शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पाणीपुरवठा योजनेतील २७० कोटींचे ‘विघ्न’ कसे दूर करायचे? मनपासमोर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 16:43 IST

अगोदर मनपाचा वाटाही राज्य शासन देईल, असे सांगण्यात आले होते. नंतर राज्य शासनाने हात वर केले.

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेत राज्य शासनाने महापालिकेवर टाकलेला आर्थिक भार प्रशासनासाठी असह्य ठरत आहे. योजनेत मनपाला ८२२ कोटी रुपयांचा वाटा टाकणे बंधनकारक आहे. राज्य शासनाने ५२२ कोटींचे सॉफ्ट लोन घेण्यास मंजुरी दिली. उर्वरित २७० कोटींचे विघ्न कसे दूर करायचे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मनपाचा वाटा उशिराने दिल्यास योजनेच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवीन पाणीपुरवठा योजना १८४० कोटींवरून २७४० कोटींपर्यंत पोहोचली. अचानक खर्च वाढल्याने शहरातील राजकीय मंडळींनी योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये करण्याचा निर्णय घेतला. केंद्रानेही त्याला मंजुरी दिली. एकूण योजनेत केंद्र शासनाने २५ टक्के म्हणजेच ६८५ कोटी, ४५ टक्के राज्य शासन ही रक्कम १२३३ कोटी रुपये होते. ३० टक्के मनपाचा वाटा ८२२ कोटी रुपये होतोय. अगोदर मनपाचा वाटाही राज्य शासन देईल, असे सांगण्यात आले होते. नंतर राज्य शासनाने हात वर केले. मनपाने वारंवार अनुदान द्यावे, अशी मागणी केली. खंडपीठानेही अनुदान देण्याचे राज्य शासनाने आदेश दिले. त्यानंतरही शासनाने मनपाला ८२२ कोटींसाठी सॉफ्ट लोनसाठी मंजुरी दिली. मागील महिन्यातच शासनाने यासंदर्भातील जीआर सुद्धा काढला. ८२२ कोटींच्या तुलनेत ७५ टक्के रक्कम महापालिकेला सॉफ्ट लोन म्हणून दिली जाईल, असे त्यात नमूद केले आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम म्हणजे सुमारे २७० कोटी पालिकेला स्वनिधीतून द्यावे लागतील. एवढी मोठी रक्कम आणायची कोठून हा मनपासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे.

सध्या पगाराचे वांदेदरमहा अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी मनपाकडे पैसे नसतात. सध्या बँक ओव्हर ड्राफ्टच्या माध्यमाने १ तारखेला पगार करीत आहे. जीएसटीचे पैसे शानाकडून आल्यावर बँकेला पगाराचे पैसे देण्यात येतात.

अत्यावश्यक खर्चदरमहा अत्यावश्यक खर्च म्हणजे पाणीपुरवठ्याचे वीज बिल, पथदिव्यांचे बिल, डिझेल, कचरा संकलन, प्रक्रिया आदींसाठी ४५ कोटी रुपये लागतात. दरमहा एवढी रक्कम तिजोरीत जमा सुद्धा होत नाही. अशा परिस्थतीत २७० कोटी रुपये कोठून द्यायचे हा प्रश्न आहे.

पत्राची वाट पाहतोयशासनाने ८२२ कोटींच्या लोनसाठी जीआर काढला. मनपाला अद्याप पत्र मिळाले नाही. पत्र प्राप्त झाल्यानंतरच पुढे काय करायचे हे ठरेल.- संतोष वाहुळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका