शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

सकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 6:08 PM

नव्या विमानसेवेच्या गरजेवर शिक्कामोर्तब

ठळक मुद्देपहिल्या दिवशी ७२, तर दुसऱ्या दिवशीचे बुकिंग शंभरावरऔरंगाबादहून जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळचे विमान मार्चपासून बंद

औरंगाबाद : हज यात्रेनिमित्त एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी सकाळच्या वेळेत चालविण्यात येणाऱ्या दिल्ली- औरंगाबाद विमानाला रविवारी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरातून नव्या विमानसेवेची किती गरज आहे, हे स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

औरंगाबादहून जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळचे विमान मार्चपासून बंद झाले. त्यामुळे पर्यटन, उद्योगासह विविध क्षेत्रांवर परिणाम होत असल्याने नव्या विमानसेवेची अवघ्या शहरवासीयांना प्रतीक्षा लागली आहे. जेट एअरवेजचे विमान बंद झाल्यापासून चिकलठाणा विमानतळावरून सकाळच्या वेळेत विमान नाही; परंतु हज यात्रेच्या निमित्ताने विमानतळ सकाळच्या सत्रात गजबजत आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २७ जुलैपर्यंत हज यात्रेकरू  औरंगाबादहून थेट जेद्दाहला रवाना होणार आहेत. हज यात्रेसाठी दिल्लीहून औरंगाबादला येणाऱ्या विमानातून यंदा प्रवासी वाहतूक केली जात आहे. 

अवघ्या ७ दिवसांसाठी उड्डाण घेणाऱ्या सकाळच्या वेळेतील दिल्ली- औरंगाबाद विमानातून पहिल्याच दिवशी रविवारी दिल्लीहून ७२ प्रवासी औरंगाबादला दाखल झाले, तर दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे सोमवारी दिल्लीहून येणाऱ्या विमानाची बुकिंग शंभरावर असल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. केवळ सात दिवसांसाठी का होईना, प्रवाशांना दिल्ली- औरंगाबाद विमानसेवा यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. 

जेट एअरवेजच्या विमानसेवेमुळे सकाळच्या वेळेत औरंगाबादला मुंबई आणि दिल्ली हवाई क नेक्टिव्हिटी मिळत होती; परंतु आता ही कनेक्टिव्हिटी केवळ एअर इंडियाच्या माध्यमातूनच सुरू आहे. तीदेखील सायंकाळी. त्यामुळे दिल्लीहून औरंगाबाद- मुंबईला ये-जा करणाऱ्यांना अर्ध्या दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. सकाळच्या वेळेत मुंबई, दिल्लीसह अन्य शहरांसाठी विमान सुरू झाले, तर पर्यटन, उद्योग क्षेत्रासह प्रवाशांची मोठी सुविधा होईल. त्यामुळे नव्या विमानसेवेकडे लक्ष लागले आहे. 

स्पाईस जेट, ‘इंडिगो’च्या वेळापत्रकाची प्रतीक्षाचिकलठाणा विमानतळावरून विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. त्यास विमान कंपन्यांचा प्रतिसाद मिळत असून, लवकरच विमानसेवा सुरूहोण्याची आशा निर्माण झाली आहे. स्पाईस जेट, इंडिगो या विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर पाहणी केली आहे. आॅगस्टपासून विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वेळापत्रक कधी जाहीर होते, याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे.

सकाळी विमान गरजेचेसकाळच्या वेळेत विमानाची मागणी आहे. पर्यटनाचा विचार करता तशी गरजदेखील आहे. सात दिवसांसाठी येणाऱ्या विमानाला मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे दिसून येत आहे, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत म्हणाले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनdelhiदिल्लीAurangabadऔरंगाबाद