शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नैसर्गिक-मानवनिर्मित आपत्तीत शहर कसे वाचविणार? हानी कमी करण्यासाठी मनपाचा आराखडा

By मुजीब देवणीकर | Updated: February 8, 2024 16:45 IST

१ फेब्रुवारी रोजी शहरात गॅसगळतीची घटना घडली. या घटनेनंतर उपाययोजनांवर व्यापक प्रमाणात भर दिला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरावर नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती कधी येईल, याचा नेम नसतो. अशा पद्धतीचे एखादे संकट आलेच तर वित्त, जीवितहानी कशी कमी करता येईल, याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. मागील १० वर्षांत शहरावर आलेल्या आपत्तींचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी राज्य शासनाने दोन संस्थांची नेमणूक केली असून, बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयात प्राथमिक बैठकही घेण्यात आली.

१ फेब्रुवारी रोजी शहरात गॅसगळतीची घटना घडली. या घटनेनंतर उपाययोजनांवर व्यापक प्रमाणात भर दिला जात आहे. त्यातच युनायटेड डेव्हलपमेंट प्लान आणि राज्य शासनाने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी आरएमएसआय व ॲल्युबियम या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर शहरांचा अशा प्रकारचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

बैठकीत कंपन्यांतर्फे कामाचे स्वरूप नमूद करण्यात आले. मागील दहा वर्षांत शहरावर आलेल्या संकटांचा अभ्यास करून कमीत कमी हानी व्हावी, यासाठी आराखडा तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मोठे पूर, आगीच्या घटना, भूकंप, गॅसगळतीसह इतर आपत्तींचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाईल. यावेळी आरएमएसआयचे डॉ. मुरली कृष्णा, वरिष्ठ अभियंता मोहम्मद जुनेद, पार्थ गोहेल, दिल्ली येथील आकाश मलिक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता ए. बी. देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुखना, खाम नदीपात्रशहरातील पूरपरिस्थिती लक्षात घेऊन खाम नदीपात्रात रेड व ब्लू लाइनचे मार्किंग केले आहे. सुखना नदीत असे मार्किंग नाही. त्यामुळे सुखना नदीतही मार्किंग करण्याची सूचना बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने संपूर्ण यंत्रणा स्मार्ट सिटी कार्यालयातील कनेक्ट असावी, अशीही सूचना करण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAccidentअपघात