शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 19:55 IST

शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला.

- केशव पवारबनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह परिसरातील मिरची पिकावर कोकडा, चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक वाळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नाइलाजाने हे पीक शेतकरी उपटून फेकत असल्याचे चित्र शेत-शिवारात पाहावयास मिळत आहे.

सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, बाभूळगाव बु., निल्लोड, चिंचखेडा, भवन, तलवाडा, भायगाव, वरखेडी, गेवराई सेमी, कायगाव, गव्हाली आदी शेत-शिवारातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून उन्हाळी मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मागील वर्षी मिरचीला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात मिरची पिकाची जेमतम पाण्यावर मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. तालुक्यात गेल्या वर्षी ३ हजार ६०० हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी ८ हजार २१२ हेक्टरवर लागवड करण्यात आली. असे असले तरी या पिकावर मोठ्या प्रमाणात कोकड, चुरडा - मुरडा आदी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. 

या विषाणूजन्य रोगामुळे झाडाच्या शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर पडून वेडीवाकडी वरखाली वळलेली दिसत आहेत. रोगग्रस्त झाडाला फुले कमी लागत आहेत किंवा फुले लागणेसुद्धा बंद झाले आहे. फळे लागली तरी ती कमी आकाराची दिसत असून झाडाची वाढ खुटत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी विविध रासायनिक द्रव्याच्या फवारण्या केल्या; परंतु त्याचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे वैतागलेले शेतकरी आता शेतातील हे पीक उपटून फेकत आहेत. याबाबत भायगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर भगत म्हणाले, मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नाइलाजाने हे पीक उपटून फेकावे लागले. आता रिकाम्या झालेल्या शेतात मका व कोबीची लागवड सुरू केली आहे. मिरची लागवडीत झालेले नुकसान यातून भरून निघेल, अशी अपेक्षा आहे, असे भगत म्हणाले.

लागवडीसाठी ७० ते ८० हजारांचा खर्चशेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला. मिरची पिकावर औषध फवारणीचा खर्च वेगळा करावा लागला; परंतु आता या पिकावर कोकडा, चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक उपटून फेकावे लागत आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीसाठी आणि औषधी फवारणीसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी