शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मी खेड्यातील लोकांचा संवेदनशील प्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:16 IST

साहित्य हे समाजाच्या परिवर्तनाला पूरक गोष्ट आहे. ज्या मातीत जगलो, त्या मातीविषयीच्या भावना संवेदनशीलपणे टिपत आजपर्यंतचा प्रवास झाला. यातून चिंतनशील गोष्टी मांडण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला.

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या परिवर्तनाला पूरक गोष्ट आहे. ज्या मातीत जगलो, त्या मातीविषयीच्या भावना संवेदनशीलपणे टिपत आजपर्यंतचा प्रवास झाला. यातून चिंतनशील गोष्टी मांडण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला. याची आता साहित्य अकादमीने दखल घेतली. तरीही लेखकाने आपले काम करीत राहावे, इतर संस्था आपले काम करीत असतात. यात साहित्य अकादमीसारखे पुरस्कार मिळाल्यावर त्यातील सन्मानापेक्षा जोखीमच अधिक असते. यामुळे आणखी जबाबदारीने वागावे, बोलावे, लिहावे लागते, अशी संवेदनशील भावना साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’ कॉफी टेबल उपक्रमात गुरुवारी त्यांनी लोकमतच्या संपादकीय सहकाºयांशी संवाद साधला. या चर्चेत त्यांनी बालपणापासून ते आजपर्यंतच्या सर्व वाटचालीचा अनुभव व्यक्त केला. नुकताच त्यांच्या ‘बोलावे ते आम्ही’ या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.प्राध्यापक म्हणून नोकरीकरण्याचे स्वप्नऔरंगाबाद येथील विद्यापीठात शिकल्यानंतर नांदेडला प्राध्यापक म्हणून रुजू झालो. तेथे तीन वर्षे नोकरी केली. मात्र संबंधित संस्थेत झालेल्या त्रासामुळे प्राध्यापकी सोडण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू केली. यातूनच १९९३ साली क्लास-१ अधिकारी बनलो. मात्र माझा प्राध्यापकाची नोकरी करणे हाच पिंड होता. तेच स्वप्न होते. मात्र वाळवंटातही बाग फुलवता येते. त्याप्रमाणे प्रशासनात असतानाही साहित्याचा मळा फुलवता येतो. हेच आयुष्यात जगलो. प्रत्यक्ष कृतीतही उतरवले.कविता ही जगण्याशी निगडित असतेमराठीत असंख्य कवी आहेत. तुकोबा, ज्ञानेश्वर यांच्यासह जी काही नावे समोर येतात. त्यांचे आयुष्य खडतर असल्याचे दिसून येते. कवितेच्या प्रांतात अस्सल आणि स्वत:ची भाषा असणारेच टिकतात. वेगळेपण जपतात. सहजपणे वावरतात. कला ही समाजाशी निगडित असते. कलावंतांचा संघर्ष हा स्वत:शीच असतो. त्यात सुसंवाद, संघर्ष असतो. यातून जे काही निघते, ते अप्रतिम असते. जगण्याशी निगडित असते. कविताही अशीच असते. कवीने समाजशील (समाजवादी नव्हे) परंपरा स्वीकारली पाहिजे. त्यात विद्रोह आहे; परंतु तो स्वीकारला पाहिजे.प्रशासनात संवेदनशीलराहिले पाहिजेप्रशासनात असताना साहित्याची निर्मिती होऊ शकते. प्रशासनाकडे येणारी माणसे, ही आपल्या बापाप्रमाणेच असतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपला बाप आठवतो. तेव्हा आपुलकीची भावना निर्माण होते. तेव्हा प्रशासनात अधिकाºयांनी संवेदनशील राहिले पाहिजे. याचाच परिणाम मी पूर्णवेळ नोकरी करताना संवेदनशील असतो. मी ज्या वर्गातून येतो. त्या वर्गाचा केवळ संवेदनशील प्रतिनिधी आहे. पूर्वी ग्रामीण साहित्य असा शब्दप्रयोग केला जात होता. मात्र आता बदलले पाहिजे. ग्रामीण साहित्याऐवजी कृषी साहित्य असे म्हटले जावे. कारण कृषी संस्कृती हीच मध्यवर्ती आहे. आता जागतिकीकरणाच्या काळात बळीराजा, काळीआई अशा भावनिक मुद्यांपासूनही दूर जाण्याचा सल्लाही देशमुख देतात.कलावंतांमध्ये जातीयतावाढते आहे...लेखकाला जात, धर्म, पंथ काहीही नसतो. मात्र काही काळापासून कलावंतांमध्ये जातीनिष्ठता, धर्मनिष्ठता वाढत चालली आहे. हे धोकादायक आहे. मुळात कलावंताचा अविचार धोकादायक ठरू शकतो. कलावंतांनी सगळ्याच घटकांकडे अंतर्भेद सोडून पाहिले पाहिजे. याशिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा नेहमीच चर्चेला येतो. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या आधीच्या काळापासून सुरू आहे. तेव्हा ती आता नवीन आहे, असे काही नाही. पूर्वीही होती, आताही आहे अन् भविष्यातही राहील. मात्र याविरोधात सर्व घटकांतील कलावंतांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे हे महत्त्वाचे आहे.मंचीय कवितेसाठीतडजोडी कराव्या लागतातसाहित्य संमेलने, इतर मंचीय ठिकाणावरून कविता सादर करण्यासाठी तडजोडी स्वीकाराव्या लागतात. मंचावरचा थिल्लरपणाही पराकोटीचा असतो. त्यात गंभीरता नसते. आपली कविता गंभीर, जगण्याशी निगडित आहे. कविता किंवा सूत्रसंचालनातून कमरेखालच्या गोष्टी व्यक्त होऊ नयेत. मात्र, त्याचा आता अधिक बोलबाला असतो. यामुळे मंचीय कवितांमध्ये सहभागी होत नाही. याशिवाय बोलावले तरी जात नसल्यामुळे आता लोकही बोलवत नाहीत....तर राष्ट्रीयतेला धोका निर्माण होईलदलित अत्याचार, शेतकरी आत्महत्या, सैनिक शहीद झाल्यानंतर पूर्वी असणारी संवेदनशीलता आता कुठे हळूहळू कमी होताना दिसत आहे. ही संवेदनशीलता कायम राहणे हे अतिशय गरजेचे आहे. जर याचे पर्यवसान असंवेदनशीलतेत होऊन तो समाजधर्म बनला तर हा राष्ट्रीयतेला धोका आहे. यावेळी कलावंत महत्त्वाचे असतात.सोशल मीडियात उथळपणा अधिकमातीशी निगडित असलेला प्रत्येक घटक संस्कृती निर्माण करत असतो. मात्र आता सोशल मीडियामुळे सर्वच बाबतीत उथळपणा येत आहे. घरामध्ये असणारे आर्टिफिशियल झाड आणि वाळवंटातही तग धरून वाढणारे निवडुंग असा हा फरक आहे. तंत्रज्ञानामुळे आपण जवळ आलो. पण समजून घेण्याचे प्रमाण घटत आहे. १९९० नंतर झालेले वेगवान बदल हे मागील दोन हजार वर्षांत जेवढे बदल झाले, त्यापेक्षा अधिक वेगवान बदल होत असतील, हे निश्चित.