साडेतीन कोटी खर्चूनही गळती थांबेना

By Admin | Updated: May 20, 2014 01:07 IST2014-05-20T00:46:28+5:302014-05-20T01:07:05+5:30

प्रकाश मिरगे, जाफराबाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ‘मॅजिकशो’, ‘रोड शो’ संपले असून शहरातील ‘वॉटर शो’ चे आता काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

With the help of three and a half million, the leakage stopped | साडेतीन कोटी खर्चूनही गळती थांबेना

साडेतीन कोटी खर्चूनही गळती थांबेना

प्रकाश मिरगे, जाफराबाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ‘मॅजिकशो’, ‘रोड शो’ संपले असून शहरातील ‘वॉटर शो’ चे आता काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाफराबाद शहरामध्ये राज्य मॉडेल म्हणून ओळख असलेली जाफराबाद पाणीपुरवठा योजना पूर्णत: बिनकामी ठरत आहे. या योजनेसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. तरीही सदरील योजनेला कायम गळती लागलेली आहे. योजनेला आजारपणातून सावरण्यासाठी परत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने लाखो रुपयांचे वाढीव प्रस्ताव सादर करुन मंजूर करुन घेतले आहेत, हे विशेष! विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी ते तळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत गेल्या निवडणुकीमध्ये घरची भाकरी खाऊन मोठी मेहनत घेतल्याचे सांगत आहे. अशीच मेहनत शहरातील पाणी टंचाई समस्याविषयी घ्यावी, असे वाटणे साहजिकच आहे. उन्हाळा असो की पावसाळा; जाफराबादकरांचा पाणीटंचाईच्या भीतीने नेहमीच अंगावर काटा येतो. तसा नेत्यांच्या अंगावरही काटा येतो. परंतु तो निवडणुकीतील काळापर्यंतच. नेतेमंडळी आपली तहान कशीतरी भागवतात. नागरिकांना मात्र आपली तहान दररोज पैसे मोजून भागवावी लागत आहे. याचे कोणतेही सोयरसुतक प्रशासनास अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींना नसल्याचे चित्र आहे. गेल्या आर्थिक वर्षात तालुक्यात पावसाने वार्षिक उच्चांक गाठून सरासरी पेक्षाही दुपटीने पाऊस पडला आहे. तरी सुध्दा पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नवीन योजना कार्यान्वित होऊन एक वर्ष होत आहे. परंतु पूर्णा नदीच्या पात्रातून (खडकपूर्णा) येणारा पाणीपुरवठा जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचतच नसल्याचे सध्याचे चित्र आहे. अंतर्गत पाणीपुरवठा जलवाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे खरे कारण आहे. जलशुध्दीकरण केंद्राची देखील अशीच काही अवस्था होऊन बसली आहे. यातून होणारा पाणीपुरवठा अत्यंत दूषित होत असून सदरील पाणीपुरवठा योजना ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी हस्तांतरित कराव्ी असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पाणी पुरवठा योजनेमध्ये काही त्रुटी असतांना ग्राम पंचायत पदाधिकार्‍यांची भूमिकाही संशयास्पदच वाटत आहे. राज्यात आदर्श ठरलेली पाणीपुरवठा योजना कुचकामी गतवर्षी पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खडकपूर्णा जलाशयातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. ही योजना राज्यात आदर्श अशी ठरली होती. या योजनेमुळे जाफराबादेतील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपणार अशी आशा निर्माण झाली होती. असे असूनही ही योजना अत्यंत कुचकामी ठरली आहे. जाफराबादवासियांना बारमही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. साडेतीन कोटी रुपये खर्च करुनही उपयोग काय, असा सवाल सर्व सामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. योजनेची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: With the help of three and a half million, the leakage stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.