शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

पाऊस लांबत चालल्याने प्रशासन हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:11 IST

नियमित पावसाळा सुरू होऊन ११ दिवस उलटले असून, औरंगाबाद विभागात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दुष्काळ उपाययोजनेत असलेली प्रशासकीय यंत्रणा हवालदिल झाली असून, उपाययोजनेबाबत विभागीय प्रशासनात चिंतन वाढली आहे.

ठळक मुद्देदुष्काळ उपाययोजना : टँकरच्या आकड्यात घट होण्याऐवजी वाढ

औरंगाबाद : नियमित पावसाळा सुरू होऊन ११ दिवस उलटले असून, औरंगाबाद विभागात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे दुष्काळ उपाययोजनेत असलेली प्रशासकीय यंत्रणा हवालदिल झाली असून, उपाययोजनेबाबत विभागीय प्रशासनात चिंतन वाढली आहे.पाऊस लांबल्यामुळे टँकरच्या आकड्यात घट होण्याऐवजी वाढ होत आहे. खरीप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. विभागात ५६ लाख ४१ हजार ९५ नागरिकांना ३ हजार ५०६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर औंरगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. ११७० टँकरने जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू असून, १९ लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात ९७६ आणि जालना जिल्ह्यात ७०१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने ३० जूनपर्यंत टंचाईच्या अनुषंगाने तयारी केली असली, तरी पाऊस लांबला तर यंत्रणेला प्रशासकीय कामे बाजूला ठेवून उपाययोजनांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.मराठवाड्यात सध्या २४६१ गावे तहानलेली आहेत. या गावांची तहान टँकरच्या पाण्यावरच आहे. आजवर विभागात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पाऊस झाला असता, तर किमान टँकरचा आकडा तरी कमी झाला असता, अशी प्रतिक्रिया प्रशासनातून उमटत आहे. ५६९९ विहिरी अजूनही अधिग्रहित आहेत.दुष्काळामुळे बदल्यांवर परिणामदुष्काळामुळे बदल्यांवर परिणाम होत आहे. तलाठ्यांच्या बदल्या रोखण्यासाठी गावांतील राजकारण्यांची शिष्टमंडळे तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटून विनंत्या करू लागले आहेत. विद्यमान तलाठ्यांच्या बदल्या आॅक्टोबरपर्यंत तरी करू नका, अशा मागण्या वाढू लागल्या आहेत.हवामानतज्ज्ञ काय सांगतात?हवामानतज्ज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, राज्यासह मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात नियमित मान्सून सक्रिय होण्यासाठी १ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पूर्वमोसमी पाऊस हाच नियमित मान्सून असल्याचा समज होऊ शकतो. हा आभासी मान्सून आहे, त्यामुळे पेरण्यांचे सूत्र शेतकऱ्यांना लांबवावे लागेल.विभागात आजवर किती पाऊस झालामराठवाड्यात ७ जूनपासून आजवर ७७९ मि.मी. या वार्षिक सरासरीच्या तुलनेत १८.७ टक्के पाऊस झाला आहे. किमान ८७ मि.मी. पाऊस विभागात होणे अपेक्षित होते. २.१ टक्के इतका हा पाऊस आहे. १८ जून रोजी ०.११ मि.मी. पावसाची विभागात नोंद झाली आहे. १ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय झाला नाही तर पावसाचा मोठा खंड निर्माण होईल.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळRainपाऊस