शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सात महिन्यांत छत्रपती संभाजीनगर शहर अन् जिल्ह्यात १७९ चिमुकल्या पडल्या अत्याचाराला बळी

By सुमित डोळे | Updated: August 28, 2024 20:11 IST

दिवसाला सरासरी पाच महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्याच्या घटना

छत्रपती संभाजीनगर : देशभरात महिला सुरक्षा व अत्याचाराच्या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे. मात्र, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहरात मिळून गेल्या ७ महिन्यांत तब्बल १७९ अल्पवयीन मुली पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. त्याव्यतिरिक्त दिवसाला सरासरी ५ महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्याच्या घटना घडत असल्याची धक्कादायक बाब पोलिस अहवालातून समोर आली आहे.

कोलकाता आणि बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला. कन्नड तालुक्यात नुकतेच एका आश्रमात १३ वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. शहरात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसमोरच पँट काढून अश्लील कृत्य केल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अत्याचार, विनयभंगाला अल्पवयीन मुली बळी पडण्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारलं आहे. लोकांनी आवाज उठवल्यावरच कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या ब्रीदवाक्याची आठवण करून देण्याची गरज असल्याची टिपण्णीदेखील न्यायालयाने केली.

सात महिन्यांतील आकडेवारी काय सांगते?जिल्हागुन्ह्यांचे स्वरूप - दाखल गुन्हेबलात्कार - २५विनयभंग - १७२बलात्कार (अल्पवयीन मुलींसोबत) - ६०विनयभंग (अल्पवयीन मुलींसोबत) - ३३

शहरबलात्कार - ७०विनयभंग - १५६

बलात्कार (अल्पवयीन मुलींसोबत) - ३९विनयभंग (अल्पवयीन मुलींसोबत) - ४७

तीन वर्षांत पोक्सो गुन्ह्यांत मोठी वाढगुन्हा             - २०२१ २०२२ २०२३बलात्कार - १०० -९९ - १०२विनयभंग - २२१ - २९२ - ३६९

कौटुंबिक छळात महिलांचा बळीएकीकडे आर्थिक स्थैर्य आले असताना कौटुंबिक कलहात कमालीची वाढ होत आहे. यात महिलांना अन्याय सहन करावा लागतोय. गेल्या तीन वर्षांत शहर व जिल्ह्यात पती-पत्नीच्या वादाच्या ५,२१३ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी केवळ १,१९९ दाम्पत्यांमध्ये समेट झाला. उर्वरित सर्व प्रकरणात महिलांना न्यायालय, पोलिस ठाण्यांचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कौटुंबिक छळाच्या तक्रारींची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, दीड वर्षात हेच प्रमाण कमालीचे वाढले. जानेवारी २०२३ ते मे २०२४ दरम्यान कौटुंबिक वादाच्या ५६८ तक्रारी प्राप्त झाल्या.

ढासळती मूल्यव्यवस्था कारणीभूतअत्याचारासारख्या वाढत्या घटना ढासळत चालेल्या मूल्यवस्थेचे लक्षण आहे. माणसांवर नातेसंबंध, समाजाचा प्रभाव कमी होत आहे. सिनेमा, नव्याने आलेला वेब सिरीजचा घसरलेल्या दर्जाचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतोय. कोणालाही नीतिमत्ता राहिली नाही. आदर्शांचा मोठा अभाव या पिढीमध्ये आहे. पूर्वीप्रमाणे कायदा, पोलिसांचा धाक राहिला नाही. येथे प्रत्येक जण स्वकेंद्री, व्यक्तिवादी झालाय. यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.-डॉ. स्मिता अवचार, समाजशास्त्र अभ्यासक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद