शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 19:55 IST

शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला.

- केशव पवारबनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह परिसरातील मिरची पिकावर कोकडा, चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक वाळत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. नाइलाजाने हे पीक शेतकरी उपटून फेकत असल्याचे चित्र शेत-शिवारात पाहावयास मिळत आहे.

सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, बाभूळगाव बु., निल्लोड, चिंचखेडा, भवन, तलवाडा, भायगाव, वरखेडी, गेवराई सेमी, कायगाव, गव्हाली आदी शेत-शिवारातील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून उन्हाळी मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मागील वर्षी मिरचीला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात मिरची पिकाची जेमतम पाण्यावर मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. तालुक्यात गेल्या वर्षी ३ हजार ६०० हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी ८ हजार २१२ हेक्टरवर लागवड करण्यात आली. असे असले तरी या पिकावर मोठ्या प्रमाणात कोकड, चुरडा - मुरडा आदी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. 

या विषाणूजन्य रोगामुळे झाडाच्या शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर पडून वेडीवाकडी वरखाली वळलेली दिसत आहेत. रोगग्रस्त झाडाला फुले कमी लागत आहेत किंवा फुले लागणेसुद्धा बंद झाले आहे. फळे लागली तरी ती कमी आकाराची दिसत असून झाडाची वाढ खुटत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी विविध रासायनिक द्रव्याच्या फवारण्या केल्या; परंतु त्याचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे वैतागलेले शेतकरी आता शेतातील हे पीक उपटून फेकत आहेत. याबाबत भायगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर भगत म्हणाले, मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नाइलाजाने हे पीक उपटून फेकावे लागले. आता रिकाम्या झालेल्या शेतात मका व कोबीची लागवड सुरू केली आहे. मिरची लागवडीत झालेले नुकसान यातून भरून निघेल, अशी अपेक्षा आहे, असे भगत म्हणाले.

लागवडीसाठी ७० ते ८० हजारांचा खर्चशेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला. मिरची पिकावर औषध फवारणीचा खर्च वेगळा करावा लागला; परंतु आता या पिकावर कोकडा, चुरडा, मुरडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हे पीक उपटून फेकावे लागत आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीसाठी आणि औषधी फवारणीसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी