‘असहिष्णूता’ थांबली नाही तर भाजपाला प्रत्येक राज्यात बि‘हार’
By Admin | Updated: November 22, 2015 23:42 IST2015-11-22T23:32:50+5:302015-11-22T23:42:04+5:30
दत्ता थोरे , लातूर भाजपा सरकारच्या आगमनानंतर या देशातील असहिष्णूता वाढली आहे. अल्पसंख्यांक आणि दलितांच्या सामाजिक न्याय देणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात खुलेआमपणे बोलले जाते आहे.

‘असहिष्णूता’ थांबली नाही तर भाजपाला प्रत्येक राज्यात बि‘हार’
दत्ता थोरे , लातूर
भाजपा सरकारच्या आगमनानंतर या देशातील असहिष्णूता वाढली आहे. अल्पसंख्यांक आणि दलितांच्या सामाजिक न्याय देणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात खुलेआमपणे बोलले जाते आहे. हिंसात्मक घटना घडत आहेत. या भाजपा सरकारने रोखल्या नाहीत तर त्यांचा देशभरात बिहार होईल, असे मत आॅल इंडिया मूलनिवासी बहुजन समाज सेंट्रल संघ (अॅम्बस) चे प्रणेते विजय मानकर यांनी मांडले. लातूर दौऱ्यावर असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आरक्षणाबाबत देशभरात आज अनेक अर्थ काढून वाद निर्माण केले जात आहेत. ही काही फक्त नोकऱ्यांची सोय नाही. सामाजिक संक्रमण आहे. उपेक्षितांना न्याय देण्याचे घटनात्मक राष्ट्रीय कर्तव्य आहे. हजारो वर्षे बडव्यांचा मुलगाच पुजारी व्हायचा. जगन्नाथासह देशभरातील मंदिरात आजही पुजाऱ्यांचाच मुलगा पुजारी का होतो. याबद्दल कुणी चकार शब्दही काढत नाहीत. पण राजर्षी शाहूंच्या कल्पना व आदर्श राज्यव्यवस्थेतीलतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षण तरतुदीला मात्र तीव्र विरोध होतो. जे धर्माचे पंडीत आणि सामाजिकदृष्ट्या पहिल्या स्थानावर असलेल्या ब्राम्हण व्यवस्थेने लादलेल्यांच्या विरोधात बोलायचे नाही आणि खालच्या वर्गातील मूठभर बहुजनांना न्यायिक भूमिकेतून केलेल्या कायद्याला विरोध म्हणजे लोकांची दुटप्पी भूमिका नव्हे काय ? दलितांच्या उध्दारांसाठी घटनात्मक तरतुदी या शंभर टक्के निर्णायक राहील्या आहेत. आज देशात आर्टीकल ३३० आणि ३३२ नुसार फक्त राजकीय आरक्षण हे दहा वर्षासाठी होते. नोकऱ्यांचे आरणक्षण ही फंडामेटल पॉलिसी आहे. एस. सी. आणि एस. टी. च्या शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी आरक्षणाबाबत काळाच्या मर्यादा नाहीत. हे पुष्कळ लोकांना माहित नाही. त्यामुळे हे वाद उकरुन काढले जात असल्याचे ते म्हणाले. जाती नष्ट करुन शकत नाही मग आरक्षण कसे काय नष्ठ करु शकता. जाती नष्ठ करा आणि आरक्षण आपोआप नष्ठ होईल. ही पॉलिसी सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी आहे.
जातीच्या दाखल्यावरुन जात काढावी या प्रकाश आंबेडकरांच्या मुद्यांवर ते म्हणाले की, दाखल्यावरुन काढल्याने लोकांच्या डोक्यातून जात जाईल, असे वाटत नाही. जाती, वेदांमध्ये, मनुस्मृतींमध्ये आहेच पण त्याहून मोठ्या प्रमाणात मानसिकतेत आहे. इंग्रज यायच्या आधी ‘दाखले’ नव्हते. पण जाती होत्या. दाखल्यावरुन काढल्याने त्या जातीलच याच्या मागचे लॉजिक काय ? आणखी दोन पिढ्यांनी जातीचे साखळदंड गळून पडतील. बुध्दिजम् ग्रहण केल्यानंतरच जाती पूर्णपणे गळून पडतील. दोन - तीन पिढ्यानंतर जाती शिल्लक राहणार नाहीत.
आरक्षित जागांमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पनातील एक टक्का पगारापोटी जातात
४आरक्षणामुळे देशाचे काय नुकसान होते. जास्तीत जास्त आरक्षणामुळे नोकऱ्या दिलेल्या एस. सी., एस. टी. आणि ओबीसीच्या देशभरातील लोकांना देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्का रक्कमही पगारापोटी दिली जात नाही. याचा अर्थच असा होतो की आपण सामाजिक न्याय मागणाऱ्या देशभरातील लोकांना राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्काही वाटा आपण देत नाही. दुसरीकडे उगाच आरक्षणाच्या विरोधात चर्चा केल्या जातात.
बौध्द झालेल्या नवबौध्दात अनेक जातीचे लोक आले. परंतु यात ‘वन बुध्दिस्ट आयडेंटी’ आलेली नाही. त्यामुळे आजही बौध्द झालेल्या प्रत्येक जातीत ‘रोटी-बेटी’ व्यवहार नाहीत. आपण बौध्द सांस्कृतिक आणि जीवनशैलीनेही झाले पाहीजे. आज केवळ सवलती आहेत म्हणून बुध्दिस्ट झालेले ‘जात’ही सोबत पाळत आहेत. बुध्दिस्ट झाल्यानंतर त्यांच्या मानसिकता बदलून ते जातीधर्म सोडत आहेत. आरक्षणाची तरतुद त्यांच्यातील आर्थिक बदल करीत आहेत. हे आणखी दोन पिढ्यांमध्ये राहीले तर तिसऱ्या पिढीत जात राहणार नाही.