शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

मृत्यूच्या महामार्गावर दरमहा १२८ अपघात; दहा महिन्यांत ‘समृद्धी’ने घेतले १२३ बळी

By विकास राऊत | Updated: October 16, 2023 12:43 IST

एमएसआरडीसीची यंत्रणा अपघातांच्या सत्रामुळे हताश झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील ५०२ कि.मी.चे लोकार्पण होऊन १० महिने तर दुसऱ्या टप्प्यातील ८० कि.मी. मार्गाचे लोकार्पण होऊन सहा महिने झाले आहेत. या दहा महिन्यांत महामार्गावर सर्व मिळून १२८१ अपघात झाले असून त्यात १२३ जणांचा बळी गेला आहे.

पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ राेजी झाले. तर दुसऱ्या टप्प्यातील लोकार्पण २६ मे २०२३ रोजी झाले. सुरुवातीला टायर फुटून अपघात वाढल्यामुळे ताशी वेगाची १५० ही मर्यादा १२० वर आणली गेली. नायट्रोजन हवेचे सेंटर्स सुरू केले. रात्रीच्या प्रवासासाठी रिफ्लेक्टर वाढविले. मदतीसाठी पूर्ण टोलनिहाय यंत्रणा उभारल्याचा दावा करण्यात येत असून एमएसआरडीसीची यंत्रणा अपघातांच्या सत्रामुळे हताश झाली आहे.

रात्री प्रवासासाठी महामार्गावरील सुविधारात्री प्रवासासाठी महामार्गावर माहितीचे रिफ्लेट बोर्ड आहेत. रोड संमोहन होत असल्यामुळे रबलिंग सिप टाकल्या आहेत. दर टोल प्लाझाच्या प्रवेशावर १५ कि.मी.अंतरात ते टाकल्यामुळे चालक अलर्ट होतो.

एमएसआरडीसीची यंत्रणा हताशअपघातांचे सत्र वाढत असल्यामुळे सर्व यंत्रणा हताश झाली आहे. आरोप महामार्गाशी निगडित यंत्रणेवर आहेत. वाहतूक नियमांचे पालन न करता बेलगाममध्ये वाहन चालविल्यामुळे अपघात होत आहेत. ही दुसरी बाजू असताना एमएसआरडीसीवरच सर्व यंत्रणा तुटून पडत असल्याने त्यांची यंत्रणा हताश होत आहे.

जिल्ह्यात किती अपघात?समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर आजवर जिल्ह्यात १४ लहान-मोठ्या अपघातांची नोंद झाली असून त्यात १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथिमक माहिती आहे. जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे अंतर १२० कि.मी.पर्यंत आहे.

१० महिन्यांत महामार्गावर झालेले अपघातनागपूर ते मुंबईपर्यंत एकूण अपघात १२८१किरकोळ अपघात ९३२मोठे अपघात ४१७ एकूण मृत्यू १२३

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात