शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या महामार्गावर दरमहा १२८ अपघात; दहा महिन्यांत ‘समृद्धी’ने घेतले १२३ बळी

By विकास राऊत | Updated: October 16, 2023 12:43 IST

एमएसआरडीसीची यंत्रणा अपघातांच्या सत्रामुळे हताश झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील ५०२ कि.मी.चे लोकार्पण होऊन १० महिने तर दुसऱ्या टप्प्यातील ८० कि.मी. मार्गाचे लोकार्पण होऊन सहा महिने झाले आहेत. या दहा महिन्यांत महामार्गावर सर्व मिळून १२८१ अपघात झाले असून त्यात १२३ जणांचा बळी गेला आहे.

पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ राेजी झाले. तर दुसऱ्या टप्प्यातील लोकार्पण २६ मे २०२३ रोजी झाले. सुरुवातीला टायर फुटून अपघात वाढल्यामुळे ताशी वेगाची १५० ही मर्यादा १२० वर आणली गेली. नायट्रोजन हवेचे सेंटर्स सुरू केले. रात्रीच्या प्रवासासाठी रिफ्लेक्टर वाढविले. मदतीसाठी पूर्ण टोलनिहाय यंत्रणा उभारल्याचा दावा करण्यात येत असून एमएसआरडीसीची यंत्रणा अपघातांच्या सत्रामुळे हताश झाली आहे.

रात्री प्रवासासाठी महामार्गावरील सुविधारात्री प्रवासासाठी महामार्गावर माहितीचे रिफ्लेट बोर्ड आहेत. रोड संमोहन होत असल्यामुळे रबलिंग सिप टाकल्या आहेत. दर टोल प्लाझाच्या प्रवेशावर १५ कि.मी.अंतरात ते टाकल्यामुळे चालक अलर्ट होतो.

एमएसआरडीसीची यंत्रणा हताशअपघातांचे सत्र वाढत असल्यामुळे सर्व यंत्रणा हताश झाली आहे. आरोप महामार्गाशी निगडित यंत्रणेवर आहेत. वाहतूक नियमांचे पालन न करता बेलगाममध्ये वाहन चालविल्यामुळे अपघात होत आहेत. ही दुसरी बाजू असताना एमएसआरडीसीवरच सर्व यंत्रणा तुटून पडत असल्याने त्यांची यंत्रणा हताश होत आहे.

जिल्ह्यात किती अपघात?समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर आजवर जिल्ह्यात १४ लहान-मोठ्या अपघातांची नोंद झाली असून त्यात १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथिमक माहिती आहे. जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे अंतर १२० कि.मी.पर्यंत आहे.

१० महिन्यांत महामार्गावर झालेले अपघातनागपूर ते मुंबईपर्यंत एकूण अपघात १२८१किरकोळ अपघात ९३२मोठे अपघात ४१७ एकूण मृत्यू १२३

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात