शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आयआयटीने १०८ पैकी फक्त ३ रस्त्यांच्या कामांना दिली मुभा; गुणवत्ता पाहुण पुढील कामांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 17:36 IST

३१७ कोटी रुपये खर्च करून १०८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे केली जाणार आहेत.

औरंगाबाद :आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी सोमवारी १०८ पैकी फक्त तीन रस्त्यांच्या कामांना मुभा दिली. मंगळवारी ही कामे सुरू होतील. कामाची गुणवत्ता तपासल्यानंतर उर्वरित कामांना हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि स्मार्ट सिटी प्रशासनाला सत्व परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

३१७ कोटी रुपये खर्च करून १०८ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे केली जाणार आहेत. या कामांच्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसाठी ‘स्मार्ट सिटी’ ने मुंबई येथील आयआयटीशी करार केला आहे. आयआयटीचे प्रा.डॉ. धर्मवीर सिंह आपल्या सहकाऱ्यांसह शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ‘स्मार्ट सिटी’अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, स्नेहा बक्षी, अर्पिता शरद, पीएमसीचे समीर जोशी उपस्थित होते.

प्रा. डॉ. धर्मवीर सिंह म्हणाले, रस्त्यांच्या पाहणीच्यावेळी संबंधित कंत्राटदार आणि पीएमसीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. त्यांना रस्त्यांच्या बांधणीबद्दल सूचना करण्यात आल्या. शहरात आतापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी आम्ही केली. स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये आणि पद्धतीत बदल करावा लागेल. ‘प्रत्येक पॅकेजमधील एक अशा तीन रस्त्यांची कामे उद्यापासूनच सुरू केली जातील.

या तीन रस्त्यांची निवडऔरंगपुरा ते नेहरू भवन, शारदा मंदिर आणि सरस्वती भुवन, भाग्यनगरचा रस्ता

मनपा अधिकारी कामांपासून दूरआयआयटीचे प्रा.डॉ. धर्मवीर सिंह यांच्यासोबत रस्त्यांची पाहणी करताना ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अभियंत्यांना बोलावलेच नाही. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर महापालिकेकडेच रस्ते हस्तांतरित करावे लागणार आहेत, त्यामुळे पाहणीच्या वेळी पालिकेचे अभियंते असणे आवश्यक होते, असे मानले जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाIIT Mumbaiआयआयटी मुंबई