शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

मृतदेहापेक्षा जिवंत माणसांचीच भीती वाटते साहेब; ते करतात महिन्याला २० पोस्टमॉर्टेम

By संतोष हिरेमठ | Published: January 16, 2024 2:38 PM

मृत्यूचे कारण उलगडतात, अनेकदा न्यायालयात साक्ष, आरोपीला शिक्षा

छत्रपती संभाजीनगर : एखाद्याच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे ठरते. त्यातूनच मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्याला शिक्षा होण्यासही मदत होते. हेच काम गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) न्यायवैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. कपिलेश्वर चौधरी करीत आहेत. महिन्याला संवेदनशील अशा प्रकरणातील २० ते ४० मृतदेहांचे ते शवविच्छेदन करतात.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या, आत्महत्या केलेल्या आणि खून झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेले जातात. शवविच्छेदन करणाऱ्या डाॅक्टरांना न्यायालयात साक्ष देण्यासाठीही अनेकदा जावे लागते. त्यांच्या साक्षीमुळे आरोपीला शिक्षादेखील होती. अशा परिस्थितीत या डाॅक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात डाॅ. चौधरी हे आपले काम करीत आहेत.

पहिले शवविच्छेदन करताना काय वाटले?डाॅ. चौधरी म्हणाले, २००५ मध्ये जयताने (ता. साक्री, जि. धुळे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो. तेव्हा पहिले शवविच्छेदन केले होते. ते आजही आठवते. रस्ते अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन केले होते. अनेक विचार त्यावेळी आले होते.

मृतदेहाची भीती वाटत नाही का?डाॅ. चौधरी म्हणाले, पहिले शवविच्छेदन करताना थोडी भीती वाटली होती. परंतु आता कसलीही भीती वाटत नाही.

आतापर्यंत किती शवविच्छेदन केले?२००५ पासून आतापर्यंत ३ हजारांवर शवविच्छेदन केले आहे. धुळे येथे न्यायवैद्यकशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक ते विभागप्रमुख म्हणून २०११ ते २०१९ पर्यंत काम केले आहे. २०१९ पासून घाटीतील न्यायवैद्यकशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, असे डाॅ. कपिलेश्वर चौधरी यांनी सांगितले.

नोकरीची सुरुवात याच कामापासून झाली का?प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सुरुवात झाली. तेव्हाच पहिले शवविच्छेदन केले होते. त्यानंतर २००८ ते २०११ दरम्यान एमडी फाॅरेन्सिक मेडिसिन पूर्ण केले, असे डाॅ. चौधरी म्हणाले.

तुमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत नाही का?डाॅ. चौधरी म्हणाले, शवविच्छेदन करताना आरोग्याची काळजी घ्यावीच लागते. विविध संसर्गासह टीबीचा धोका असतो. त्यामुळे हँडग्लोज, मास्कचा वापर केला जातो. तसेच रिकाम्या पोटी म्हणजे जेवण न करता शवविच्छेदन करणे टाळतो.

काम करताना काही अडचणी आहेत का?मयताच्या अनेक नातेवाइकांना कायदेशीर बाबींचे ज्ञान नसते. विनाकारण वेगवेगळ्या शंका घेतल्या जातात. गरजेचे नसताना इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली जाते. कायदेशीर बाबी समजावून सांगताना दमछाक होते. अनेकदा साक्ष देण्यासाठी कोर्टात जावे लागते. अशावेळी सुरक्षेचा प्रश्न सतावतो, असे डाॅ. कपिलेश्वर चौधरी म्हणाले.

समाजात हे काम सांगताना त्रास होतो का?डाॅ. चौधरी म्हणाले, डाॅक्टर म्हटले की औषधोपचार करणारे असाच समज लोकांचा असतो. त्यामुळे अनेक जण औषधोपचाराचा सल्ला मागतात. तेव्हा न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डाॅक्टर असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा हिरमोड होतो.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादDeathमृत्यूMedicalवैद्यकीय