शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांसाठी फोडले ३०० किमीचे रस्ते, दुरुस्ती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 19:21 IST

जलवाहिन्यां टाकण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रस्त्यांची दुरुस्ती सुरू

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरात १८०० किमीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यातील ९३० किमी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. अनेक ठिकाणी सिमेंट आणि डांबरी रस्ते खोदावे लागले. ३०० किमी रस्ते खराब झाले. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जीव्हीपीआर कंपनीमार्फत रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. ही प्रक्रिया बरेच दिवस चालणार असल्याचे मजीप्रा अधिकाऱ्यांनी सांगितले.

खंडपीठाच्या आदेशानुसार जलवाहिन्यांसाठी रस्ते खोदण्यास सुरुवात झाली. महापालिकेने रस्ते खोदण्यापूर्वीच दुरुस्तीची अटही घातली. त्यानुसार रस्ते फोडण्यात आले. काही भागात नागरिकांनी रस्ते खोदण्यासाठी विरोध दर्शविला. त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर विरोध मावळला. सातारा-देवळाई आणि जुन्या शहरात अलीकडेच मनपाने कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट, डांबरी रस्ते तयार केले आहेत. ते रस्ते फोडण्याची नामुष्की येत आहे. रस्ते फोडण्याशिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पर्याय नाही. आतापर्यंत ३०० किमी लांबीचे रस्ते फोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कंपनीकडून रस्ते दुरुस्त करून घेतले जात आहेत. जुन्या शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदावे लागणार आहेत.

रस्ते दुरुस्तीची पद्धत अशीज्या ठिकाणी रस्ते फोडले तेथे अगोदर माती टाकण्यात येते. किमान ही माती सहा ते आठ महिने मोकळी सोडली जाते. पावसाने आणि वाहनांच्या वर्दळीने माती सेट झाली पाहिजे. दुरुस्तीपूर्वी खडीकरण केले जाते. त्यानंतर खडी सेट झाल्यावर डांबरीकरण किंवा सिमेंट पद्धतीने दुरुस्ती केली जाते.

रस्ता त्वरित दुरुस्त कराअनेक ठिकाणी जलवाहिनी टाकल्यानंतर नागरिक रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करीत आहेत. ताबडतोब रस्ता दुरुस्त करताच येत नाही. केला तरी तो जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सहा ते आठ महिन्यांचा वेळ गेल्यानंतरच रस्ते दुरुस्त करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी