शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

औरंगाबादेत हायप्रोफाईल किडनॅपींग; पावणेचार कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण

By बापू सोळुंके | Updated: September 17, 2022 22:16 IST

खळबळजनक घटना : छत्रपती संभाजीराजे कारखान्याजवळील इब्राहिमपूर शिवारात थरार

औरंगाबाद : कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) निवृत्त सहसंचालकाचे चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि. १७) दुपारी बीड रोडवरील छत्रपती संभाजीराजे कारखान्याजवळील इब्राहिमपूर शिवारात घडली. अपहरणकर्त्यांनी सुमारे पावणेचार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समजते. ही माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्यासह, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली तरी मध्यरात्रीपर्यंत त्यांना यश आले नव्हते.

विश्वनाथ राजळे (६२, रा. सिडको एन ७) असे अपहरण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजळे हे चार वर्षांपूर्वी एमआयडीसीतून निवृत्त झाले. त्यांनी इब्राहिमपूर शिवारात शेती घेतली व फार्म हाऊस बांधले. काही मित्रांसह त्यांनी तेथे गुळाच्या आधुनिक कारखान्याची उभारणी सुरू केली आहे. त्या साईडवर १० ते १५ मजूर काम करतात. १७ सप्टेंबरनिमित्त शनिवारी काम बंद असल्याने तेथे एकही मजूर नव्हता. सालगड्याचे कुटुंब तेथे होते. राजळे हे फार्महाऊसवर गेले तेव्हा सालगड्याची पत्नी कामासाठी जवळील शेतात गेली होती. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तेथे आलेल्या अनोळखी पाच ते सहाजणांनी राजळे यांना चाकूचा धाक दाखवीत बळजबरीने कारमध्ये बसविले. हे पाहून सालगड्याने आरडाओरड सुरू केली असता अपहरणकर्त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि फार्महाऊसमध्ये कोंडले. यानंतर ते राजळे यांना सोबत घेऊन गेले.

सालगड्याच्या पत्नीने दार उघडले

अपहरणकर्त्यांनी फार्म हाऊसमध्ये कोंडलेला सालगडी आरडाओरड करीत होता. मात्र त्याचा आवाज ऐकण्यासाठी जवळ कोणीच नव्हते. काही वेळाने त्याची पत्नी तेथे आली तेव्हा पतीच्या ओरडण्याचा आवाज तिने ऐकला. शिवाय दाराला बाहेरून लावलेली कडी काढून ती आत गेली. यानंतर या घटनेची माहिती करमाड पोलिसांना आणि राजळे यांच्या नातेवाइकांना त्यांनी कळविली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

सुमारे ३ कोटी ८० लाखांच्या खंडणीची चर्चा

अपहरणकर्त्यांनी राजळे यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून राजळे यांना सोडण्यासाठी ३ कोटी ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे सूत्राने सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनीही अपहरणकर्त्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्याकडेही अपहरणकर्त्यांनी पैसेच मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय राजळे हे सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी त्यांच्यासोबत बोलणेही केल्याचे सूत्रांनी सांगितले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासात

हायप्रोफाईल अपहरणाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि एलसीबी, करमाडच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादKidnappingअपहरण