शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पाऊस आला, तर वाहने लावावी लागतात घरापासून दूर; मधुमालतीनगरात अनेक समस्या

By साहेबराव हिवराळे | Updated: July 4, 2024 19:00 IST

एक दिवस एक वसाहत: ना पिण्याचे पाणी मिळते, ना पथदिवे असतात चालू

छत्रपती संभाजीनगर : बायपासला खेटून असलेल्या मधुमालतीनगरातील नागरिकांना पाऊस पडला की, दुचाकी घरापासून दूरवर ठेवूनच घर गाठावे लागते. इतकी दलदल या भागात असते.

या भागात पाणीटंचाई असल्यामुळे सध्या वापरासाठी खाजगी टँकरने पाणी घ्यावे लागते, तर जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. जलकुंभाचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत; परंतु अद्याप नळाला पाणी आलेले नाही. पाणीपुरवठा कधी होईल, हे आजघडीला सांगणे कठीण आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने बायपास रस्त्यावर पाणी देवळाई चौकातून मधुमालतीनगरात वाहून येते. त्यावेळी परिसरातील घरे जणूकाही बेटावर उभारली आहेत की काय, असा भास होतो. रिकामे प्लॉट पावसाच्या पाण्याचे तळे बनतात. त्यामुळे सरपटणारे प्राणी नागरिकांच्या अंगणात आढळतात. कर भरूनही सुविधा देण्यास मनपाकडून कोणतीही हालचाल केली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षएनए ४७ बी, आता गुंठेवारी, असे नवनवीन फंडे आणले जात असून, सुविधा देण्याच्या नावाने मात्र बोंब आहे. पावसाळा आला की, चार महिने घर सोडून शहरात राहण्यास जाण्याची अनेक नागरिकांची इच्छा होते. मुलांना शाळेत घेऊन जाणे किंवा स्वत: दुचाकी घरापर्यंत नेणे म्हणजे कसरत वाटते.-योगेश दहीवाल, रहिवासी

रस्ता मंजूर होणार केव्हा?ड्रेनेजलाइन टाकण्यात आली; परंतु रस्त्याच्या कामाला मुहूर्त का मिळेना; असा प्रश्न भेडसावत आहे.-धनंजय पुरी, रहिवासी

घंटागाडी आणि औषध फवारणीचे काय?घंटागाडी रोज न येण्यामुळे कचरा पडून राहतो. पावसाळ्यात रस्त्यावर आणि परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डासांचा त्रास सहन करावा लागतो. औषध फवारणी किमान आठवड्यातून एकदा करावी.-दीपक शर्मा, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका