शहरं
Join us  
Trending Stories
1
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
2
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
3
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
4
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
5
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
6
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
7
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
8
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
9
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
10
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
11
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
12
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
13
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
14
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
15
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
16
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
17
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
19
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
20
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

सत्तेतून तडीपार झाल्याने 'त्यांचे' मानसिक संतुलन बिघडले; सत्तारांनी टीकाकारांना सुनावले

By सुमेध उघडे | Updated: October 15, 2022 18:13 IST

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यामुळेच कम्युनिस्ट जवळ आले

औरंगाबाद: शिवसेना उद्धव ठाकरे गटातून जहरी टीका होत आहे. मात्र, यावर मुख्यमंत्री किंवा बाळासाहेबांची शिवसेना यातून कोणी उत्तर देत नसल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सत्तेतून तडीपार झाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा सणसणीत टोला सत्तार यांनी टीकाकारांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतरांवर जोरदार टीका करत आहेत. चौफेर टीकेने अंधारे उद्धव गटाच्या स्टार नेत्या झाल्याची चर्चा आहे. दसरा मेळाव्यातील गाजलेल्या भाषणानंतर अंधारे यांनी ठाण्यात देखील मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांवर टीका केली. याची चर्चा सुरु असताना मात्र शिंदे गटातून टीकेस काहीच प्रत्युत्तर देण्यात नसल्याचे चित्र आहे. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, आम्हाला सर्व लक्षात येत आहे. मात्र, मुख्यमंत्री संयमी आहेत. त्यामुळे ते काही बोलत नाहीत. सत्तेतून तडीपार झाल्याने मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही सत्तार यांनी टीकाकारांना लगावला.  

हिंदुत्व सोडल्यामुळेच कम्युनिस्ट जवळ आले अंधेरी पोट निवडणुकीत उद्धव ठाकरे सेना आणि भाजप-शिंदे गटात जोरदार लढत होण्याचे चिन्ह आहेत. निवडणुकीचे उमेदवारीवरून रणकंदन सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी एकेकाळचे कट्टर विरोधक भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांनी पाठिंबा दिला आहे. यापूर्वी संभाजी ब्रिगेडने देखील ठाकरे यांना पाठिंबा दिल्याने जाहीर केले होते. हे सर्व उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले म्हणून होत आहे. यामुळे तर मुख्यमंत्री शिंदे यांनी उठाव केला. येत्या काळात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हेच खरे हिंदुत्ववादी असतील असेही सत्तार यांनी सांगितले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबाद