शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

सात महिन्यांत छत्रपती संभाजीनगर शहर अन् जिल्ह्यात १७९ चिमुकल्या पडल्या अत्याचाराला बळी

By सुमित डोळे | Updated: August 28, 2024 20:11 IST

दिवसाला सरासरी पाच महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्याच्या घटना

छत्रपती संभाजीनगर : देशभरात महिला सुरक्षा व अत्याचाराच्या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे. मात्र, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहरात मिळून गेल्या ७ महिन्यांत तब्बल १७९ अल्पवयीन मुली पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. त्याव्यतिरिक्त दिवसाला सरासरी ५ महिलांसोबत आक्षेपार्ह कृत्याच्या घटना घडत असल्याची धक्कादायक बाब पोलिस अहवालातून समोर आली आहे.

कोलकाता आणि बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून गेला. कन्नड तालुक्यात नुकतेच एका आश्रमात १३ वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. शहरात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीसमोरच पँट काढून अश्लील कृत्य केल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अत्याचार, विनयभंगाला अल्पवयीन मुली बळी पडण्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारलं आहे. लोकांनी आवाज उठवल्यावरच कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांच्या ब्रीदवाक्याची आठवण करून देण्याची गरज असल्याची टिपण्णीदेखील न्यायालयाने केली.

सात महिन्यांतील आकडेवारी काय सांगते?जिल्हागुन्ह्यांचे स्वरूप - दाखल गुन्हेबलात्कार - २५विनयभंग - १७२बलात्कार (अल्पवयीन मुलींसोबत) - ६०विनयभंग (अल्पवयीन मुलींसोबत) - ३३

शहरबलात्कार - ७०विनयभंग - १५६

बलात्कार (अल्पवयीन मुलींसोबत) - ३९विनयभंग (अल्पवयीन मुलींसोबत) - ४७

तीन वर्षांत पोक्सो गुन्ह्यांत मोठी वाढगुन्हा             - २०२१ २०२२ २०२३बलात्कार - १०० -९९ - १०२विनयभंग - २२१ - २९२ - ३६९

कौटुंबिक छळात महिलांचा बळीएकीकडे आर्थिक स्थैर्य आले असताना कौटुंबिक कलहात कमालीची वाढ होत आहे. यात महिलांना अन्याय सहन करावा लागतोय. गेल्या तीन वर्षांत शहर व जिल्ह्यात पती-पत्नीच्या वादाच्या ५,२१३ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी केवळ १,१९९ दाम्पत्यांमध्ये समेट झाला. उर्वरित सर्व प्रकरणात महिलांना न्यायालय, पोलिस ठाण्यांचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कौटुंबिक छळाच्या तक्रारींची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, दीड वर्षात हेच प्रमाण कमालीचे वाढले. जानेवारी २०२३ ते मे २०२४ दरम्यान कौटुंबिक वादाच्या ५६८ तक्रारी प्राप्त झाल्या.

ढासळती मूल्यव्यवस्था कारणीभूतअत्याचारासारख्या वाढत्या घटना ढासळत चालेल्या मूल्यवस्थेचे लक्षण आहे. माणसांवर नातेसंबंध, समाजाचा प्रभाव कमी होत आहे. सिनेमा, नव्याने आलेला वेब सिरीजचा घसरलेल्या दर्जाचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतोय. कोणालाही नीतिमत्ता राहिली नाही. आदर्शांचा मोठा अभाव या पिढीमध्ये आहे. पूर्वीप्रमाणे कायदा, पोलिसांचा धाक राहिला नाही. येथे प्रत्येक जण स्वकेंद्री, व्यक्तिवादी झालाय. यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.-डॉ. स्मिता अवचार, समाजशास्त्र अभ्यासक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद