शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विकास आराखड्याची अंमलबजावणी १० टक्केच; १९७२ पासून औरंगाबादला दुर्दैवाचा फेरा

By मुजीब देवणीकर | Updated: December 27, 2022 12:08 IST

या सर्व अडचणींचे कारण एकच; विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या आरक्षणांच्या जमिनी मनपाने संपादित केल्याच नाहीत.

औरंगाबाद : शासनादेशानुसार शहरासाठी आतापर्यंत दोन विकास आराखडे तयार करण्यात आले. त्यामध्ये नागरी सोईसुविधांसाठी तब्बल १,२०० पेक्षा अधिक आरक्षणे टाकण्यात आली. मात्र, त्याची १० टक्केही अंमलबजावणी मनपाकडून करण्यात आली नाही. प्रत्येक वेळी निधी नाही, अशी ओरड करण्यात येते. रस्ता रुंदीकरणासाठी मागील १५ वर्षांत मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले. हे प्रमाणही फक्त ४५ ते ५० टक्क्यांपर्यंतच आहे.

कोणत्याही शहराच्या विकासाचा आत्मा म्हणजे विकास आराखडा असतो. पूर्वी २० वर्षांतून एकदा आराखडा तयार करणे बंधनकारक होते. आता राज्य शासनाने त्यात बदल केला. १० वर्षांतून एकदा आराखडा तयार करण्याचे आदेश आहेत. ३० लाखांहून अधिक पर्यटक औरंगाबादला भेट देतात. राज्य शासनाने पर्यटनाच्या राजधानीचा दर्जा शहराला दिलाय. एवढे सर्व काही असताना शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने शहरातील बहुतांश रस्ते रुंद झालेले नाहीत. पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून विकासकामे केली जात नाहीत. आठ वर्षांपूर्वी बांधलेला मोंढा नाका उड्डाणपूल मेट्रोसाठी पाडण्याचा विचार सुरू आहे. शहरात चारचाकी, दुचाकीच्या पार्किंगसाठी जागाच नाहीत. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. शासनाने अनुदान दिले, तर दवाखान्यासाठी चार ते पाच वर्षे जागा शोधण्यात जातात. या सर्व अडचणींचे कारण एकच; विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या आरक्षणांच्या जमिनी मनपाने संपादित केल्याच नाहीत.

शहराचा पहिला विकास आराखडा१९७५ मध्ये शहराचा पहिला विकास आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये जवळपास ४०० आरक्षणे विविध सुविधांसाठी टाकण्यात आली. ही आरक्षणे चार दशकांनंतरही कागदावरच राहिली. अनेक जमीन मालकांनी न्यायालयात धाव घेतली. महापालिका भूसंपादन करीत नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षणे उठविण्यात आली.

नवीन आराखड्याचे काम सुरूदीड वर्षापूर्वी राज्य शासनाने जुने आणि नवीन शहर असे मिळून एकच नवीन विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. डीपी युनिटचे उपसंचालक रजा खान यांची अचानक राज्य शासनाने बदली केली. मॅटने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली. काही महिन्यांत आराखड्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास मनपाला आहे.

मनपाने निधी बाजूला ठेवावामनपाने भूसंपादनासाठी मालमत्ता कर व अन्य करातील काही रक्कम स्वतंत्र खात्यात ठेवावी. या रकमेतून भूसंपादन करावे. त्यामुळे आराखडे यशस्वी तरी होतील.- समीर राजूरकर, माजी नगरसेवक.

नवीन आराखडा शहराला गती देईलनवा विकास आराखडा शहराच्या विकासाची दिशा ठरवेल, हे निश्चित. टीडीआर, एफएसआय आदींच्या माध्यमातून आराखड्याचा उद्देश पूर्ण करणे प्रशासनाला सोपे जाईल.- ए.बी. देशमुख, प्रभारी उपसंचालक, नगररचना, महापालिका.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका