शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
3
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
4
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
5
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
6
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
7
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
8
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
9
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
10
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
11
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
12
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
13
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
14
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
15
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
16
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
17
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
18
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
19
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान

By स. सो. खंडाळकर | Updated: December 26, 2022 19:25 IST

या सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती.

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, धुळे, जळगाव, दिंडोरी, जालना या लोकसभा मतदारसंघांत जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणावर असून या मतदारसंघात आपण किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याची सूचक प्रतिक्रिया या परिवाराचे प्रमुख स्वामी शांतीगिरी महाराज यांनी गुरुवारी व्यक्त केली.

वेरुळच्या आश्रमात या प्रतिनिधीने शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. यावेळी शांतीगिरी महाराजांचे उत्तराधिकारी रामानंद स्वामी महाराज हेही उपस्थित होते. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उभे राहून शांतीगिरी महाराजांना मिळालेली मते आजही सर्वांच्याच स्मरणात आहेत. तेव्हापासूनच महाराजांचे ‘राजकीय मूल्य’ राजकारण्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांची भेट व्हावी, यासाठी राजकारण्यांमध्ये जणू स्पर्धाच सुरू झाली.

मागच्या वेळेचा पाठिंबा असा होता....मागील लोकसभा निवडणुकीत जय बाबाजी भक्त परिवाराने रावसाहेब दानवे (जालना), हर्षवर्धन जाधव (औरंगाबाद), डॉ. सुभाष भामरे ( धुळे), सदाशिव लोखंडे (शिर्डी), भारती पवार (दिंडोरी), हेमंत गोडसे (नाशिक) या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा दिला होता.

राष्ट्रहित आणि नरेंद्र मोदी यांना समर्थनराष्ट्रहितासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ हा पाठिंबा दिला गेला होता, पण शांतीगिरी महाराजांनी मनात आणले तर ते याच सात लोकसभा मतदासंघांतील राजकीय समीकरण बिघडवू शकतात. आणखी दहा वर्षे तरी नरेंद्र मोदी यांची देशाला गरज असल्याचे त्यांचे मत आहे. किंगमेकरची भूमिका बजावयाची आहे असे म्हणत असताना मतदारांनी त्यांना बिनविरोध संसदेत पाठवावे, अशी महाराजांच्या शिष्यसंप्रदायाची सुप्त इच्छाही लपून राहत नाही.

नरेंद्र मोदी यांची मागेच भेटया सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती. निवडून आलेल्या खासदारांनी शांतीगिरी महाराजांचे आपल्या विजयातील योगदान मोठे असल्याचे सांगितले होते. कसलीही अपेक्षा न ठेवता देशहितासाठी त्यावेळी आम्ही तो निर्णय घेतला होता. परंतु, शांतीगिरी महाराजांना संसदेत येऊ देणं व त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणावर देशसेवा घडू देणंही गरजेचे असल्याचे त्यांच्या शिष्यवृंदांना वाटते. ३१ डिसेंबर रोजी वेरुळच्या आश्रमात अध्यात्म व श्रमदानाच्या निमित्ताने बाबाजींचा शिष्यवृंद एकत्र येणार आहे. त्यावेळी या मुद्यावर चर्चा होऊ शकेल, असे बोलले जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा