शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सत्तांतरानंतर मराठवाडा वॉटरग्रीड कामाच्या आशा पल्लवित; ११ धरणे बंद जलवाहिनीने जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:57 IST

इस्त्रायलच्या शिष्टमंडळाकडून प्रशासकीय भेटी

औरंगाबाद : मराठवाडा वॉटरग्रीडचे काम मागील अडीच वर्षांपासून कागदोपत्रीच आहे. २२ कोटींतून इस्त्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर ग्रीडच्या कामाला ‘ब्रेक’ लागला. आता राज्यात सत्तांतरानंतर पुन्हा ग्रीडच्या कामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इस्त्रायलच्या राजदुतांसह शिष्टमंडळाने औरंगाबाद जिल्ह्यातील जल व्यवस्थापन काम करण्यासह ग्रीडचे काम करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर भेटी घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची डॉ. लिओ असफ यांच्यासह तिघांच्या शिष्टमंडळाने बुधवारी भेट घेतली.

शेती, पिण्यासाठी, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन ग्रीडमध्ये करण्यात येणार आहे. या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु, निविदा प्रक्रियेतच ते काम २०२० पासून बंद पडले. जायकवाडी, उजनी, येलदरी, सिद्धेश्वर, विष्णूपुरी, सीना कोळेगाव, माजलगाव, निम्न तेरणा, निम्न मनाड, ईसापूर, पेनगंगा ही ११ धरणे मोठ्या बंद जलवाहिनीने जोडायची ही योजना आहे.

ग्रीडमधील वापरण्यात येणाऱ्या जलवाहिनीचा व्यास हा कार जाईल, एवढा मोठा असेल. काही जलतज्ज्ञांच्या मते वॉटरग्रीड भौगोलिक व तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे, परंतु इस्त्रायलचे तंत्रज्ञान वापरतो आहोत. त्यामुळे योजना यशस्वी होईल, असा दावा तीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सांगितले, इस्त्रायलच्या शिष्टमंडळाने स्मार्ट सिटीतील कामांबाबत माहिती घेतली. जल व्यवस्थापनात त्यांचे तंत्रज्ञान कसे आहे, यावर त्यांनी माहिती दिली.

थोडक्यात मराठवाडा वॉटरग्रीड असे२२ कोटींतून इस्त्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम केले आहे. १३३० कि. मी. लांबीची मुख्य जलवाहिनी त्यात प्रस्तावित असून, ११ धरणे एकमेकांशी जोडण्याची ही योजना आहे. प्रत्येक तालुक्यात पाणी देण्यासाठी ३२२० कि. मी. जलवाहिनी टाकण्याचे नियोजन, पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशुद्ध पाणी, मुख्य जलवाहिनीसाठी ३८५५ कोटींचा खर्च होता. त्यात आता वाढ होईल. २०५०पर्यंत ९६० दशलक्ष मीटर पाण्याची गरज विभागाला असून, त्यासाठी हा प्रकल्प कागदावर आला होता.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद