शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

किती आयुक्तांना पिटाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:30 AM

औरंगाबाद महापालिकेत आयुक्तच टिकत नाहीत, अशी ख्याती आता शहरभर नव्हे, तर राज्यपातळीवर जाऊन पोहोचली आहे. येथे कायमस्वरूपी आयुक्त टिकून राहावेत यासाठी काय करावे, असा प्रश्न नगरविकास विभागाच्या अधिकाºयांना पडला आहे. १९८२ पासून २०१७ पर्यंत महापालिकेला तब्बल २६ आयुक्त प्राप्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेत आयुक्तच टिकत नाहीत, अशी ख्याती आता शहरभर नव्हे, तर राज्यपातळीवर जाऊन पोहोचली आहे. येथे कायमस्वरूपी आयुक्त टिकून राहावेत यासाठी काय करावे, असा प्रश्न नगरविकास विभागाच्या अधिकाºयांना पडला आहे. १९८२ पासून २०१७ पर्यंत महापालिकेला तब्बल २६ आयुक्त प्राप्त झाले. त्यातील ७ जणांना राजकीय मंडळींनी अक्षरश: पिटाळून लावले आहे, काहींनी तर परिस्थितीचा अंदाज घेऊन अवघ्या काही दिवसांमध्येच बदली करून घेतली आहे.महापालिकेत सध्या आयुक्तपद संगीत खुर्चीसारखे झाले आहे. मागील आठवड्यात पूर्णवेळ लाभलेले आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मुसरी येथील प्रशिक्षणानंतर परत मनपात येणार नाही, असे सांगितले आहे. त्यांना ऐनवेळी कुठे नेमणूक द्यावी, असा प्रश्न प्रधान सचिवांना पडला असून, त्यांच्या जागी कोणाची नेमणूक करावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. महापालिकेत आयुक्त का टिकत नाही, यावर एक मोठे संशोधनही होऊ शकते. १९९१ पासून आजपर्यंत दोन आयुक्तांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यात असीमकुमार गुप्ता आणि डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा समावेश होतो. उर्वरित आयुक्तांनी बोटावर मोजण्याएवढ्या महिन्यांतच बदली करून घेतली. काहींना बदली करून घेण्यास भाग पाडण्यात आले. राजकीय मंडळींनी आपले ‘व्हील पॉवर’वापरून काही आयुक्तांच्या बदल्या करून घेतल्या. मागील दोन दशकांतील आयुक्तांचा प्रवास त्यांच्यासोबत झालेल्या घडलेल्या घटनांचा आढावा घेतला, तर एक रंजक इतिहास उभा राहतो. मनपातील राजकीय मंडळींना आयुक्त नको असल्यास राजकीय गॉडफादरचा आधार घेण्यात येतो.अन्यथा प्रकाश महाजन यांच्यावर तर सेना-भाजप, एमआयएम नगरसेवकांनी मिळून अविश्वास ठराव पारित करून त्यांची बदली केली होती. विद्यमान आयुक्त मुगळीकर यांच्याबद्दल एकही तक्रार नव्हती. अचानक त्यांना मनपा नको म्हणण्याची वेळ का आली. हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.