शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पावसाने दडी मारली, मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच पेरण्या

By विकास राऊत | Updated: July 13, 2023 20:08 IST

पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला असून कडधान्यांच्या पिकांची फक्त ३७ टक्केच पेरणी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात ५१ पैकी २९ लाख हेक्टरवरच खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. मागील चार वर्षांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला असून कडधान्यांच्या पिकांची फक्त ३७ टक्केच पेरणी झाली आहे. मुबलक पाऊस झाला नाहीतर कडधान्यांची पिके संकटात येण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात खरीप हंगामात १७ विविध पिकांची पेरणी होते. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका तृणधान्यांचा, तूर, मूग, उडीद कडधान्यांचा, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफुल, सोयाबीन या गळीत धान्यांसह कापूस व उसाची पेरणी केली जाते.

पाऊस लांबल्यामुळे कडधान्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कापूस, मका, साेयाबीन पिकांच्या पेरण्यांचा टक्का वाढला आहे. कापूस ६४ टक्के, सोयाबीन ७३ टक्के, मका पिकांची ६१ टक्के पेरणी झाली आहे. पेरण्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याची परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यात विभागात सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. मागील चार वर्षे ओला दुष्काळ आणि यंदा समाधानकारक पाऊस होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. ४३ टक्के म्हणजेच २२ लाख हेक्टर क्षेत्र अजून पेरण्यांअभावी पडून आहे.

उसाचे क्षेत्र शून्य टक्क्यावरखरीप हंगामात २ लाख ६५ हजार ८०९ हेक्टवर पेरणीचे क्षेत्र आहे. परंतु यंदा उसाची पेरणी शून्य टक्क्यावर आहे. पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी झाली नसल्याचे दिसत असून याचा परिणाम येणाऱ्या गळीत हंगामावर होणे शक्य आहे.

कडधान्यांच्या पेरण्या कमीकडधान्यांच्या पेरण्या कमी झाल्यामुळे डाळींचे उत्पादन घटू शकते. पुढील काळात डाळींचा तुटवडा निर्माण होण्याची चिन्हं यातून दिसत आहेत. ८ लाख ७ हजार हेक्टरपैकी फक्त २ लाख ७० हजार हेक्टरवर कडधान्यांच्या पेरण्या झाल्या असून पावसाअभावी ही पिकेही धोक्यात येत आहेत.

जिल्हानिहाय पेरण्याऔरंगाबाद- ७३ टक्केलातूर- ५७ टक्केउस्मानाबाद- ३६ टक्केनांदेड- ५८ टक्केपरभणी- ६० टक्केहिंगोली- ६१ टक्केजालना- ५२ टक्केबीड- ५७ टक्केएकूण- ५७ टक्के 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीRainपाऊस