शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीच सहा गुंठे जमीन परस्पर विकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 18:17 IST

सभासदाला दिलेली सहा गुंठे जागा त्यांच्या समंतीविना गृहनिर्माण सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीच परस्पर विक्री केल्याचे समोर आले.

औरंगाबाद : सभासदाला दिलेली सहा गुंठे जागा त्यांच्या समंतीविना गृहनिर्माण सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीच परस्पर विक्री केल्याचे समोर आले. याप्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध  सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

आनंद गोविंद मुळे (रा. पिंपरी चिंचवड, पुणे), राजेंद्र विष्णुपंत सदावर्ते (रा. धावणी मोहल्ला, शाहगंज), संजय विष्णुपंत सदावर्ते, चेतन प्रकाश चांडोले (रा.नाशिक), लक्ष्मण त्रिंबक चिंडोलेरा आणि शाम पंढरीनाथ बेदडे (रा.औरंगाबाद), अशी आरोपींची नावे आहेत. सातारा पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पुरुषोत्तम प्रभाकर पवार (रा. गणेशनगर, धायरी, पुणे) यांच्या वडिलांनी नक्षत्रवाडी येथील संत शिरोमणी नामदेव महाराज गृहनिर्माण सोसायटीचे सभासदत्व घेतले होते.

१९८१ साली नियोजित गृहनिर्माण संस्थेतील सहा गुंठे जागा त्यांना देण्यात आली. त्याबाबतची कागदपत्रेही सोसायटीने तक्रारदार यांच्या वडिलांना दिली होती. तक्रारदारांच्या वडिलांच्या परस्पर आरोपींनी त्यांची सहा गुंठे जागा २००७ साली विक्री केली. या जागेला आज लाखो रुपये किंमत आहे.  तक्रारदार हे त्यांच्या वडिलांचा भूखंड पाहण्यासाठी गृहनिर्माण सोसायटीत गेले तेव्हा त्यांना आरोपींनी कशाची जागा, कोणता भूखंड असा सवाल करीत तुमच्या वडिलांची येथे जागा नसल्याचे सांगितले. 

तक्रारदारांनी त्यांना संस्थेची कागदपत्रे दाखविली; मात्र आरोपींनी त्यांचे ऐकून घेतले नाही. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या वडिलांना देण्यात आलेली सहा गुंठे जागा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर दुसऱ्याच व्यक्तीला विक्री केल्याचे समजले. त्यांनी याविषयी आरोपींकडे विचारणा केली असता त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. आपली आणि आपल्या वडिलांची आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी याविषयी सातारा ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, तपास उपनिरीक्षक सागर कोते करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस