शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

पाऊस आला, तर वाहने लावावी लागतात घरापासून दूर; मधुमालतीनगरात अनेक समस्या

By साहेबराव हिवराळे | Updated: July 4, 2024 19:00 IST

एक दिवस एक वसाहत: ना पिण्याचे पाणी मिळते, ना पथदिवे असतात चालू

छत्रपती संभाजीनगर : बायपासला खेटून असलेल्या मधुमालतीनगरातील नागरिकांना पाऊस पडला की, दुचाकी घरापासून दूरवर ठेवूनच घर गाठावे लागते. इतकी दलदल या भागात असते.

या भागात पाणीटंचाई असल्यामुळे सध्या वापरासाठी खाजगी टँकरने पाणी घ्यावे लागते, तर जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जलकुंभाचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत; परंतु अद्याप नळाला पाणी आलेले नाही. पाणीपुरवठा कधी होईल, हे आजघडीला सांगणे कठीण आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने बायपास रस्त्यावर पाणी देवळाई चौकातून मधुमालतीनगरात वाहून येते. त्यावेळी परिसरातील घरे जणूकाही बेटावर उभारली आहेत की काय, असा भास होतो. रिकामे प्लॉट पावसाच्या पाण्याचे तळे बनतात. त्यामुळे सरपटणारे प्राणी नागरिकांच्या अंगणात आढळतात. कर भरूनही सुविधा देण्यास मनपाकडून कोणतीही हालचाल केली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षएनए ४७ बी, आता गुंठेवारी, असे नवनवीन फंडे आणले जात असून, सुविधा देण्याच्या नावाने मात्र बोंब आहे. पावसाळा आला की, चार महिने घर सोडून शहरात राहण्यास जाण्याची अनेक नागरिकांची इच्छा होते. मुलांना शाळेत घेऊन जाणे किंवा स्वत: दुचाकी घरापर्यंत नेणे म्हणजे कसरत वाटते.-योगेश दहीवाल, रहिवासी

रस्ता मंजूर होणार केव्हा?ड्रेनेजलाइन टाकण्यात आली; परंतु रस्त्याच्या कामाला मुहूर्त का मिळेना; असा प्रश्न भेडसावत आहे.-धनंजय पुरी, रहिवासी

घंटागाडी आणि औषध फवारणीचे काय?घंटागाडी रोज न येण्यामुळे कचरा पडून राहतो. पावसाळ्यात रस्त्यावर आणि परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डासांचा त्रास सहन करावा लागतो. औषध फवारणी किमान आठवड्यातून एकदा करावी.-दीपक शर्मा, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका