शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दूध मागितले तर लगेच मिळते; परंतु पाण्यासाठी सातारा-देवळाईकरांचा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 19:20 IST

पाणीपुरवठ्याच्या टँकरसाठी आगाऊ रक्कम मोजली तरच तेही दिवसाआड येते. ३० दिवसांचे पैसे घेऊन १५ च दिवस पाणीपुरवठा मनपाकडून केला जातो.

औरंगाबाद : उन्हाचा पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअस पार करू लागला, तशा पाण्याच्या झळा देखील सातारा- देवळाईकरांना बसू लागल्या. बोअरवेलची पातळी बुडापर्यंत जाऊन पोहोचली. एक वेळेस दूधवाल्याला दूध मागितले तर तो लगेच देतो, परंतु पाण्याच्या जारची गाडी थांबवून ‘एक जार दे रे भाऊ’ म्हटले तरी शिल्लक नाही म्हणून तो निघून जातो, ही वस्तुस्थिती आहे.

शासनाच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकणे तसेच जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेतले असले तरी ‘घागर रिकामी रे गोविंदा’ असेच म्हणण्याची वेळ सातारा- देवळाईतील नागरिकांवर येऊन ठेपलेली आहे. पाणीपुरवठ्याच्या टँकरसाठी आगाऊ रक्कम मोजली तरच तेही दिवसाआड येते. ३० दिवसांचे पैसे घेऊन १५ च दिवस पाणीपुरवठा मनपाकडून केला जातो.

जारवाल्यांचीच चलती..चार पाहुणे घरी आले अन् पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अधिकचा जार मागितला तर नकार दिला जातो. दूध एक वेळ त्वरित मिळते, परंतु जारवाला धुडकावून लावतो, याकडे कुणाचेही लक्ष नाही. सातारावासीयांना किमान जल दिनी तरी ‘पाणी पाजा हो’ असेच म्हणायची वेळ आली आहे.- अनंत सोन्नेकर

गरीब कुटुंबीयाला मनपाने मोफत पाणी द्यावे...सातारा- देवळाईतील बहुतांश कुटुंबे टँकरचे पाणी विकत घेऊ शकत नाहीत, अशा कुटुंबीयांना मनपाच्या वतीने मोफत पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. सर्वात जास्त महसूल याच परिसरातून घेतला जातो. अशा मजूर गरीब कुुटुंबाची तहान उन्हाळ्यात भागवावी, अशी मागणी आहे.- हरिभाऊ राठोड

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका