शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अहो, आश्चर्य घडले... कचराकोंडीत किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:06 IST

औरंगाबाद शहर मागील चार महिन्यांपासून कचराकोंडीच्या विळख्यात सापडले आहे. जागोजागी साचलेल्या कचऱ्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या २९९ वरून औरंगाबाद १२८ व्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद शहर मागील चार महिन्यांपासून कचराकोंडीच्या विळख्यात सापडले आहे. जागोजागी साचलेल्या कचऱ्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही शहराची स्वच्छतेसंदर्भात कामगिरी सुधारण्याची किमया झाली आहे. देशपातळीवरील स्वच्छतेच्या सर्वेक्षणात शहराने १२८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. विशेषत: कचराकोंडी नसताना म्हणजे गतवर्षी शहराचा २९९ वा क्रमांक होता.कें द्र सरकारने २०१४ या वर्षापासून ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले आहे. यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेची स्पर्धा घेण्यात येत आहे. यावर्षी या सर्वेक्षणात देशभरातील ४ हजार ४१ शहरांनी सहभाग घेतला होता. मागील औरंगाबाद शहराचा या सर्वेक्षणात देशात २९९ वा क्रमांक आला होता. यावर्षी तरी किमान स्वच्छतेत सुधारणा व्हावी म्हणून औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन आठ महिन्यांपासून प्रयत्नशील होते; परंतु हे प्रयत्न सुरू असतानाच १६ फेब्रुवारीपासून नारेगाव येथील कचरा डेपो कायमचा बंद पडला आणि शहरात कचराकोंडी निर्माण झाली. शहरात मनपाला कचरा टाकण्यासाठी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा आणि मशिनरी मिळालेली नाही. त्यामुळे शहरात फेब्रुवारी महिन्यापासून रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली कचºयाचे ढीग साचलेले आहेत. या सगळ्या प्रकाराने नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.शहराला २,४६४ गुणयावर्षी स्वच्छता सर्वेक्षण हे एकूण ४ हजार गुणांचे होते. यापैकी औरंगाबाद शहराला एकूण २,४६४ गुण मिळाले आहेत.४ हजार गुणांमध्ये कागदोपत्री अहवालासाठी १,४०० गुण, प्रत्यक्ष पाहणीसाठी १,२०० आणि सिटीजन्स फिडबॅकसाठी १,४०० गुण होते.यामध्ये औरंगाबाद शहराला प्रत्यक्ष पाहणीत सर्वाधिक ९६९ गुण मिळाले आहेत. कागदोपत्री अहवालाला ५६२, तर सिटीजन्स फिडबॅकला ९३३ गुण मिळाले आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका