शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By admin | Updated: August 23, 2014 00:49 IST

औरंगाबाद : अधिकाधिक कुशल बना, असा सल्ला आज येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिला.

औरंगाबाद : उद्योगांना कुशल कामगार मिळत नाहीत, ही समस्या ओळखा. अधिकाधिक कुशल बना, अगदी चांगले प्लंबर, मेकॅनिक, कारपेंटरसुद्धा महिन्याला लाख- लाख रुपये कमवीत आहेत, हे लक्षात घ्या, असा सल्ला आज येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिला.
बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनतर्फे आयोजित कामगारांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात तापडिया नाट्यमंदिरात ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, शेंद्रा- बिडकीन परिसरात डीएमआयसी येण्याची सुतराम शक्यता नव्हती; पण ती उद्योगमंत्री असताना मी खेचून आणली. आतापासूनच या डीएमआयसीमध्ये परदेशी कंपन्या यायला लागल्या आहेत. २०२० पर्यंत येथे अडीच लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. हे लक्षात घेता २०२० पर्यंत दहा लाख कुशल कामगार तयार करावे लागतील. औरंगाबाद शहरात दोनशे मर्सिडीज गाड्या आहेत; पण त्यांच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिक नाहीत. त्यासाठी पुण्याला जावे लागते, याकडे शिक्षणमंत्र्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी नमूद केले की, बजाजचा माझा संबंध खूप आला. शहर वाढत गेले. या शहराच्या नावलौकिकात बजाजचा मोठा वाटा आहे. अलीकडेच बजाजमध्ये कामगारांचा दहा हजार रुपये पगारवाढीचा चांगला करार झाला. याबद्दल मी संघटनेचेही अभिनंदन करतो. प्रा. सतीश सूर्यवंशी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. प्रारंभी, प्रमोद फडणीस यांनी प्रास्ताविक केले. मंचावर युनियनचे अध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे यांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उत्तम आसबे व पंडित तांबिले यांना भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा व आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष सुहास दाणी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कांतीलाल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कृउबाचे माजी सभापती पंकज फुलपगर, दामूअण्णा शिंदे, लक्ष्मण गोरे, प्रभाकर भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.