शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

नैसर्गिक-मानवनिर्मित आपत्तीत शहर कसे वाचविणार? हानी कमी करण्यासाठी मनपाचा आराखडा

By मुजीब देवणीकर | Updated: February 8, 2024 16:45 IST

१ फेब्रुवारी रोजी शहरात गॅसगळतीची घटना घडली. या घटनेनंतर उपाययोजनांवर व्यापक प्रमाणात भर दिला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरावर नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती कधी येईल, याचा नेम नसतो. अशा पद्धतीचे एखादे संकट आलेच तर वित्त, जीवितहानी कशी कमी करता येईल, याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. मागील १० वर्षांत शहरावर आलेल्या आपत्तींचा अभ्यास केला जाईल. त्यासाठी राज्य शासनाने दोन संस्थांची नेमणूक केली असून, बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयात प्राथमिक बैठकही घेण्यात आली.

१ फेब्रुवारी रोजी शहरात गॅसगळतीची घटना घडली. या घटनेनंतर उपाययोजनांवर व्यापक प्रमाणात भर दिला जात आहे. त्यातच युनायटेड डेव्हलपमेंट प्लान आणि राज्य शासनाने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी आरएमएसआय व ॲल्युबियम या कंपन्यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर शहरांचा अशा प्रकारचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

बैठकीत कंपन्यांतर्फे कामाचे स्वरूप नमूद करण्यात आले. मागील दहा वर्षांत शहरावर आलेल्या संकटांचा अभ्यास करून कमीत कमी हानी व्हावी, यासाठी आराखडा तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मोठे पूर, आगीच्या घटना, भूकंप, गॅसगळतीसह इतर आपत्तींचा विचार केला जाणार आहे. त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाईल. यावेळी आरएमएसआयचे डॉ. मुरली कृष्णा, वरिष्ठ अभियंता मोहम्मद जुनेद, पार्थ गोहेल, दिल्ली येथील आकाश मलिक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता ए. बी. देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुखना, खाम नदीपात्रशहरातील पूरपरिस्थिती लक्षात घेऊन खाम नदीपात्रात रेड व ब्लू लाइनचे मार्किंग केले आहे. सुखना नदीत असे मार्किंग नाही. त्यामुळे सुखना नदीतही मार्किंग करण्याची सूचना बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने संपूर्ण यंत्रणा स्मार्ट सिटी कार्यालयातील कनेक्ट असावी, अशीही सूचना करण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAccidentअपघात