शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

'मी बनावट नव्हे हाडाचा शेतकरी '; शेतकरी आंदोलन प्रश्नांवर रावसाहेब दानवेंनी पळ काढला 

By सुमेध उघडे | Updated: December 15, 2020 16:47 IST

Farmer Agitation at Delhi, Raosaheb Danve News माध्यमांमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास झाला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या आंदोलनात पाकिस्तानचा हात कसा ? कृषी कायद्याचे फायदे सांगितले पण प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत

औरंगाबाद : दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन, पाकिस्तानचा आहे असे वक्तव्य करून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सनसनाटी निर्माण केली होती. या विधानानंतर त्यांच्यावर सर्वस्तरातून  टीकाटिपण्णी सुरु आहे. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत हाच धागा पकडून पाकिस्तान आणि चीनचा शेतकरी आंदोलनात हात कसा ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता दानवे यांनी, 'मी बनावट नव्हे, हाडाचा शेतकरी. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्यानंतर मी काय बोलू ?'  असे बोलून पत्रकार परिषदेतून पळ काढला. पत्रकार प्रश्न विचारात होते आणि दानवे उठून निघून जात होते असे चित्र पत्रकार परिषदेत होते. 

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय तापला असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यात एका आरोग्य केंद्राच्या उदघाटनावेळी धक्कादायक विधान केलं होते. दानवे यांनी "आता जे आंदोलन सुरू आहे ते शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये मुस्लिम समाजाला उचवलं गेलं आणि सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. पण एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर गेला का?", असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडले होते.

मंगळवारी रावसाहेब दानवे औरंगाबाद येथे शेतकरी कायद्यावर एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. सुरुवातीला दानवे यांनी नवे कृषी कायदे समजावून सांगितले. यानंतर सर्व पत्रकारांना एकाच वेळी प्रश्र्न विचारायला लावले.  पत्रकारांनी शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे या विधानावर प्रश्न विचारले. यावर दानवेंनी  माध्यमांमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास झाला. मी बनावट नव्हे, हाडाचा शेतकरी आहे इतकेच उत्तरे देत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. पत्रकार प्रश्र्न विचारत होते आणि रावसाहेब दानवे उठून निघून जात होते. पत्रकारांनी नेमका विपर्यास काय झाला ते तरी सांगा असेही विचारले मात्र दानवे न थांबता निघून गेले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद