शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

पाऊस आला, तर वाहने लावावी लागतात घरापासून दूर; मधुमालतीनगरात अनेक समस्या

By साहेबराव हिवराळे | Updated: July 4, 2024 19:00 IST

एक दिवस एक वसाहत: ना पिण्याचे पाणी मिळते, ना पथदिवे असतात चालू

छत्रपती संभाजीनगर : बायपासला खेटून असलेल्या मधुमालतीनगरातील नागरिकांना पाऊस पडला की, दुचाकी घरापासून दूरवर ठेवूनच घर गाठावे लागते. इतकी दलदल या भागात असते.

या भागात पाणीटंचाई असल्यामुळे सध्या वापरासाठी खाजगी टँकरने पाणी घ्यावे लागते, तर जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जलकुंभाचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत; परंतु अद्याप नळाला पाणी आलेले नाही. पाणीपुरवठा कधी होईल, हे आजघडीला सांगणे कठीण आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने बायपास रस्त्यावर पाणी देवळाई चौकातून मधुमालतीनगरात वाहून येते. त्यावेळी परिसरातील घरे जणूकाही बेटावर उभारली आहेत की काय, असा भास होतो. रिकामे प्लॉट पावसाच्या पाण्याचे तळे बनतात. त्यामुळे सरपटणारे प्राणी नागरिकांच्या अंगणात आढळतात. कर भरूनही सुविधा देण्यास मनपाकडून कोणतीही हालचाल केली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षएनए ४७ बी, आता गुंठेवारी, असे नवनवीन फंडे आणले जात असून, सुविधा देण्याच्या नावाने मात्र बोंब आहे. पावसाळा आला की, चार महिने घर सोडून शहरात राहण्यास जाण्याची अनेक नागरिकांची इच्छा होते. मुलांना शाळेत घेऊन जाणे किंवा स्वत: दुचाकी घरापर्यंत नेणे म्हणजे कसरत वाटते.-योगेश दहीवाल, रहिवासी

रस्ता मंजूर होणार केव्हा?ड्रेनेजलाइन टाकण्यात आली; परंतु रस्त्याच्या कामाला मुहूर्त का मिळेना; असा प्रश्न भेडसावत आहे.-धनंजय पुरी, रहिवासी

घंटागाडी आणि औषध फवारणीचे काय?घंटागाडी रोज न येण्यामुळे कचरा पडून राहतो. पावसाळ्यात रस्त्यावर आणि परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डासांचा त्रास सहन करावा लागतो. औषध फवारणी किमान आठवड्यातून एकदा करावी.-दीपक शर्मा, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका