शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

सिल्लोड तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी; अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 17:51 IST

तालुक्यातील भराडी-अंधारी रस्ता गेल्या चार दिवसांपासून नदीला पूर आल्याने बंद आहे.

ठळक मुद्देअंधारी येथील मोहरा रस्त्यावरील काटवन तलाव तुडुंब  भरला आहे.जास्त पाऊस झाल्याने तो केव्हाही फुटू शकतो..

सिल्लोड: तालुक्यातील अजिंठा, गोळेगाव,आमठाणा, बोरगाव बाजार  या चार मंडळात  सोमवारी रात्री जोरदार अतिवृष्टी झाली यामुळे अजिंठा अंधारी, उंडणगाव, राहिमाबाद येथील तिन्ही मध्यम प्रकल्प ओवरफ्लो झाले. वादळी वारा, व जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे पडली, शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यातील जवळपास सर्व नद्याना पूर आला आहे.अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक शेतात पाणी साचले आहे.

सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला व मंगळवारी सुद्धा सकाळपासून सततधार सुरू आहे. सोयाबीन पीक पूर्ण हातचे गेले आहे.कपाशीच्या कैऱ्या सडल्या आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. तालुक्यातील भराडी-अंधारी रस्ता गेल्या चार दिवसांपासून नदीला पूर आल्याने बंद आहे.पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे.लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली

सर्कल निहाय झालेला पाऊस..सिल्लोड तालुक्यात झालेला पाऊस असा:-सिल्लोड ४५, भराडी ६०,अंभई ६३, अजिंठा ८५,गोळेगाव ९२,आमठाणा ६७,निल्लोड ४०,बोरगाव बाजार ६५ असा एकूण सरासरी ६४.६२५ मिलिमीटर पाऊस झाला.

'गंगामाय शांत हो...'; रौद्ररुपी कयाधू नदीची महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी

काटवन तलाव फुटण्याच्या मार्गावर...अंधारी येथील मोहरा रस्त्यावरील काटवन तलाव तुडुंब  भरला आहे. जास्त पाऊस झाल्याने तो केव्हाही फुटू शकतो.. त्यामुळे तलावाकाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तलाव फुटू नये म्हणून  सांडव्यातून जेसीबीने पाणी काढण्याचे काम युद्ध पातळीवर प्रशासन करत आहे.टाकली ते अंधारी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरील  वाहतूक ठप्प झाली आहे.कन्नड औरंगाबाद बस यामुळे पुढे न जाता अंधारातून परत गेली आहे.

Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद