शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

‘मी सरपंच पती बोलतोय’; मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सरपंचपतींनीच मांडली दुष्काळाची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 16:35 IST

ऑडिओ कॉन्फरन्सिंग सुरू असल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनादेखील यामध्ये हस्तक्षेप करता आला नाही.

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण मिळाले. त्या ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत सत्तेत आल्या असल्या तरी त्यांना मुक्तपणे मत मांडू दिले जात नसल्याचे बुधवारी मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यात आॅडिओ कॉन्फरन्सिंग सुरू असताना स्पष्ट झाले.

महिला सरपंच असताना त्यांच्या पतींनीच मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून दुष्काळ, टंचाई, चारा छावणी, पाणीपुरवठ्याबाबत माहिती दिली. या संवादात महिला सरपंच बोलणे अपेक्षित होते; परंतु आॅडिओ कॉन्फरन्सिंग सुरू असल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनादेखील यामध्ये हस्तक्षेप करता आला नाही. शिवाय मुख्यमंत्र्यांनाही सर्व ऐकून घ्यावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी ओडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी संवाद साधला. जिल्ह्यातून महिला सरपंचांऐवजी त्यांच्या पतींनीच मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू केला. सरपंचांचे नाव महिलेचे आणि पुरुष बोलण्यास पुढे आले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आपण कोण आहात, असा प्रश्न केला, ‘मी सरपंच पती बोलतोय’ असे उत्तर संबंधितांने दिले. 

बहुतांश महिला सरपंचांच्या बाबतीत असाच प्रकार घडल्यामुळे मुख्यमंत्र्यांना सरपंच पतीकडूनच दुष्काळ जाणून घ्यावा लागला. शेवटच्या घटकांपर्यंत यंत्रणा काम करते आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरपंचांशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी सरपंचांना या उपक्रमाची माहिती देण्यात येते. त्यानंतर ठरलेल्या  वेळेत मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला जातो. नाव महिला सरपंचाचे आणि पुरुष बोलण्याचे प्रकार घडले. मी सरपंच पती बोलतोय असे एकाने हिंमत करून सांगितल्यानंतर बाकीच्यांनीही बिनधास्तपणे तशीच उत्तरे देऊन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. बहुतांश ठिकाणी सरपंचपती बोलल्याने मुख्यमंत्र्यांना सरपंच पतीशीच बोलावे लागले. उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांच्या दालनात तहसीलदार रमेश मुंडलोड, सतीश सोनी आदींच्या उपस्थितीत कॉन्फरन्सिंग सुरू होती. मुंडलोड यांच्या मोबाईलवर १ तास २४ मिनिटांचा आॅडिओ कॉल सुरू होता.

पतीच घेतात धोरणात्मक निर्णय महिला सक्षमीकरण समोर ठेवून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. परंतु हा उद्देश सफल होत नसल्याचे महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीतील राजकारणामुळे वेळोवेळी दिसून येते. महिला निवडून पदावर असल्या तरी त्यांचे पतीच धोरणात्मक निर्णय घेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुख्यमंत्र्यांनादेखील आॅडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये थेट अनुभव आला. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीdroughtदुष्काळsarpanchसरपंचAurangabadऔरंगाबाद