शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

एमआयडीसीत गुंडांचा धुडगूस; औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात दहशतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 7:35 PM

MIDC Aurangabad : या घटनांमुळे दहशतीखाली आलेले उद्योजक व त्यांच्या संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन, गुंडांना आवरा, अन्यथा उद्योगांना येथून आपले बस्तान हलवावे लागेल, असा इशाराच दिला आहे.

ठळक मुद्देभोगले ऑटोमोटिव्ह प्रकरणात पोलिसांनी तिघांना विविध कलमांखाली अटककामगारांच्या जबाबातून आणखी काही आरोपींची ओळख पटविण्यात आले

औरंगाबाद : रेल्वे स्टेशन औद्योगिक वसाहतीतील भोगले ऑटोमोटिव्हच्या व्यवस्थापकीय संचालकांना दोन दिवसांपूर्वी रविवारी (दि. ८ ऑगस्ट) काही गुंडांनी कंपनीत घुसून मारहाण केली. भोगले ऑटोमोटिव्ह प्रकरणात पोलिसांनी तिघांना विविध कलमांखाली अटक केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तेथील कामगारांच्या जबाबातून आणखी काही आरोपींची ओळख पटविण्यात आली असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली. (An atmosphere of terror in the industrial sector of Auranabad )

या घटनेस ४८ तासही उलटत नाहीत तोच मंगळवारी (दि. १०) रात्री वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी शिवारातील श्रीगणेश कोटिंग कंपनीचे व्यवस्थापक शिरीषकुमार राजेभोसले (रा. नक्षत्रवाडी) हे कंपनीतून दुचाकीने घरी परतत असताना, १० ते १५ जणांच्या टोळक्याने त्यांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेभोसले यांचा डावा हात मोडला असून डोळ्याजवळ मोठी जखम झाली. छातीला व शरीराला मुका मार लागला. या कंपनीत कंत्राटी कामगार पुरविण्याचा ठेका देण्याच्या कारणावरून विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचे राजेभोसले यांचे म्हणणे आहे.

एमआयडीसीत गुंडगिरी वाढली; कंत्राट देण्याच्या कारणावरून व्यवस्थापकाला रस्त्यात अडवून मारहाण

या घटनांमुळे दहशतीखाली आलेले उद्योजक व त्यांच्या संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन, गुंडांना आवरा, अन्यथा उद्योगांना येथून आपले बस्तान हलवावे लागेल, असा इशाराच दिला आहे. सीआयआयचे अध्यक्ष रमण अजगावकर, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतेश चटर्जी, मसिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील, अखिल अब्बास, रवी माछर, मानसिंग पवार, संदेश झांबड आदींची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती. शिवाय ज्येष्ठ उद्योजक राम भोगले, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

कुणाचीही गुंडगिरी पोलीस खपवून घेणार नाहीतशहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले की, औद्योगिक वसाहतीत घडलेल्या या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोगले ऑटोमोटिव्ह प्रकरणात अटकेतील तिघांना सहज जामीन मिळणार नाही, अशीही कलमे आहेत. आणखी काही आरोपींची ओळख पटविण्यात आली असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. शहरात कुणाचीही गुंडगिरी पोलीस खपवून घेणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. तर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही, उद्योग क्षेत्रात गुंडगिरी सहन केली जाणार नाही असे सांगून, जिल्ह्यात उद्योग क्षेत्र वाढत असताना वातावरण खराब करण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत, तो सर्व मोडून काढण्यात येईल, असा इशारा दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसीMIDCएमआयडीसीCrime Newsगुन्हेगारी