शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दूध मागितले तर लगेच मिळते; परंतु पाण्यासाठी सातारा-देवळाईकरांचा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 19:20 IST

पाणीपुरवठ्याच्या टँकरसाठी आगाऊ रक्कम मोजली तरच तेही दिवसाआड येते. ३० दिवसांचे पैसे घेऊन १५ च दिवस पाणीपुरवठा मनपाकडून केला जातो.

औरंगाबाद : उन्हाचा पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअस पार करू लागला, तशा पाण्याच्या झळा देखील सातारा- देवळाईकरांना बसू लागल्या. बोअरवेलची पातळी बुडापर्यंत जाऊन पोहोचली. एक वेळेस दूधवाल्याला दूध मागितले तर तो लगेच देतो, परंतु पाण्याच्या जारची गाडी थांबवून ‘एक जार दे रे भाऊ’ म्हटले तरी शिल्लक नाही म्हणून तो निघून जातो, ही वस्तुस्थिती आहे.

शासनाच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकणे तसेच जलकुंभ बांधण्याचे काम हाती घेतले असले तरी ‘घागर रिकामी रे गोविंदा’ असेच म्हणण्याची वेळ सातारा- देवळाईतील नागरिकांवर येऊन ठेपलेली आहे. पाणीपुरवठ्याच्या टँकरसाठी आगाऊ रक्कम मोजली तरच तेही दिवसाआड येते. ३० दिवसांचे पैसे घेऊन १५ च दिवस पाणीपुरवठा मनपाकडून केला जातो.

जारवाल्यांचीच चलती..चार पाहुणे घरी आले अन् पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी अधिकचा जार मागितला तर नकार दिला जातो. दूध एक वेळ त्वरित मिळते, परंतु जारवाला धुडकावून लावतो, याकडे कुणाचेही लक्ष नाही. सातारावासीयांना किमान जल दिनी तरी ‘पाणी पाजा हो’ असेच म्हणायची वेळ आली आहे.- अनंत सोन्नेकर

गरीब कुटुंबीयाला मनपाने मोफत पाणी द्यावे...सातारा- देवळाईतील बहुतांश कुटुंबे टँकरचे पाणी विकत घेऊ शकत नाहीत, अशा कुटुंबीयांना मनपाच्या वतीने मोफत पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. सर्वात जास्त महसूल याच परिसरातून घेतला जातो. अशा मजूर गरीब कुुटुंबाची तहान उन्हाळ्यात भागवावी, अशी मागणी आहे.- हरिभाऊ राठोड

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका