शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

सात महिन्यांत छत्रपती संभाजीनगर शहर अन् जिल्ह्यात १७९ चिमुकल्या पडल्या अत्याचाराला बळी

By सुमित डोळे | Updated: August 28, 2024 20:11 IST

दिवसाला सरासरी पाच महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्याच्या घटना

छत्रपती संभाजीनगर : देशभरात महिला सुरक्षा व अत्याचाराच्या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे. मात्र, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहरात मिळून गेल्या ७ महिन्यांत तब्बल १७९ अल्पवयीन मुली पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. त्याव्यतिरिक्त दिवसाला सरासरी ५ महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्याच्या घटना घडत असल्याची धक्कादायक बाब पोलिस अहवालातून समोर आली आहे.

कोलकाता आणि बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला. कन्नड तालुक्यात नुकतेच एका आश्रमात १३ वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. शहरात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसमोरच पँट काढून अश्लील कृत्य केल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अत्याचार, विनयभंगाला अल्पवयीन मुली बळी पडण्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारलं आहे. लोकांनी आवाज उठवल्यावरच कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या ब्रीदवाक्याची आठवण करून देण्याची गरज असल्याची टिपण्णीदेखील न्यायालयाने केली.

सात महिन्यांतील आकडेवारी काय सांगते?जिल्हागुन्ह्यांचे स्वरूप - दाखल गुन्हेबलात्कार - २५विनयभंग - १७२बलात्कार (अल्पवयीन मुलींसोबत) - ६०विनयभंग (अल्पवयीन मुलींसोबत) - ३३

शहरबलात्कार - ७०विनयभंग - १५६

बलात्कार (अल्पवयीन मुलींसोबत) - ३९विनयभंग (अल्पवयीन मुलींसोबत) - ४७

तीन वर्षांत पोक्सो गुन्ह्यांत मोठी वाढगुन्हा             - २०२१ २०२२ २०२३बलात्कार - १०० -९९ - १०२विनयभंग - २२१ - २९२ - ३६९

कौटुंबिक छळात महिलांचा बळीएकीकडे आर्थिक स्थैर्य आले असताना कौटुंबिक कलहात कमालीची वाढ होत आहे. यात महिलांना अन्याय सहन करावा लागतोय. गेल्या तीन वर्षांत शहर व जिल्ह्यात पती-पत्नीच्या वादाच्या ५,२१३ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी केवळ १,१९९ दाम्पत्यांमध्ये समेट झाला. उर्वरित सर्व प्रकरणात महिलांना न्यायालय, पोलिस ठाण्यांचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कौटुंबिक छळाच्या तक्रारींची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, दीड वर्षात हेच प्रमाण कमालीचे वाढले. जानेवारी २०२३ ते मे २०२४ दरम्यान कौटुंबिक वादाच्या ५६८ तक्रारी प्राप्त झाल्या.

ढासळती मूल्यव्यवस्था कारणीभूतअत्याचारासारख्या वाढत्या घटना ढासळत चालेल्या मूल्यवस्थेचे लक्षण आहे. माणसांवर नातेसंबंध, समाजाचा प्रभाव कमी होत आहे. सिनेमा, नव्याने आलेला वेब सिरीजचा घसरलेल्या दर्जाचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतोय. कोणालाही नीतिमत्ता राहिली नाही. आदर्शांचा मोठा अभाव या पिढीमध्ये आहे. पूर्वीप्रमाणे कायदा, पोलिसांचा धाक राहिला नाही. येथे प्रत्येक जण स्वकेंद्री, व्यक्तिवादी झालाय. यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.-डॉ. स्मिता अवचार, समाजशास्त्र अभ्यासक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद