शहरं
Join us  
Trending Stories
1
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
2
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
3
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
4
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
5
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
6
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज
7
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
8
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
9
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
10
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
11
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
12
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
13
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
14
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
16
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
17
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
18
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
19
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
20
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

पावसाने दडी मारली, मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच पेरण्या

By विकास राऊत | Published: July 13, 2023 8:07 PM

पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला असून कडधान्यांच्या पिकांची फक्त ३७ टक्केच पेरणी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. मागील चार वर्षांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला असून कडधान्यांच्या पिकांची फक्त ३७ टक्केच पेरणी झाली आहे. मुबलक पाऊस झाला नाहीतर कडधान्यांची पिके संकटात येण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात खरीप हंगामात १७ विविध पिकांची पेरणी होते. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका तृणधान्यांचा, तूर, मूग, उडीद कडधान्यांचा, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफुल, सोयाबीन या गळीत धान्यांसह कापूस व उसाची पेरणी केली जाते.

पाऊस लांबल्यामुळे कडधान्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कापूस, मका, साेयाबीन पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढला आहे. कापूस ६४ टक्के, सोयाबीन ७३ टक्के, मका पिकांची ६१ टक्के पेरणी झाली आहे. पेरण्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याची परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यात विभागात सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. मागील चार वर्षे ओला दुष्काळ आणि यंदा समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. ४३ टक्के म्हणजेच २२ लाख हेक्टर क्षेत्र अजून पेरण्यांअभावी पडून आहे.

उसाचे क्षेत्र शून्य टक्क्यावरखरीप हंगामात २ लाख ६५ हजार ८०९ हेक्टवर पेरणीचे क्षेत्र आहे. परंतु यंदा उसाची पेरणी शून्य टक्क्यावर आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झाली नसल्याचे दिसत असून याचा परिणाम येणाऱ्या गळीत हंगामावर होणे शक्य आहे.

कडधान्यांच्या पेरण्या कमीकडधान्यांच्या पेरण्या कमी झाल्यामुळे डाळींचे उत्पादन घटू शकते. पुढील काळात डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची चिन्हं यातून दिसत आहेत. ८ लाख ७ हजार हेक्टरपैकी फक्त २ लाख ७० हजार हेक्टरवर कडधान्यांच्या पेरण्या झाल्या असून पावसाअभावी ही पिकेही धोक्यात येत आहेत.

जिल्हानिहाय पेरण्याऔरंगाबाद- ७३ टक्केलातूर- ५७ टक्केउस्मानाबाद- ३६ टक्केनांदेड- ५८ टक्केपरभणी- ६० टक्केहिंगोली- ६१ टक्केजालना- ५२ टक्केबीड- ५७ टक्केएकूण- ५७ टक्के 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीRainपाऊस