शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मोफत विजेचा निर्णय झाला तर शहरात दीड लाख ग्राहकांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 2:20 PM

जिल्ह्यात ० ते १०० युनिटच्या ग्राहकांची संख्या २ लाख ६१ हजार

ठळक मुद्दे० ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक सर्वसामान्य गरीब नागरिकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

औरंगाबाद : दिल्लीत आम आदमी पक्षाने ० ते १०० युनिट मोफत वीज देण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयाच्या आधारावर दिल्लीत आम आदमी पक्षाने तिसऱ्यांदा सत्ता मिळविली. महाराष्ट्रातील  महाविकास आघाडी सरकारही राज्यात घरगुती ग्राहकांना मोफत वीज देण्याचा विचार करीत आहे. भविष्यात शासनाने हा निर्णय घेतल्यास औरंगाबाद शहरातच १ लाख ६६ हजार, तर जिल्ह्यात २ लाख ६१ हजार घरगुती वीज ग्राहकांना फायदा होऊ शकतो.

वीज वितरण कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ० ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वसामान्य गरीब नागरिकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. राज्य शासनाने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्यास वीज वितरण कंपनीला दरमहा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. राज्य शासन या मोबदल्यात वीज कंपनीला काही रक्कम देणार का? यावरही बरेच काही अवलंबून आहे. शंभर टक्के विजेचे वसुली होत नाही. लाईन लॉसचे प्रमाण जास्त असल्याने अगोदरच वीज कंपनी संकटात आहे. त्यात मोफत विजेचा भार कंपनीला सहन होणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनीतील अनावश्यक खर्च कमी करा, असे वारंवार वरिष्ठांकडून सांगण्यात येते. कितीही प्रयत्न केले तरी हा खर्च कमी होत नाही. अत्यावश्यक कामांवर आणि आणीबाणीच्या परिस्थितीत कोट्यवधी रुपये कंपनीस खर्च करावेच लागतात. नैसर्गिक आपती, उन्हाळ्यात  ट्रान्स्फॉर्मर खराब होणे, तारा वितळणे हे प्रमाणही बरेच आहे.

४ रुपये ३३ पैसे एका युनिटचे दरऔरंगाबाद शहरात ० ते १०० युनिटपर्यंत एका युनिटचे दर वहन आकारासह ४ रुपये ३३ पैसे आकारण्यात येतात. १०० युनिटचे बिल ७७० रुपये होते. अनेक ग्राहक शंभर युनिट विजेचा वापरच करीत नाहीत. ५० ते ७० मध्ये बहुतांश ग्राहकांचा समावेश असतो. काही ग्राहक ९० पर्यंत जातात.

शहरात १२ कोटी ८३ लाखऔरंगाबाद शहातील १ लाख ६६ ग्राहकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्यास वीज कंपनीला १२ कोटी ८३ लाख रुपयांवर पाणी फेरावे लागेल. जिल्ह्यातील ग्राहकांची संख्या २ लाख ६१ हजार ७६ ग्राहकांना मोफत वीज दिल्यास २० कोटी १० लाख वीज कंपनीच्या तिजोरीत येणार नाहीत. एकूणच औरंगाबाद जिल्ह्यात वीज कंपनीला ३३ ते ३४ कोटी रुपये माफ करावे लागतील.

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारmahavitaranमहावितरण