शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल तर दुसऱ्या पत्नीस पेन्शनचा हक्क नाही 

By प्रभुदास पाटोळे | Published: April 08, 2024 1:53 PM

हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर-खंडपीठाचा निर्वाळा

छत्रपती संभाजीनगर : पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल तर दुसऱ्या पत्नीस कौटुंबिक निवृत्तिवेतनाचा हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आर. एम. जोशी यांनी दिला. त्याचप्रमाणे हिंदू विवाह कायद्याच्या कलम ११नुसार पहिली पत्नी जिवंत असताना व पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल, तर दुसरे लग्न करणे बेकायदेशीर असल्याचे खंडपीठाने निकालात नमूद केले आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामधील इस्लामपूर येथील ग्यानबाई देवीदासराव कोंडगीर यांचे लग्न १९७५ साली देवीदासराव कोंडगीर यांच्यासोबत झाले होते. या विवाहातून त्यांना एक मुलगा झाला होता. देवीदासराव अहमदपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयात सर्वेअर होते. १७ मार्च २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.

पहिली पत्नी ग्यानबाई जिवंत असताना व पहिले लग्न संपुष्टात आले नसताना देवीदासराव यांनी शोभाबाईसोबत बेकायदेशीरपणे दुसरे लग्न केले होते. देवीदासराव यांनी पोटगीच्या प्रकरणात याचिकाकर्ती ग्यानबाई ही त्यांची एकमेव पत्नी असल्याचे मान्य केले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी दुसरे लग्न केले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. खंडपीठाने दुसरी पत्नी शोभाबाई यांचा मृत देवीदासराव यांच्यासोबत विवाह झाला असल्याचे कथन पुराव्याअभावी फेटाळले होते. पहिली पत्नी ग्यानबाईलाच कौटुंबिक निवृत्तिवेतन मिळण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला. सदर याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे संदर्भ दिले आहेत. याचिकाकर्तीतर्फे ॲड. बालाजी बी. येणगे यांनी, तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील पवन के. लखोटिया यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCourtन्यायालयAurangabadऔरंगाबादlaturलातूर