शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:11 IST

शहरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण खूप वाढले असून, औरंगाबादकरांना शुद्ध हवा मिळत नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण खूप वाढले असून, औरंगाबादकरांना शुद्ध हवा मिळत नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिला आहे. यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही मंडळाने केली आहे. लवकरच शहरात विविध उपाययोजना करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील १७ शहरांमध्ये हवेची तपासणी केली. औरंगाबाद शहरात स.भु. कॉलनी परिसर, जिल्हा सत्र न्यायलय, गजानन महाराज मंदिर परिसरात तपासणी करण्यात आली. या तपासणीत शहरातील हवेत बरेच प्रदूषण असल्याचे निदर्शनास आले. वाहनांमुळे होणारे अत्यंत धोकादायक असे प्रदूषणही तपासणीत निदर्शनास आले. हवेत धूलिकणांचे प्रमाणही गरजेपेक्षा अधिक असल्याचे लक्षात आले. औरंगाबादकरांना शुद्ध आणि ताजी हवा मिळावी यासाठी महापालिकेने ठोस कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी आज एका बैठकीत मनपाकडे केली. या बैठकीत कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर चर्चा करण्यात आली. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे खाजगी वाहनांचे प्रमाण वाढले आहे. मनपाने शहर वाहतूक बस सक्षम केल्यास यावर नियंत्रण मिळविता येईल, अशी अपेक्षा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी व्यक्त केली. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात यावीत. शहरात ग्रीन झोनचे प्रमाण वाढविण्यात यावे. जिथे जिथे ग्रीन झोन आहे, त्यांना विकसित करावे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार शहरात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. शहरात खड्डे खूप आहेत. त्यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावरही महापालिका गांभीर्याने विचार करीत असून, त्यावरही उपाययोजना करण्यात येतील.