शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बंद झालेले बँक खाते पुन्हा कसे सुरू करणार ? जाणून घ्या नियम

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 22, 2023 17:50 IST

कोरोना काळानंतर खाते बंद होण्याचे वाढले प्रमाण

छत्रपती संभाजीनगर : शहरात अनेक बँक खातेदार असे आहेत की, त्यांनी आपल्या खात्यावर मागील एक ते दोन वर्षात एकही व्यवहार केला नाही. यामुळे बँकेने त्यांचे खातेच बंद करून टाकले आहेत. अहो, अशी शेकडो खाती निष्क्रिय झाली आहेत. मात्र, आपले खाते पुन्हा सुरू करता येते याची माहितीच या खातेदारांना नसल्याचे दिसून आले. पण चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही हे बंद खाते पुन्हा सक्रिय करू शकता, पण त्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कागदपत्रे बँकेला दाखवावी लागणार आहेत.

बँक खाती निष्क्रिय कधी होतात?तुम्ही बँकेत खाते उघडल्यावर तुम्हाला काही नियमांचे पालन करावेच लागते. त्या दर महिन्याला व्यवहार होणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक खातेदार असे आहेत की, ते सहा महिने, वर्षभर त्या खात्यात व्यवहार करीत नाहीत. बँक अशा वेळीस सूचना देत असते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्षभरापेक्षा अधिक काळ तुमच्या खात्यात व्यवहार न झाल्यास खात्यास निष्क्रियतेच्या यादीमध्ये टाकले जाते.

कोरोना काळानंतर खाते बंद होण्याचे वाढले प्रमाणसेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनानंतरच्या दोन वर्षात खाते निष्क्रिय होण्याचे प्रमाण वाढले, वर्ष, दोन वर्ष त्या खात्यांमध्ये व्यवहारच झाले नव्हते. अशा खात्यांची संख्या अधिक होती. मात्र, आता खाते बंद होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

बँक खाते पुन्हा सुरू कसे कराल ?एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खाते बंद झाल्यानंतर ते सुरू करण्यासाठी काय करावे लागते, हे १०० पैकी ८५ खातेदारांना माहीतच नाही. ज्यांचे खाते बंद झाले आहे त्यांनी सरळ आपल्या बँकेच्या संबंधित शाखेत जावे. तेथील अधिकाऱ्यांना किंवा व्यवस्थापकाला भेटावे. त्यानंतर बंद खाते चालू करण्यासाठी लेखी अर्ज भरून द्यावा लागतो. तसेच बँकेत केवायसी फॉर्म मिळतो तोही भरून द्यावा लागतो. याशिवाय आपले आधारकार्ड, पॅनकार्ड व अन्य कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती द्याव्या लागतात. संपूर्ण शहनिशा करून बँक आपले खाते पुन्हा सुरू करते. आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबाद