शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान

By स. सो. खंडाळकर | Updated: December 26, 2022 19:25 IST

या सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती.

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, धुळे, जळगाव, दिंडोरी, जालना या लोकसभा मतदारसंघांत जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणावर असून या मतदारसंघात आपण किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याची सूचक प्रतिक्रिया या परिवाराचे प्रमुख स्वामी शांतीगिरी महाराज यांनी गुरुवारी व्यक्त केली.

वेरुळच्या आश्रमात या प्रतिनिधीने शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. यावेळी शांतीगिरी महाराजांचे उत्तराधिकारी रामानंद स्वामी महाराज हेही उपस्थित होते. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उभे राहून शांतीगिरी महाराजांना मिळालेली मते आजही सर्वांच्याच स्मरणात आहेत. तेव्हापासूनच महाराजांचे ‘राजकीय मूल्य’ राजकारण्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांची भेट व्हावी, यासाठी राजकारण्यांमध्ये जणू स्पर्धाच सुरू झाली.

मागच्या वेळेचा पाठिंबा असा होता....मागील लोकसभा निवडणुकीत जय बाबाजी भक्त परिवाराने रावसाहेब दानवे (जालना), हर्षवर्धन जाधव (औरंगाबाद), डॉ. सुभाष भामरे ( धुळे), सदाशिव लोखंडे (शिर्डी), भारती पवार (दिंडोरी), हेमंत गोडसे (नाशिक) या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा दिला होता.

राष्ट्रहित आणि नरेंद्र मोदी यांना समर्थनराष्ट्रहितासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ हा पाठिंबा दिला गेला होता, पण शांतीगिरी महाराजांनी मनात आणले तर ते याच सात लोकसभा मतदासंघांतील राजकीय समीकरण बिघडवू शकतात. आणखी दहा वर्षे तरी नरेंद्र मोदी यांची देशाला गरज असल्याचे त्यांचे मत आहे. किंगमेकरची भूमिका बजावयाची आहे असे म्हणत असताना मतदारांनी त्यांना बिनविरोध संसदेत पाठवावे, अशी महाराजांच्या शिष्यसंप्रदायाची सुप्त इच्छाही लपून राहत नाही.

नरेंद्र मोदी यांची मागेच भेटया सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती. निवडून आलेल्या खासदारांनी शांतीगिरी महाराजांचे आपल्या विजयातील योगदान मोठे असल्याचे सांगितले होते. कसलीही अपेक्षा न ठेवता देशहितासाठी त्यावेळी आम्ही तो निर्णय घेतला होता. परंतु, शांतीगिरी महाराजांना संसदेत येऊ देणं व त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणावर देशसेवा घडू देणंही गरजेचे असल्याचे त्यांच्या शिष्यवृंदांना वाटते. ३१ डिसेंबर रोजी वेरुळच्या आश्रमात अध्यात्म व श्रमदानाच्या निमित्ताने बाबाजींचा शिष्यवृंद एकत्र येणार आहे. त्यावेळी या मुद्यावर चर्चा होऊ शकेल, असे बोलले जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा