शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

'मी बनावट नव्हे हाडाचा शेतकरी '; शेतकरी आंदोलन प्रश्नांवर रावसाहेब दानवेंनी पळ काढला 

By सुमेध उघडे | Updated: December 15, 2020 16:47 IST

Farmer Agitation at Delhi, Raosaheb Danve News माध्यमांमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास झाला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आंदोलनात पाकिस्तानचा हात कसा ? कृषी कायद्याचे फायदे सांगितले पण प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत

औरंगाबाद : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन, पाकिस्तानचा आहे असे वक्तव्य करून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सनसनाटी निर्माण केली होती. या विधानानंतर त्यांच्यावर सर्वस्तरातून  टीकाटिपण्णी सुरु आहे. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत हाच धागा पकडून पाकिस्तान आणि चीनचा शेतकरी आंदोलनात हात कसा ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता दानवे यांनी, 'मी बनावट नव्हे, हाडाचा शेतकरी. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्यानंतर मी काय बोलू ?'  असे बोलून पत्रकार परिषदेतून पळ काढला. पत्रकार प्रश्न विचारात होते आणि दानवे उठून निघून जात होते असे चित्र पत्रकार परिषदेत होते. 

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यात एका आरोग्य केंद्राच्या उदघाटनावेळी धक्कादायक विधान केलं होते. दानवे यांनी "आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचवलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?", असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडले होते.

मंगळवारी रावसाहेब दानवे औरंगाबाद येथे शेतकरी कायद्यावर एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. सुरुवातीला दानवे यांनी नवे कृषी कायदे समजावून सांगितले. यानंतर सर्व पत्रकारांना एकाच वेळी प्रश्र्न विचारायला लावले.  पत्रकारांनी शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे या विधानावर प्रश्न विचारले. यावर दानवेंनी  माध्यमांमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास झाला. मी बनावट नव्हे, हाडाचा शेतकरी आहे इतकेच उत्तरे देत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. पत्रकार प्रश्र्न विचारत होते आणि रावसाहेब दानवे उठून निघून जात होते. पत्रकारांनी नेमका विपर्यास काय झाला ते तरी सांगा असेही विचारले मात्र दानवे न थांबता निघून गेले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद