शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद शहराध्यक्षांबद्दल वाढत्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 19:21 IST

विजय साळवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची फारच लवकर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली

ठळक मुद्देशहराध्यक्षांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह पदाधिकाऱ्यांबाबत कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय साळवे यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक कार्यकर्ते प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून, त्यांच्याबद्दलच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

काशीनाथ कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विजय साळवे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बनले. यातून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मराठ्यांचा पक्ष, ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाचे एक नेते कदीर मौलाना यांच्या आग्रहामुळे विजय साळवे यांची ही नियुक्ती झाली. कार्याध्यक्ष म्हणून अभिषेक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली व दलित-मराठा, असे संतुलन साधण्यात आले. 

विजय साळवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची फारच लवकर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली, त्यावेळी प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांची नियुक्ती झाल्यापासून विशेषत: जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तिखट प्रतिक्रिया उमटली व त्यांचे राष्ट्रवादी भवनात जाणे कमी झाले. मध्यंतरी राज्याचे अल्संख्याकमंत्री नवाब मलिक हे आले असताना त्यांच्यासमोरच राष्ट्रवादी भवनात माजी शहराध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. आम्हाला मान नसेल, तर आम्ही राष्ट्रवादी भवनात का यावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 

शुक्रवारी मुश्ताक अहमद म्हणाले, विजय साळवे यांना बदलले पाहिजे, अशी मागणी आम्ही वरपर्यंत अगदी शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत केली आहे. आजही आम्ही या मागणीवर ठाम आहोत व शहराला लवकरात लवकर मुस्लिम शहराध्यक्ष देऊन न्याय दिला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व निष्ठावंत कार्यकर्ते मोतीलाल जगताप म्हणाले, शहराध्यक्ष हे जबाबदारीचे पद असून, विद्यमान अध्यक्ष हे त्याचे भान ठेवून काम करतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मनपा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सातत्याने राष्ट्रवादी भवनात बैठका, कार्यक्रम होत असतात. इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक यांच्यामुळे राष्ट्रवादी भवनात गर्दी वाढू लागली आहे; परंतु मारहाणीसारखे प्रकार घडत असतील, तर आमच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांवरची नाराजी वाढत चालली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका