शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत हायप्रोफाईल किडनॅपींग; पावणेचार कोटींच्या खंडणीसाठी निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण

By बापू सोळुंके | Updated: September 17, 2022 22:16 IST

खळबळजनक घटना : छत्रपती संभाजीराजे कारखान्याजवळील इब्राहिमपूर शिवारात थरार

औरंगाबाद : कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) निवृत्त सहसंचालकाचे चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि. १७) दुपारी बीड रोडवरील छत्रपती संभाजीराजे कारखान्याजवळील इब्राहिमपूर शिवारात घडली. अपहरणकर्त्यांनी सुमारे पावणेचार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समजते. ही माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्यासह, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली तरी मध्यरात्रीपर्यंत त्यांना यश आले नव्हते.

विश्वनाथ राजळे (६२, रा. सिडको एन ७) असे अपहरण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजळे हे चार वर्षांपूर्वी एमआयडीसीतून निवृत्त झाले. त्यांनी इब्राहिमपूर शिवारात शेती घेतली व फार्म हाऊस बांधले. काही मित्रांसह त्यांनी तेथे गुळाच्या आधुनिक कारखान्याची उभारणी सुरू केली आहे. त्या साईडवर १० ते १५ मजूर काम करतात. १७ सप्टेंबरनिमित्त शनिवारी काम बंद असल्याने तेथे एकही मजूर नव्हता. सालगड्याचे कुटुंब तेथे होते. राजळे हे फार्महाऊसवर गेले तेव्हा सालगड्याची पत्नी कामासाठी जवळील शेतात गेली होती. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तेथे आलेल्या अनोळखी पाच ते सहाजणांनी राजळे यांना चाकूचा धाक दाखवीत बळजबरीने कारमध्ये बसविले. हे पाहून सालगड्याने आरडाओरड सुरू केली असता अपहरणकर्त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि फार्महाऊसमध्ये कोंडले. यानंतर ते राजळे यांना सोबत घेऊन गेले.

सालगड्याच्या पत्नीने दार उघडले

अपहरणकर्त्यांनी फार्म हाऊसमध्ये कोंडलेला सालगडी आरडाओरड करीत होता. मात्र त्याचा आवाज ऐकण्यासाठी जवळ कोणीच नव्हते. काही वेळाने त्याची पत्नी तेथे आली तेव्हा पतीच्या ओरडण्याचा आवाज तिने ऐकला. शिवाय दाराला बाहेरून लावलेली कडी काढून ती आत गेली. यानंतर या घटनेची माहिती करमाड पोलिसांना आणि राजळे यांच्या नातेवाइकांना त्यांनी कळविली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

सुमारे ३ कोटी ८० लाखांच्या खंडणीची चर्चा

अपहरणकर्त्यांनी राजळे यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून राजळे यांना सोडण्यासाठी ३ कोटी ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे सूत्राने सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनीही अपहरणकर्त्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्याकडेही अपहरणकर्त्यांनी पैसेच मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय राजळे हे सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी त्यांच्यासोबत बोलणेही केल्याचे सूत्रांनी सांगितले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासात

हायप्रोफाईल अपहरणाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि एलसीबी, करमाडच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादKidnappingअपहरण