शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सत्तेतून तडीपार झाल्याने 'त्यांचे' मानसिक संतुलन बिघडले; सत्तारांनी टीकाकारांना सुनावले

By सुमेध उघडे | Updated: October 15, 2022 18:13 IST

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यामुळेच कम्युनिस्ट जवळ आले

औरंगाबाद: शिवसेना उद्धव ठाकरे गटातून जहरी टीका होत आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री किंवा बाळासाहेबांची शिवसेना यातून कोणी उत्तर देत नसल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सत्तेतून तडीपार झाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा सणसणीत टोला सत्तार यांनी टीकाकारांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतरांवर जोरदार टीका करत आहेत. चौफेर टीकेने अंधारे उद्धव गटाच्या स्टार नेत्या झाल्याची चर्चा आहे. दसरा मेळाव्यातील गाजलेल्या भाषणानंतर अंधारे यांनी ठाण्यात देखील मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांवर टीका केली. याची चर्चा सुरु असताना मात्र शिंदे गटातून टीकेस काहीच प्रत्युत्तर देण्यात नसल्याचे चित्र आहे. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, आम्हाला सर्व लक्षात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री संयमी आहेत. त्यामुळे ते काही बोलत नाहीत. सत्तेतून तडीपार झाल्याने मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही सत्तार यांनी टीकाकारांना लगावला.  

हिंदुत्व सोडल्यामुळेच कम्युनिस्ट जवळ आले अंधेरी पोट निवडणुकीत उद्धव ठाकरे सेना आणि भाजप-शिंदे गटात जोरदार लढत होण्याचे चिन्ह आहेत. निवडणुकीचे उमेदवारीवरून रणकंदन सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी एकेकाळचे कट्टर विरोधक भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांनी पाठिंबा दिला आहे. यापूर्वी संभाजी ब्रिगेडने देखील ठाकरे यांना पाठिंबा दिल्याने जाहीर केले होते. हे सर्व उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले म्हणून होत आहे. यामुळे तर मुख्यमंत्री शिंदे यांनी उठाव केला. येत्या काळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हेच खरे हिंदुत्ववादी असतील असेही सत्तार यांनी सांगितले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबाद