शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला, राज्य शासनाकडून मदतीचा घासही गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:28 IST

वैजापूर तालुक्यातील सव्वालाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

- बाबासाहेब धुमाळवैजापूर : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीची मदत दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. मात्र, दिवाळी होऊनही अद्याप निधी मिळाला नसल्याने तालुक्यातील १ लाख २४ हजारांहून अधिक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ९३ कोटींहून अधिक रकमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवूनही निधी प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांची ऐन सणासुदीत आर्थिक कोंडी झाली आहे.

वैजापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील १ लाख २४ हजार १८७ शेतकऱ्यांची १ लाख ७ हजार ७८० हेक्टर जमीन बाधित झाली. यात १ लाख ६ हजार ३५८ हेक्टर जिरायती, ७४४ हेक्टर बागायती आणि ७७८ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी तहसील प्रशासनाने शासनाकडे ९३ कोटी २४ लाख ९६ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली आहे; परंतु, अद्यापही मदतीची रक्कम वैजापूरसाठी प्राप्त झालेली नाही, त्यामुळे सव्वालाख शेतकऱ्यांना मदतीच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे.

दिवाळीपूर्वी मदत मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची शासनाकडून निधी न मिळाल्याने ऐन सणासुदीत मोठी आर्थिक कोंडी झाली. राज्य शासनाकडे अहवाल जाऊनही रक्कम प्राप्त न झाल्याने मदतीची वाट पाहत असलेला बळीराजा सध्या हवालदिल झाला आहे.

दिवाळी झाली; पण मदतीची आस कायमअतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अनेक घरांचीही पडझड झाली. तालुक्यात प्रशासनासह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना त्वरित मदतीचे आश्वासन दिले होते. प्रशासनाच्या सूचनेनुसार पंचनामेही वेळेत पूर्ण झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा दिवाळीपूर्वी मदत मिळेल या आशेवर लागल्या होत्या; परंतु राज्य शासनाच्या कचखावू भूमिकेमुळे दिवाळी होऊनही अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही.

अद्यापही मदत मिळालेली नाहीमुख्यमंत्र्यांनी दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल, असे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही नुकसानीची मदतही मिळालेली नाही. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी.-छगन सोमवंशी, शेतकरी, म्हस्की

मदत का मिळत नाही?शेजारच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची चर्चा आहे; मग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत का मिळत नाही, असा प्रश्न आहे.- साहेबराव औताडे, शेतकरी, बेलगाव

अनुदान प्राप्त झालेले नाहीशासनाकडून अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अद्याप शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीची मदत देण्यात आलेली नाही.-सुनील सावंत, तहसीलदार

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Rob Farmers; State Aid Vanishes in Vaijapur!

Web Summary : Farmers in Vaijapur await promised Diwali aid for crop damage from heavy rains. Over 1.24 lakh farmers are affected, with a 93 crore proposal pending. The delay has caused financial hardship. Officials cite lack of funds from the government.
टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर