शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘मी सरपंच पती बोलतोय’; मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सरपंचपतींनीच मांडली दुष्काळाची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 16:35 IST

ऑडिओ कॉन्फरन्सिंग सुरू असल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनादेखील यामध्ये हस्तक्षेप करता आला नाही.

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण मिळाले. त्या ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत सत्तेत आल्या असल्या तरी त्यांना मुक्तपणे मत मांडू दिले जात नसल्याचे बुधवारी मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यात आॅडिओ कॉन्फरन्सिंग सुरू असताना स्पष्ट झाले.

महिला सरपंच असताना त्यांच्या पतींनीच मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून दुष्काळ, टंचाई, चारा छावणी, पाणीपुरवठ्याबाबत माहिती दिली. या संवादात महिला सरपंच बोलणे अपेक्षित होते; परंतु आॅडिओ कॉन्फरन्सिंग सुरू असल्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनादेखील यामध्ये हस्तक्षेप करता आला नाही. शिवाय मुख्यमंत्र्यांनाही सर्व ऐकून घ्यावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी ओडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी संवाद साधला. जिल्ह्यातून महिला सरपंचांऐवजी त्यांच्या पतींनीच मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू केला. सरपंचांचे नाव महिलेचे आणि पुरुष बोलण्यास पुढे आले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आपण कोण आहात, असा प्रश्न केला, ‘मी सरपंच पती बोलतोय’ असे उत्तर संबंधितांने दिले. 

बहुतांश महिला सरपंचांच्या बाबतीत असाच प्रकार घडल्यामुळे मुख्यमंत्र्यांना सरपंच पतीकडूनच दुष्काळ जाणून घ्यावा लागला. शेवटच्या घटकांपर्यंत यंत्रणा काम करते आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरपंचांशी संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी सरपंचांना या उपक्रमाची माहिती देण्यात येते. त्यानंतर ठरलेल्या  वेळेत मुख्यमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला जातो. नाव महिला सरपंचाचे आणि पुरुष बोलण्याचे प्रकार घडले. मी सरपंच पती बोलतोय असे एकाने हिंमत करून सांगितल्यानंतर बाकीच्यांनीही बिनधास्तपणे तशीच उत्तरे देऊन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. बहुतांश ठिकाणी सरपंचपती बोलल्याने मुख्यमंत्र्यांना सरपंच पतीशीच बोलावे लागले. उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांच्या दालनात तहसीलदार रमेश मुंडलोड, सतीश सोनी आदींच्या उपस्थितीत कॉन्फरन्सिंग सुरू होती. मुंडलोड यांच्या मोबाईलवर १ तास २४ मिनिटांचा आॅडिओ कॉल सुरू होता.

पतीच घेतात धोरणात्मक निर्णय महिला सक्षमीकरण समोर ठेवून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. परंतु हा उद्देश सफल होत नसल्याचे महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीतील राजकारणामुळे वेळोवेळी दिसून येते. महिला निवडून पदावर असल्या तरी त्यांचे पतीच धोरणात्मक निर्णय घेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुख्यमंत्र्यांनादेखील आॅडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये थेट अनुभव आला. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीdroughtदुष्काळsarpanchसरपंचAurangabadऔरंगाबाद