवड्यात पाहणी केल्यानंतर पुन्हा येथील दुष्काळी स्थितीची माहिती मागविली आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार असा प्रश्न आहे. 

सरकारने महसूल आणि कृषी विभागाच्या राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. त्यात मराठवाड्यातील खरीप हंगाम दुष्काळ व कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेला. मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान आले. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांत पथकाने पाहणी केली. 

यात इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा, कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए. के. तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना, केंद्रीय जलसमितीचे संचालक आर.डी. देशपांडे, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर आदींचा समावेश होता. 

पाहणीत नेमके काय केले औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील काही गावांची पाहणी करून शेतकऱ्यांशी केंद्रीय पथकाने संवाद साधला. शेतकऱ्यांच्या नावासह त्यांच्या मागण्या पथकातील प्रमुख अधिकाऱ्याने नोंदवून घेतल्या. आता पाहणीसंबंधीचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत केंद्रीय पातळीवरून मागविण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने पाहणीत नेमके काय केले, असा प्रश्न आहे. पथकाने ज्या गावास भेटी दिल्या तेथील गट क्रमांक, शेतकऱ्यांची नावे, पीक परिस्थितीचा अहवाल विभागीय प्रशासनाला मागविला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणीFarmerशेतकरी