शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चढ्या दराने बियाणे विक्री भोवली; पैठण तालुक्यातील ५ कृषीसेवा केंद्रांचे परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 16:25 IST

कृषीखात्याच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईने गैरमार्गाने व्यापार करणाऱ्या कृषी केंद्र चालकांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे.

पैठण: खते व बियाणांसाठी जास्तीची रक्कम शेतकऱ्याकडून उकळणाऱ्या तसेच अद्ययावत नोंदी न ठेवणाऱ्या पैठण तालुक्यातील पाच कृषीसेवा केंद्रांचे परवाने एक वर्षासाठी रद्द करण्यात आले आहे. कृषीखात्याच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीनंतर परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप सिरसाट यांनी सांगितले. 

कृषीखात्याच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईने गैरमार्गाने व्यापार करणाऱ्या कृषी केंद्र चालकांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे. तालुक्यात खत बियाणे कीटकनाशक विक्रेते यांच्या गैरव्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर सहनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय अचानक तपासणी करण्यासाठी भरारी पथकाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे.

दरम्यान, तालुका सनियंत्रण कक्षात काही केंद्र चालक खते व बियाणे जास्तदरात विक्री करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी दाखल केल्या होत्या. सहनियंत्रण कक्षात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी ( दि.१३) तालुकास्तरीय व विभागस्तरीय पथकाने  तालुक्यात पाचोड, विहामांडवा, आपेगाव व पैठण शहरातील दुकानांची तपासणी केली. तपासणीत पाचोड येथील श्रीराम कृषी सेवा केंद्र व विशाल कृषी सेवा केंद्र. विहामांडवा येथील अमृता एजन्सी व समर्थ ट्रेडर्स.  पैठण शहरातील प्लांटेशन ऍग्रो सर्विसेस या कृषी केंद्रातून बियाणे जास्त दराने  विक्री करत असल्याचे आढळून आले. रितसर पंचनामा व कारवाई करुन या दुकानांचे परवाने एक वर्ष कालावधीसाठी रद्द करण्यात आले. 

पाचोड येथे कारवाई करणाऱ्या भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ, कृषी पर्यवेक्षक संदीप जवणे, कृषी सहाय्यक प्रमोद रोकडे, कृषी सहाय्यक यशवंत चौधरी तर विहामांडवा पथकात जिल्हा कृषी अधिकारी प्रशांत पवार, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक गणेश सर्कलवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री रामकृष्ण पाटील यांचा समावेश होता.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद