शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

हायवेलगत जमिनी दाखवून वाटला करोडोंचा मोबदला; उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 12:39 IST

Highway Land Acquisition Scam: एनएच २११ मध्ये केलेल्या भूसंपादनातील अनियमिततेप्रकरणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.

औरंगाबाद : येथील निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांना शासनाने एनएच २११ च्या भूसंपादन (Highway Land Acquisition Scam) प्रक्रियेत गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे. शासनाचे अवर सचिव ए. जे. शेट्ये यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. बुधवारी सकाळी ते आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. (Residential deputy Collector Shashikant Hadgal suspended)

२०२० मध्ये हदगल हे उपविभागीय अधिकारी असताना त्यांच्या विरोधात एनएच २११ मध्ये केलेल्या भूसंपादनातील अनियमिततेप्रकरणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यावरून आयुक्तांनी तत्कालीन विभागीय उपायुक्त वर्षा ठाकूर, डॉ. विजयकुमार फड, डॉ. पुरुषोत्तम पाटोदेकर यांची चौकशी समिती नेमली. समितीने चौकशी अहवालामध्ये हदगल यांच्यावर ठपका ठेवला. त्यानुसार आयुक्तांनी शासनाकडे हदगल यांची विभागीय चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार केला. दरम्यान, २०२१ मध्ये हदगल यांची औरंगाबादमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर बदली झाली. विभागीय चौकशी सुरू असताना त्यांची बदली झाल्यामुळे पुन्हा ते वादात सापडले. हदगल यांनी करोडी येथील १९ शेतकऱ्यांच्या जमिनी हायवेवर दाखवून त्यांना ४ कोटी ९० लाख रुपयांऐवजी जास्तीचा ४१ कोटी ४३ लाख १५ हजार २३७ रुपयांचा मोबदला दिल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले. त्यांच्या विरोधात काही लोकप्रतिनिधींनी मागील महिन्यांत तक्रारी केल्यानंतर त्यांच्या निलंबनाचे आदेश शासनाने जारी केले आहेत.

४१ कोटी मोबदल्याचे प्रकरणधुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या भूसंपादन प्रक्रियेत लांबवरच्या जमिनी हायवेजवळ दाखवून ४१ कोटी ४३ लाख १५ हजार २३७ रुपये जास्तीचा मोबदला दिला. या प्रकरणात अहवाल प्राप्त झाल्यानंतर दीड वर्षाने शासनाने हदगल यांना निलंबित केले. या सगळ्या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीने औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील १६७ एकर जमिनीच्या भूसंपादनातील व्यवहारांची माहिती घेऊन अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला. या अहवालात चारही जिल्ह्यांत तत्कालीन भूसंपादन अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांवर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र अद्याप जालना, बीड आणि उस्मानाबादेतील अनियमिततेप्रकरणी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होेते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादsuspensionनिलंबनMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय