शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला, राज्य शासनाकडून मदतीचा घासही गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:28 IST

वैजापूर तालुक्यातील सव्वालाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

- बाबासाहेब धुमाळवैजापूर : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीची मदत दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. मात्र, दिवाळी होऊनही अद्याप निधी मिळाला नसल्याने तालुक्यातील १ लाख २४ हजारांहून अधिक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ९३ कोटींहून अधिक रकमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवूनही निधी प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांची ऐन सणासुदीत आर्थिक कोंडी झाली आहे.

वैजापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील १ लाख २४ हजार १८७ शेतकऱ्यांची १ लाख ७ हजार ७८० हेक्टर जमीन बाधित झाली. यात १ लाख ६ हजार ३५८ हेक्टर जिरायती, ७४४ हेक्टर बागायती आणि ७७८ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी तहसील प्रशासनाने शासनाकडे ९३ कोटी २४ लाख ९६ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली आहे; परंतु, अद्यापही मदतीची रक्कम वैजापूरसाठी प्राप्त झालेली नाही, त्यामुळे सव्वालाख शेतकऱ्यांना मदतीच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे.

दिवाळीपूर्वी मदत मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची शासनाकडून निधी न मिळाल्याने ऐन सणासुदीत मोठी आर्थिक कोंडी झाली. राज्य शासनाकडे अहवाल जाऊनही रक्कम प्राप्त न झाल्याने मदतीची वाट पाहत असलेला बळीराजा सध्या हवालदिल झाला आहे.

दिवाळी झाली; पण मदतीची आस कायमअतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अनेक घरांचीही पडझड झाली. तालुक्यात प्रशासनासह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना त्वरित मदतीचे आश्वासन दिले होते. प्रशासनाच्या सूचनेनुसार पंचनामेही वेळेत पूर्ण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा दिवाळीपूर्वी मदत मिळेल या आशेवर लागल्या होत्या; परंतु राज्य शासनाच्या कचखावू भूमिकेमुळे दिवाळी होऊनही अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही.

अद्यापही मदत मिळालेली नाहीमुख्यमंत्र्यांनी दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही नुकसानीची मदतही मिळालेली नाही. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी.-छगन सोमवंशी, शेतकरी, म्हस्की

मदत का मिळत नाही?शेजारच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची चर्चा आहे; मग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत का मिळत नाही, असा प्रश्न आहे.- साहेबराव औताडे, शेतकरी, बेलगाव

अनुदान प्राप्त झालेले नाहीशासनाकडून अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अद्याप शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीची मदत देण्यात आलेली नाही.-सुनील सावंत, तहसीलदार

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Rob Farmers; State Aid Vanishes in Vaijapur!

Web Summary : Farmers in Vaijapur await promised Diwali aid for crop damage from heavy rains. Over 1.24 lakh farmers are affected, with a 93 crore proposal pending. The delay has caused financial hardship. Officials cite lack of funds from the government.
टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर