शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

सत्तांतरानंतर मराठवाडा वॉटरग्रीड कामाच्या आशा पल्लवित; ११ धरणे बंद जलवाहिनीने जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:57 IST

इस्त्रायलच्या शिष्टमंडळाकडून प्रशासकीय भेटी

औरंगाबाद : मराठवाडा वॉटरग्रीडचे काम मागील अडीच वर्षांपासून कागदोपत्रीच आहे. २२ कोटींतून इस्त्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर ग्रीडच्या कामाला ‘ब्रेक’ लागला. आता राज्यात सत्तांतरानंतर पुन्हा ग्रीडच्या कामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इस्त्रायलच्या राजदुतांसह शिष्टमंडळाने औरंगाबाद जिल्ह्यातील जल व्यवस्थापन काम करण्यासह ग्रीडचे काम करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर भेटी घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची डॉ. लिओ असफ यांच्यासह तिघांच्या शिष्टमंडळाने बुधवारी भेट घेतली.

शेती, पिण्यासाठी, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन ग्रीडमध्ये करण्यात येणार आहे. या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु, निविदा प्रक्रियेतच ते काम २०२० पासून बंद पडले. जायकवाडी, उजनी, येलदरी, सिद्धेश्वर, विष्णूपुरी, सीना कोळेगाव, माजलगाव, निम्न तेरणा, निम्न मनाड, ईसापूर, पेनगंगा ही ११ धरणे मोठ्या बंद जलवाहिनीने जोडायची ही योजना आहे.

ग्रीडमधील वापरण्यात येणाऱ्या जलवाहिनीचा व्यास हा कार जाईल, एवढा मोठा असेल. काही जलतज्ज्ञांच्या मते वॉटरग्रीड भौगोलिक व तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे, परंतु इस्त्रायलचे तंत्रज्ञान वापरतो आहोत. त्यामुळे योजना यशस्वी होईल, असा दावा तीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सांगितले, इस्त्रायलच्या शिष्टमंडळाने स्मार्ट सिटीतील कामांबाबत माहिती घेतली. जल व्यवस्थापनात त्यांचे तंत्रज्ञान कसे आहे, यावर त्यांनी माहिती दिली.

थोडक्यात मराठवाडा वॉटरग्रीड असे२२ कोटींतून इस्त्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम केले आहे. १३३० कि. मी. लांबीची मुख्य जलवाहिनी त्यात प्रस्तावित असून, ११ धरणे एकमेकांशी जोडण्याची ही योजना आहे. प्रत्येक तालुक्यात पाणी देण्यासाठी ३२२० कि. मी. जलवाहिनी टाकण्याचे नियोजन, पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशुद्ध पाणी, मुख्य जलवाहिनीसाठी ३८५५ कोटींचा खर्च होता. त्यात आता वाढ होईल. २०५०पर्यंत ९६० दशलक्ष मीटर पाण्याची गरज विभागाला असून, त्यासाठी हा प्रकल्प कागदावर आला होता.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद