शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

घोड्यास दयामरण : भावनाविवश मुलाने फोनवर विचारले ‘साहेब...आमचा घोडा गेला का?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:55 IST

‘ग्लँडर्स’ची लागण झालेल्या एका घोड्याला दिले भुलीच्या इंजेक्शनसह अन्य एक इंजेक्शन  

ठळक मुद्देघोड्याच्या मालकास भावना अनावर  ग्लँडर्स आजार संसर्गजन्य आजार आहे. विषाणू इतर प्राण्यांबरोबर माणसाच्या शरीरात जाण्याचा धोका

औरंगाबाद : ‘ग्लँडर्स’ आजाराची लागण झालेल्या एका घोड्याला गुरुवारी पडेगाव परिसरात दयामरण देण्यात आले. हा क्षण पाहताना घोड्याचा मालक आणि त्यांच्या तरुण मुलाला भावना अनावर झाल्या. विरहाच्या दु:खाने तो तरुण दयामरणाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच निघून गेला. त्यानंतर त्याने पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना फोन करून ‘साहेब...आमचा घोडा गेला का?’ अशी विचारणा केली. तेव्हा या प्रसंगाने अधिकाऱ्यांचेही मन हळहळले.

कोकणवाडीतील दोन घोड्यांना ग्लँडर्स आजारांची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत त्या दोन्हीही घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार बुधवारी पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या परिसरात दयामरण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह घोड्याचे मालक जनार्दन तांबे,  त्यांचा मुलगा नीलेश तांबे यांची उपस्थिती होती. 

घोड्याला भुलीच्या इंजेक्शनसह अन्य एक इंजेक्शन देण्यात आले. यासाठी जवळपास ८ फूट खड्डा खोदण्यात आला. दयामरणाची वेळ जसजशी जवळ येत होती, तशा तांबे यांच्या भावना अनावरण होत होत्या. ही पूर्ण प्रक्रिया पाहणे त्यांना कठीण जात होते. ज्या घोड्याला प्रेमाने वाढविले, त्याचा मृत्यू डोळ्यादेखत पाहणे टाळून नीलेश तांबे (२२) हे निघून गेले. त्यांनी नंतर फोन करून विचारणा केली.

दुसऱ्या घोड्यालाही देणार दयामरणदुसऱ्या घोड्यालाही दयामरण देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, असे पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी म्हणाले.

‘ग्लँडर्स’ आजारांच्या घोड्यांना इंग्रजांच्या काळात गोळी मारतऔरंगाबादेत पहिल्यांदाच ‘ग्लँडर्स’ या आजाराची लागण झालेल्या दोन घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र,  इंग्रजांच्या काळात हा आजार होणाऱ्या घोड्यांना थेट गोळी मारली जात. विजेचा धक्का, डोंगरावरून ढकलूनही त्यांचे प्राण घेतले जात. कायद्यातील दुरुस्तीमुळे आता घोड्यांना दयामरण दिले जाते. यामुळे या मुक्या प्राण्यांच्या वेदना कमी होण्यासह हा आजार माणसांत पसरण्याचाही धोका टळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान आणि अन्य पर्यटनस्थळांवर घोडेस्वारीसाठी मोठ्या प्रमाणात घोडे पाळले जातात. पावसाळ्यात काही काम नसते. तेव्हा या कालावधीत मोकाट फिरणाऱ्या घोड्यांना हा आजार होतो. पाचगणीत येथे घोड्यांची संख्या मोठी आहे. २००६ साली १५ घोड्यांना या आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले हाते. या घोड्यांनाही दयामरण देण्यात आले होते. औरंगाबादेत पहिल्यांदाच या आजारांचे घोडे आढळून आले. 

कायद्यात झाली सुधारणा ‘ग्लँडर्स फार्सी कायदा १८९९’ नुसार इंग्रजांच्या काळात या प्राण्याला गोळी मारून ठार करण्यात येत, यानंतर पुढे कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. आता इन्फेक्शियस अ‍ॅण्ड काँटेजीएस डिसिस प्रिव्हेन्शन अ‍ॅण्ड कंट्रोल अ‍ॅक्ट-२००९ आहे. या रोगाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याला दयामरण देण्यासाठी शासनाच्या नियमानुसार समिती गठीत करण्यात येते. समिती प्राण्याचे रक्त तपासते. पशुवैद्यकीय यंत्रणेचा अहवाल घेतला जातो. समितीचा अहवाल आल्यानंतर मग त्याला मरण होताना वेदना होऊ नयेत म्हणून भुलीचे इंजेक्शन देण्यात येते. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते. ‘ग्लँडर्स’या रोगाबाबत आजही औषध किंवा लस उपलब्ध नाही.

काय असतो धोका?ग्लँडर्स आजार संसर्गजन्य आजार आहे. या आजारामुळे घोड्यांच्या शरीरावर मोठमोठे फोड येतात. फोड फुटल्यानंतर त्यातून पू आणि रक्त बाहेर पडते. या रक्त आणि पू यामुळेच ग्लँडर्सचा विषाणू इतर प्राण्यांबरोबर माणसाच्या शरीरात जाण्याचा धोका असतो. त्यामुळे निदान होताच आजारी घोड्याला इतर घोडे आणि मानवी वस्तीपासून दूर ठेवले जाते. पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी म्हणाले, घोड्यांपासून हा आजार माणसांत पसरण्याची शक्यता असते. माणसाला झाला तर इतर व्यक्तींमध्ये पसरू शकतो. त्यामुळे खबरदारी घेतली जाते.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादforestजंगल